शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

राजकवी पंडितराज जगन्नाथ यांचे कार्य राष्ट्रीय : नाय्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 13:57 IST

तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देराजकवी पंडितराज जगन्नाथ यांचे कार्य राष्ट्रीय : नाय्करनाट्यसंहितेचे उद्या प्रकाशन : वैजनाथ महाजन, रवींद्र ठाकूर, नंदकुमार मोरे प्रमुख वक्ते

कोल्हापूर : तेलंगणा राज्यातील जगन्नाथ पंडित या शाहजहान राजाच्या दरबारातील राजकवीचा जीवनपट सर्वांसमोर यावा आणि त्यांचे कार्य कसे राष्ट्रीय होते, याची माहिती सर्वांना मिळावी, या उद्देशाने त्यांच्या जीवनावरील नाटक लिहिल्याची माहिती कन्नड आणि संस्कृत भाषांतील धारवाड येथील प्रतिभावंत लेखक डॉ. चंद्रमौळी एस. नाय्कर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

मूळ कन्नड नाटकाच्या संस्कृति-संगम या मराठीत अनुवाद केलेल्या नाट्यसंहितेचा प्रकाशन समारंभ उद्या, रविवारी करवीर नगर वाचन मंदिर येथे दुपारी ४.३० वाजता होणार आहे.डॉ. नाय्कर यांनी ४० वर्षांत कन्नड आणि संस्कृत या भाषांत ५० दुर्मीळ पुस्तकांचे लिखाण केले आहे. कन्नड नाटक आणि मालिकांमध्ये त्यांनी अभिनयही केला आहे. दहाहून अधिक आंतरराष्ट्रीय परिषदांत शोधनिबंध वाचले आहेत.

हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि वैश्विक समताभाव यांवर आधारित ऐतिहासिक विषयावरील त्यांनी लिहिलेल्या संस्कृति-संगम या डॉ. अ. रा. यार्दी यांनी लिहिलेल्या मराठी नाटकाचा प्रकाशन समारंभ कोल्हापुरात होत आहे. ज्येष्ठ समीक्षक प्रा. वैजनाथ महाजन यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. संजय ठिगळे हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.सन १५९० ते १६६५ असा कालखंड असलेल्या जगन्नाथ पंडितराज यांनीच ताज महाल हे नाव दिले. हिंदू असूनही ते शाहजहानच्या दरबारात राजकवी होते. ‘अलंकारसम्राट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंडितराज यांच्या वलयामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळात ‘पंडितराय’ हे पद निर्माण केले. त्यांच्यावर पद्मनाभ सोमय्या यांनी १९७० मध्ये कादंबरी लिहिली आहे.

ज्येष्ठ लेखक विद्याधर गोखले यांनीही त्यांच्यावर नाटक लिहिले आहे. याशिवाय एस. एन. कित्तूर यांनी १९७३ मध्ये लिहिलेले नभोनाट्य धारवाड आकाशवाणीवर, तर १९७८ मध्ये हैदराबाद आकाशवाणीवर त्याचा उर्दू अनुवाद प्रसारित झाला आहे, अशी माहिती डॉ. नाय्कर यांनी दिली. या पत्रकार परिषदेस अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूरचे प्रकाशक प्रा. वसंत खोत, प्रा. डॉ. रवींद्र ठाकूर आणि सहजसेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे उपस्थित होते. 

 

टॅग्स :Natakनाटकliteratureसाहित्यkolhapurकोल्हापूर