शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर साधला निशाणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:53 IST

सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.

ठळक मुद्देराजू शेट्टी यांनी मंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर साधला निशाणाआकांडतांडव करण्यापेक्षा शेतकऱ्यांचे पैसे मिळवून द्या

कोल्हापूर : सत्तेचा माज आला, की बेताल वक्तव्ये मुखात येतात. त्यांनी अशा प्रकारे आकांडतांडव करण्यापेक्षा गुंतवणूक केलेल्या गोरगरीब शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून दिले असते, तर अधिक बरे झाले असते, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.कडकनाथ घोटाळ्याप्रश्नी मंत्री खोत यांनी कोल्हापुरात केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. कोंबडीचोर भामट्या मंत्र्याची कीव करावी तेवढी थोडीच आहे, असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘सदाभाऊंना मंत्री करा म्हणून शिफारस केली ही आयुष्यातील सर्वांत मोठी घोडचूक होती, त्याची फळे आता आम्ही आणि शेतकरीही भोगत आहोत.’कोल्हापुरात येऊन आमच्या विरोधात आकांडतांडव, आगपाखड करण्यापेक्षा ज्यांचे पैसे यात अडकले आहेत, त्या गोरगरीब शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी ताकद लावली असती, तर शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळाले असते, असेही शेट्टी यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीSadabhau Khotसदाभाउ खोत kolhapurकोल्हापूर