शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

राजू शेट्टींनी काशीला जाऊन पापक्षालन करावे - : सदाभाऊ खोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 1:38 PM

ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही.

ठळक मुद्देट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावीधैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकºयांना अर्पण केला.

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आत्मक्लेश यात्रा काढली होती; परंतु याच शेतकऱ्यांनी आता त्यांचा पराभव केला आहे. साखर कारखानदारांशी केलेली अभद्र युती शेतकऱ्यांना आवडली नाही. ज्यांनी शेतकऱ्यांची वाट लावली, त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे शेतकऱ्यांना आवडले नाही. तेव्हा शेट्टी यांनी केलेले पाप धुण्यासाठी पंचगंगा डोहात स्नान करून दुसरी आत्मक्लेश यात्रा काढावी. काशीला जाऊन गंगेत स्नान करून तेथे पापक्षालन करावे, अशी बोचरी टीका कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली.

कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आल्यानंतर सदाभाऊ खोत बिंदू चौक येथील भाजप कार्यालयात विजयोत्सव साजरा करण्याकरिता आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि संजय मंडलिक, धैर्यशील माने यांचा विजय त्यांनी शेतकऱ्यांना अर्पण केला.

शेट्टी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन शेतकरी चळवळीचा विश्वासघात केला. ज्यांनी शेतकऱ्यांचे वाटोळे केले, त्या पक्षांशी शेट्टी यांनी अभद्र युती केली हे शेतकऱ्यांना आवडले नाही. राष्ट्रवादी म्हणजे चोरांच्या आळंदीला जाणारी टोळी आहे अशी टीका त्यांनी केली; पण तेच या चोरांच्या टोळीत सामील झाले. शेतकऱ्यांचा हा अपमान होता, असे सांगत खोत म्हणाले की, शेट्टी यांना व्यक्तिद्वेषाने पछाडले होते. ‘मी’ची बाधा त्यांना झाली होती. शेतकऱ्यांना माझ्यामुळेच न्याय मिळतोय, मी देवाचा प्रेषित म्हणून जन्माला आलोय, अशी त्यांची भावना झाली होती. शेतकऱ्यांनी पराभव केल्यामुळे त्यांनी आता काशीला जाऊन पापक्षालन करावे. त्यांनी गंगेत स्नान करून तेथेच थांबावे. शेट्टी दुसरी आत्मक्लेश यात्रा कधी काढतात याची मी वाट पाहतोय.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिला तर आपण वाळव्यातून विधानसभेची निवडणूक लढवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालkolhapurकोल्हापूरkolhapur-pcकोल्हापूरhatkanangle-pcहातकणंगलेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019