शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
4
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
5
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
6
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
7
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
8
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
9
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
10
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
11
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
12
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
13
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
14
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
15
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
16
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
17
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
18
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
19
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
20
शरीफ उस्मान हादीचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील प्रकाशासाठी कोल्हापूर धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अंधारात चाचपडत आहे. ‘ महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करणे अशक्य असल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’चे कर्मचारी तिकडे मदतीसाठी धावले आहेत. कोल्हापुरातील २५० कर्मचारी तिथे असून आतापर्यंत सुमारे ४० टक्के वीजपुरवठा सुरू करण्यात ‘महावितरण’ला यश आले आहे.

‘तौक्ते’ वादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झाडे, घरे उद्‌ध्वस्त झालीच त्याचबरोबर ‘महावितरण’चे विद्युत खांब उखडून पडले आहेत. डीपी जमीनदोस्त झाल्या आहेत, विद्युत वाहिन्या तुटून कुठे जाऊन पडल्यात त्या सापडतही नाहीत. त्यामुळे गेली सहा दिवस कोकण अंधारात चाचपडत आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे, अशा परिस्थितीत कोकणवासीय जीवन जगत आहेत. विद्युत खांब, डीपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली की ‘महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हे सगळे उभे करणे अवघड होते. त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना कोकणात पाठविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३० अभियंते व २२० कर्मचारी असे २५० कर्मचारी गेली चार दिवसांपासून दिवस-रात्र काम करत आहेत. सुरुवातीच्या टप्यात ३३ केव्हीच्या लाईन जोडणी पूर्ण केली. त्यानंतर ११ केव्हीच्या उपवाहिन्या सुरू करून घरगुती वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनी ठिकाण दाखवल्यानंतर कोल्हापूर, सांगलीचे कर्मचारी काम पूर्ण करूनच पुढे सरकत आहेत. कोकणातील परिस्थती पूर्ववत होण्यासाठी अजून तीन दिवस लागणार आहेत.

चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा

गेली पाच-सहा दिवस सगळीकडे अंधार आहे, घरातील दळप-कांडप संपले आहे. वीज कधी येणार हे माहिती नसल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा कोकणवासीय करत आहेत.

कोट-

वादळाने ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणाच उद्‌ध्वस्त केली. ती पूर्ववत करण्यासाठी आमच्याकडील यंत्रणा अपुरी पडत होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी खूप साथ दिली. आमच्या कर्मचाऱ्यांसोबत ते वेगाने काम करत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- बी. टी. मोहिते (कार्यकारी अभियंता, कणकवली)