शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

राजकवी पंडितराज जगन्नाथ यांचे कार्य राष्ट्रीय : नाय्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:57 IST

तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराजकवी पंडितराज जगन्नाथ यांचे कार्य राष्ट्रीय : नाय्करनाट्यसंहितेचे उद्या प्रकाशन : वैजनाथ महाजन, रवींद्र ठाकूर, नंदकुमार मोरे प्रमुख वक्ते

कोल्हापूर : तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मूळ कन्नड नाटकाच्या संस्कृति-संगम या मराठीत अनुवाद केलेल्या नाट्यसंहितेचा प्रकाशन समारंभ उद्या, रविवारी करवीर नगर वाचन मंदिर येथे दुपारी ४.३० वाजता होणार आहे.डॉ. नाय्कर यांनी ४० वर्षांत कन्नड आणि संस्कृत या भाषांत ५० दुर्मीळ पुस्तकांचे लिखाण केले आहे. कन्नड नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध वाचले आहेत.

हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि वैश्विक समताभाव यांवर आधारित ऐतिहासिक विषयावरील त्यांनी लिहिलेल्या संस्कृति-संगम या डॉ. अ. रा. यार्दी यांनी लिहिलेल्या मराठी नाटकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात होत आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. संजय ठिगळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.सन १५९० ते १६६५ असा कालखंड असलेल्या जगन्नाथ पंडितराज यांनीच ताज महाल हे नाव दिले. हिंदू असूनही ते शाहजहानच्या दरबारात राजकवी होते. ‘अलंकारसम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंडितराज यांच्या वलयामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात ‘पंडितराय’ हे पद निर्माण केले. त्यांच्यावर पद्मनाभ सोमय्या यांनी १९७० मध्ये कादंबरी लिहिली आहे.

ज्येष्ठ लेखक विद्याधर गोखले यांनीही त्यांच्यावर नाटक लिहिले आहे. याशिवाय एस. एन. कित्तूर यांनी १९७३ मध्ये लिहिलेले नभोनाट्य धारवाड आकाशवाणीवर, तर १९७८ मध्ये हैदराबाद आकाशवाणीवर त्याचा उर्दू अनुवाद प्रसारित झाला आहे, अशी माहिती डॉ. नाय्कर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूरचे प्रकाशक प्रा. वसंत खोत, प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर आणि सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Natakनाटकliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर