शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कोकणातील प्रकाशासाठी कोल्हापूर धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अंधारात चाचपडत आहे. ‘ महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करणे अशक्य असल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’चे कर्मचारी तिकडे मदतीसाठी धावले आहेत. कोल्हापुरातील २५० कर्मचारी तिथे असून आतापर्यंत सुमारे ४० टक्के वीजपुरवठा सुरू करण्यात ‘महावितरण’ला यश आले आहे.

‘तौक्ते’ वादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झाडे, घरे उद्‌ध्वस्त झालीच त्याचबरोबर ‘महावितरण’चे विद्युत खांब उखडून पडले आहेत. डीपी जमीनदोस्त झाल्या आहेत, विद्युत वाहिन्या तुटून कुठे जाऊन पडल्यात त्या सापडतही नाहीत. त्यामुळे गेली सहा दिवस कोकण अंधारात चाचपडत आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे, अशा परिस्थितीत कोकणवासीय जीवन जगत आहेत. विद्युत खांब, डीपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली की ‘महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हे सगळे उभे करणे अवघड होते. त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना कोकणात पाठविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३० अभियंते व २२० कर्मचारी असे २५० कर्मचारी गेली चार दिवसांपासून दिवस-रात्र काम करत आहेत. सुरुवातीच्या टप्यात ३३ केव्हीच्या लाईन जोडणी पूर्ण केली. त्यानंतर ११ केव्हीच्या उपवाहिन्या सुरू करून घरगुती वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनी ठिकाण दाखवल्यानंतर कोल्हापूर, सांगलीचे कर्मचारी काम पूर्ण करूनच पुढे सरकत आहेत. कोकणातील परिस्थती पूर्ववत होण्यासाठी अजून तीन दिवस लागणार आहेत.

चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा

गेली पाच-सहा दिवस सगळीकडे अंधार आहे, घरातील दळप-कांडप संपले आहे. वीज कधी येणार हे माहिती नसल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा कोकणवासीय करत आहेत.

कोट-

वादळाने ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणाच उद्‌ध्वस्त केली. ती पूर्ववत करण्यासाठी आमच्याकडील यंत्रणा अपुरी पडत होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी खूप साथ दिली. आमच्या कर्मचाऱ्यांसोबत ते वेगाने काम करत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- बी. टी. मोहिते (कार्यकारी अभियंता, कणकवली)