शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

नियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन्हा राजेश क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 20:19 IST

Rajesh Vinayakrao Kshirsagar Shivasena Kolhapur-राज्य नियोजन मंडळाचे शासनाने पुनर्गठन केले असून समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविली आहे. जून २०१९ पासून ते यापदावर आहेत. सध्या कोल्हापूरात महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर गटाला ताकद देणारा हा निर्णय आहे.

ठळक मुद्देनियोजन मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षपदी पुन्हा राजेश क्षीरसागरक्षीरसागर गटाला ताकद देणारा निर्णय

कोल्हापूर : राज्य नियोजन मंडळाचे शासनाने पुनर्गठन केले असून समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदाची धुरा पुन्हा शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर सोपविली आहे. जून २०१९ पासून ते यापदावर आहेत. सध्या कोल्हापूरात महापालिकेच्या निवडणूकीच्या हालचाली सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर गटाला ताकद देणारा हा निर्णय आहे.फेरनिवडीनंतर क्षीरसागर म्हणाले, राज्य नियोजन मंडळ हा मंत्रालयीन प्रशासकीय विभागातील एक महत्त्वपूर्ण विभाग असून, राज्य आणि जिल्हा पातळीवर पंचवार्षिक योजना आणि वार्षिक योजना तयार करण्याचे विभागाचे प्रमुख कार्य आहे. मानव विकासावर आधारित योजना राबविण्यासाठी ४०० कोटी रुपये निधी वितरणाचे अधिकार पुढील काळात मिळणार आहेत. या माध्यमातून राज्याचा विकास साधण्याचा नक्कीच प्रयत्न करू.विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य नियोजन मंडळ वगळता सर्व समित्या शासनाने बरखास्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या या मंडळाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर क्षीरसागर यांची नियुक्ती कायम ठेवली व त्यास मंत्री पदाचा दर्जा दिला. मंत्रालयासमोरील प्रशासकीय इमारतीमध्ये १८ व्या मजल्यावर या मंडळाचे कार्यालय आहे. या मंडळाचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपाध्यक्ष असून सदस्य म्हणून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, नियोजन राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्यासह शासकीय अधिकारी आहेत.

टॅग्स :Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागरShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर