शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

राजकवी पंडितराज जगन्नाथ यांचे कार्य राष्ट्रीय : नाय्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:57 IST

तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराजकवी पंडितराज जगन्नाथ यांचे कार्य राष्ट्रीय : नाय्करनाट्यसंहितेचे उद्या प्रकाशन : वैजनाथ महाजन, रवींद्र ठाकूर, नंदकुमार मोरे प्रमुख वक्ते

कोल्हापूर : तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मूळ कन्नड नाटकाच्या संस्कृति-संगम या मराठीत अनुवाद केलेल्या नाट्यसंहितेचा प्रकाशन समारंभ उद्या, रविवारी करवीर नगर वाचन मंदिर येथे दुपारी ४.३० वाजता होणार आहे.डॉ. नाय्कर यांनी ४० वर्षांत कन्नड आणि संस्कृत या भाषांत ५० दुर्मीळ पुस्तकांचे लिखाण केले आहे. कन्नड नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध वाचले आहेत.

हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि वैश्विक समताभाव यांवर आधारित ऐतिहासिक विषयावरील त्यांनी लिहिलेल्या संस्कृति-संगम या डॉ. अ. रा. यार्दी यांनी लिहिलेल्या मराठी नाटकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात होत आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. संजय ठिगळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.सन १५९० ते १६६५ असा कालखंड असलेल्या जगन्नाथ पंडितराज यांनीच ताज महाल हे नाव दिले. हिंदू असूनही ते शाहजहानच्या दरबारात राजकवी होते. ‘अलंकारसम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंडितराज यांच्या वलयामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात ‘पंडितराय’ हे पद निर्माण केले. त्यांच्यावर पद्मनाभ सोमय्या यांनी १९७० मध्ये कादंबरी लिहिली आहे.

ज्येष्ठ लेखक विद्याधर गोखले यांनीही त्यांच्यावर नाटक लिहिले आहे. याशिवाय एस. एन. कित्तूर यांनी १९७३ मध्ये लिहिलेले नभोनाट्य धारवाड आकाशवाणीवर, तर १९७८ मध्ये हैदराबाद आकाशवाणीवर त्याचा उर्दू अनुवाद प्रसारित झाला आहे, अशी माहिती डॉ. नाय्कर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूरचे प्रकाशक प्रा. वसंत खोत, प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर आणि सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Natakनाटकliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर