शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांच्या मागणीला यश; पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर'वर चर्चेस सरकार तयार
2
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
3
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
4
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
5
"विमान टेकऑफ होण्यापूर्वी तरुण म्हणाला माझ्या खिशात बॉम्ब"; प्रवाशांना फुटला घाम, प्रचंड गोंधळ
6
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
8
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
9
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
10
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
11
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
12
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
13
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
14
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
15
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
16
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
17
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
18
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
19
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
20
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर

राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कारासाठी प्रस्ताव मागवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:29 IST

कोल्हापूर: माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विकासात योगदान देणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात ...

कोल्हापूर: माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून विकासात योगदान देणाऱ्या संस्थांना राज्य शासनाच्यावतीने राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी शुक्रवारपासून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आयटी इंजिनियरिंग सर्व्हिस सॉफ्टवेअर, आयटी एनेबल्ड सर्व्हिस (बीपीओ/केपीओ), आयटी इन्फ्रास्ट्रक्चर (डेटा सेंटर), मोस्ट प्रॉमिसींग स्टार्टअप आणि स्पेशल अवाॅर्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन टु महाराष्ट्र अशा ५ विभागांत या पुरस्कारांची निवड होणार आहे. मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यावर्षीचे पुरस्कारांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल. २० ऑगस्ट २०२१ रोजी नामांकनासाठी अर्ज दाखल करण्याची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे असून १५ सप्टेंबर २०२१ ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख असेल. २७ सप्टेंबर २०२१ रोजी प्राप्त अर्जाची छाननी करण्यात येईल. ३० सप्टेंबर २०२१ रोजी छाननी समितीची प्राथमिक बैठक होईल, तर २० ऑक्टोबर २०२१ छाननी समितीची अंतिम बैठक होईल.

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पुरस्कारांची घोषणा करण्यात येईल व पारितोषिक वितरण समारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर हा आधुनिकीकरणाचा केंद्रबिंदू आहे. स्व. राजीव गांधी यांनी विज्ञान तंत्रज्ञानाचा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार व राष्ट्रीय विकासातील त्याचा परिणामकारक वापर करण्यावर भर दिला होता. त्यामुळेच दरवर्षी दि. २० ऑगस्ट हा माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांचा जन्मदिवस माहिती तंत्रज्ञान दिवस म्हणून राज्य सरकारकडून साजरा करण्यात येतो. आता त्याच्या पुढे पाऊल टाकत या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून म्हणून हे पुरस्कार दिले जाणार आहेत.