शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
4
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
5
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
6
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
7
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
8
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
9
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
10
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
11
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
12
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
13
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
14
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
15
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
16
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
17
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
18
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
19
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
20
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  

कोकणातील प्रकाशासाठी कोल्हापूर धावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:23 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने कोकणाला उद्‌ध्वस्त केल्याने गेली सहा दिवस येथील वीजपुरवठा खंडित असल्याने सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा अंधारात चाचपडत आहे. ‘ महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना वीजपुरवठा सुरळीत करणे अशक्य असल्याने कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’चे कर्मचारी तिकडे मदतीसाठी धावले आहेत. कोल्हापुरातील २५० कर्मचारी तिथे असून आतापर्यंत सुमारे ४० टक्के वीजपुरवठा सुरू करण्यात ‘महावितरण’ला यश आले आहे.

‘तौक्ते’ वादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना मोठा फटका बसला. ताशी १०० किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने झाडे, घरे उद्‌ध्वस्त झालीच त्याचबरोबर ‘महावितरण’चे विद्युत खांब उखडून पडले आहेत. डीपी जमीनदोस्त झाल्या आहेत, विद्युत वाहिन्या तुटून कुठे जाऊन पडल्यात त्या सापडतही नाहीत. त्यामुळे गेली सहा दिवस कोकण अंधारात चाचपडत आहे. वीज नसल्याने पाणीपुरवठा ठप्प आहे, अशा परिस्थितीत कोकणवासीय जीवन जगत आहेत. विद्युत खांब, डीपीची एवढ्या मोठ्या प्रमाणात पडझड झाली की ‘महावितरण’च्या स्थानिक कर्मचाऱ्यांना हे सगळे उभे करणे अवघड होते. त्यासाठी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांना कोकणात पाठविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ३० अभियंते व २२० कर्मचारी असे २५० कर्मचारी गेली चार दिवसांपासून दिवस-रात्र काम करत आहेत. सुरुवातीच्या टप्यात ३३ केव्हीच्या लाईन जोडणी पूर्ण केली. त्यानंतर ११ केव्हीच्या उपवाहिन्या सुरू करून घरगुती वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. स्थानिक कर्मचाऱ्यांनी ठिकाण दाखवल्यानंतर कोल्हापूर, सांगलीचे कर्मचारी काम पूर्ण करूनच पुढे सरकत आहेत. कोकणातील परिस्थती पूर्ववत होण्यासाठी अजून तीन दिवस लागणार आहेत.

चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा

गेली पाच-सहा दिवस सगळीकडे अंधार आहे, घरातील दळप-कांडप संपले आहे. वीज कधी येणार हे माहिती नसल्याने येथील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्यामुळे चातकाप्रमाणे विजेची प्रतीक्षा कोकणवासीय करत आहेत.

कोट-

वादळाने ‘महावितरण’ची संपूर्ण यंत्रणाच उद्‌ध्वस्त केली. ती पूर्ववत करण्यासाठी आमच्याकडील यंत्रणा अपुरी पडत होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांनी खूप साथ दिली. आमच्या कर्मचाऱ्यांसोबत ते वेगाने काम करत असल्याने परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.

- बी. टी. मोहिते (कार्यकारी अभियंता, कणकवली)