शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
2
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
3
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
4
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
6
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
7
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?
8
कर्जमाफी मागणाऱ्या शेतकऱ्यांना अजित पवारांनी दिला हिशेब, म्हणाले, "जरा सबुरीने घ्या..."
9
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
10
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
11
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
12
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
13
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
14
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
15
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
16
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
17
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
18
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
19
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
20
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले

विश्वासघातामुळे राजू शेट्टींनी ‘स्वाभिमानी’ चळवळ संपवली, वैभव कांबळे यांचा आरोप  

By राजाराम लोंढे | Updated: November 1, 2024 14:28 IST

जिल्हाध्यक्षपदाचा दिला राजीनामा : ‘हातकणंगले’तून लढणारच

कोल्हापूर : माजी खासदार राजू शेट्टी यांनी राजकारणासाठी स्वाभिमानी शेतकऱ्यांची चळवळ विकली असून विश्वासघातकी राजकारणामुळे महाराष्ट्रातील एक-एक बिनिचे शिलेदार सोडून जात आहे. चळवळीला ते सत्तेत जाण्याचे साधन म्हणून वापरत आहेत, हे घातक असून आगामी काळात शेतकऱ्यांचे रक्क सांडून ताकदवान बनलेली चळवळीला ओहोटी लागल्याचे दिसेल, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी टीका केली. त्यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांच्याकडे दिला. वैभव कांबळे म्हणाले, आतापर्यत शेट्टी यांनी भारत भालके, देवेंद्र भुयार, संजय घाटगे, अमरसिंह पाटील यांना उमेदवारी दिली, पण निवडणूकीनंतर संघटनेकडे त्यांनी पाहिलेही नाही. आताही सुजीत मिणचेकर हेही यापेक्षा वेगळे करणार नाहीत. शेट्टी यांच्या या वागणूकीमुळेच आतापर्यंत रविकांत तुपकर यांच्यासह अनेकजण चळवळीपासून दूर गेले. यावेळी शिवाजी आंबेकर, सुनील पाेवार, सुहास लाटवडेकर आदी उपस्थित हाेते. 

प्रा. पाटील, मादनाईक यांची भूमिका लवकरचपक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील हेही शेट्टी यांच्या भूमिकेने अस्वस्थत आहेत. सावकर मादनाईक यांनी तर उघड भूमिका घेतली आहे. लवकरच या दोघांची भूमिका स्पष्ट होईल, असे कांबळे यांनी सांगितले.

अन् मादनाईक रुग्णालयात‘हातकंगले’त जसे फसवले तसेच शिरोळमध्ये झाले. उल्हास पाटील यांची उमेदवारीची घोषणा केल्यानंतर सावकार मादनाईक यांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आयुष्यभर चळवळीत घालवून ही अवस्था होत असेल तर नेतृत्वाबद्दल काय बोलाचये? असा प्रश्न वैभव कांबळे यांनी केला.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRaju Shettyराजू शेट्टीhatkanangle-acहातकणंगलेwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024