शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा

By विश्वास पाटील | Updated: July 20, 2024 13:31 IST

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी ...

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना शनिवारी विचारला.शेट्टी यांनी विधानसभेत तिसरी आघाडी करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने नारकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे..त्यात ते म्हणतात, देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला आहे.आज तिसऱ्या पर्यायाची भाषा करणारे सरळ सरळ भाजपच्या हिताचे राजकारण करत आहेत. २००९ मध्ये त्यावेळच्या रिडालोस या तिसऱ्या आघाडीच्या तिकिटावर शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातून  खासदार झाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत  शेट्टी यांनी इचलकरंजी मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार  दत्ता माने यांना मदत तर केली नाहीच, पण लाल बावट्याच्या नेतृत्वाखालील यंत्रमाग कामगारांच्या लढ्यालाही कधी समर्थन दिले नाही. उलट ते २०१४ मध्ये भाजपच्या दावणीला आपखुशीने गेले. अशी संधिसाधू भूमिका घेणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी दिली नाही, म्हणून नक्राश्रू ढाळण्याची गरज नाही. आपले हित जोपासण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खंबीर आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपचा पराभव करण्यास पक्षाने प्राधान्य दिले आणि ते साध्य करण्यात मोलाची कामगिरी बजावली.हातकणंगले मतदारसंघात 'मविआ'ची मते हवीत, मात्र त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत स्टेजवर येऊ नये, हा कसला बालहट्ट? तो कशासाठी होता हे तेथील निकालांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवायचे आणि प्रत्यक्षात भाजपला मदत करायची या नाटकाचा पहिला अंक सादर करण्यात आला. आता विधानसभेच्या निवडणुकीत त्याच नाटकाच्या दुसऱ्या अंकाची तालीम सुरू होत आहे. "धर्मांध गिधाडांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याची" घोषणा करत शरद जोशींपासून फारकत घेतलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांना परत त्या गिधाडांच्या हवाली करू पाहात आहेत. असे त्या गिधाडांच्या हवाली व्हायला शेतकरी आणि कामगार मेलेली जनावरे नाहीत, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहे. त्याचे दुसरे पाऊलही मराठी जनता आगामी विधानसभा निवडणुकीत उचलल्याशिवाय राहणार नाही.भाजप-प्रणित महायुतीच्या विरोधातील सर्व लहानमोठ्या पक्ष आणि संघटनांच्या एकजुटीचा विस्तार करत मविआ राज्यात परिवर्तन घडवून आणू शकेल. अशी एकजूट उभारण्यात माकप सतत सक्रिय राहील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी