शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राजू शेट्टी, तिसऱ्या आघाडीचे गाजर पुन्हा कशाला दाखवता?; माकपची विचारणा

By विश्वास पाटील | Updated: July 20, 2024 13:31 IST

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी ...

कोल्हापूर : तिसऱ्या आघाडीचे गाजर कशाला दाखवता अशी थेट विचारणा मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना शनिवारी विचारला.शेट्टी यांनी विधानसभेत तिसरी आघाडी करण्याचा मनोदय जाहीर केला आहे. त्या अनुषंगाने नारकर यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे..त्यात ते म्हणतात, देशाच्या आणि राज्याच्या आजच्या परिस्थितीत तिसरी आघाडी ही धूर्त आणि मतलबी खेळी आहे. राज्यातील जनतेला महायुतीच्या भ्रष्ट आणि अनैतिक राजवटीच्या कचाट्यातून सोडवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजप-प्रणित महायुतीस भक्कम पर्याय ही आणि हीच मराठी जनतेची मागणी आहे, आणि तिने तसा स्पष्ट कौल लोकसभा निवडणुकीत दिला आहे.आज तिसऱ्या पर्यायाची भाषा करणारे सरळ सरळ भाजपच्या हिताचे राजकारण करत आहेत. २००९ मध्ये त्यावेळच्या रिडालोस या तिसऱ्या आघाडीच्या तिकिटावर शेट्टी आणि सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर - सांगली जिल्ह्यातून  खासदार झाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत  शेट्टी यांनी इचलकरंजी मतदारसंघातील तिसऱ्या आघाडीचे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार  दत्ता माने यांना मदत तर केली नाहीच, पण लाल बावट्याच्या नेतृत्वाखालील यंत्रमाग कामगारांच्या लढ्यालाही कधी समर्थन दिले नाही. उलट ते २०१४ मध्ये भाजपच्या दावणीला आपखुशीने गेले. अशी संधिसाधू भूमिका घेणाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदारसंघात महाविकास आघाडीने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला उमेदवारी दिली नाही, म्हणून नक्राश्रू ढाळण्याची गरज नाही. आपले हित जोपासण्यास मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष खंबीर आहे. दिंडोरी मतदारसंघात भाजपचा पराभव करण्यास पक्षाने प्राधान्य दिले आणि ते साध्य करण्यात मोलाची कामगिरी बजावली.हातकणंगले मतदारसंघात 'मविआ'ची मते हवीत, मात्र त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत स्टेजवर येऊ नये, हा कसला बालहट्ट? तो कशासाठी होता हे तेथील निकालांनी दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणुकीत मविआशी चर्चेचे गुऱ्हाळ चालू ठेवायचे आणि प्रत्यक्षात भाजपला मदत करायची या नाटकाचा पहिला अंक सादर करण्यात आला. आता विधानसभेच्या निवडणुकीत त्याच नाटकाच्या दुसऱ्या अंकाची तालीम सुरू होत आहे. "धर्मांध गिधाडांपासून शेतकऱ्यांना वाचवण्याची" घोषणा करत शरद जोशींपासून फारकत घेतलेले राजू शेट्टी शेतकऱ्यांना परत त्या गिधाडांच्या हवाली करू पाहात आहेत. असे त्या गिधाडांच्या हवाली व्हायला शेतकरी आणि कामगार मेलेली जनावरे नाहीत, हे लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी दाखवले आहे. त्याचे दुसरे पाऊलही मराठी जनता आगामी विधानसभा निवडणुकीत उचलल्याशिवाय राहणार नाही.भाजप-प्रणित महायुतीच्या विरोधातील सर्व लहानमोठ्या पक्ष आणि संघटनांच्या एकजुटीचा विस्तार करत मविआ राज्यात परिवर्तन घडवून आणू शकेल. अशी एकजूट उभारण्यात माकप सतत सक्रिय राहील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRaju Shettyराजू शेट्टी