शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

ग्राऊंड रिपोर्ट : राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:41 IST

Flood Kolhapur : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देराजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली : दुकानांना वेळ वाढवून देण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे तीन महिने जीवनावश्यक, अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहिली. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार दि. १९ जुलैपासून दुकाने सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला. मात्र, तीननंतर जोरदार पाऊस आणि महापुरामुळे पुन्हा चार दिवस दुकाने बंद झाली.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून दुकाने पूर्ववत सुरू झाली. राजारामपुरी व्यापारपेठेत रेडिमेड गारमेंट, ज्वेलर्स, गिफ्ट आर्टीकल, फूड प्रॉडक्ट, मेडिकल, आदी १,७०० दुकाने आहेत. त्यातील ८० दुकानांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. कोरोनानंतर महापुरातून सावरून दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली आहे.

राजारामपुरी व्यापारपेठ दृष्टिक्षेपात

  • दुकानांची संख्या : १,७००
  • वार्षिक उलाढाल : ७०० कोटी

 

व्यापार, व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी चारपर्यंत आहे. पण, राजारामपुरीतील बहुतांश दुकाने १० वाजता उघडण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. कोरोना आणि महापुराचा बसलेला फटका लक्षात घेऊन शासनाने सर्व दुकाने रात्रीनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. विकेंड लॉकडाऊनही रद्द करावा.-ललित गांधी,अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन

गेल्या तीन दिवसांपासून राजारामपुरीतील आमचे दुकाने पूर्ववत सुरू झाले आहे. ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व्यवहारांची गतीही वाढत आहे. दुकाने सुरू ठेवण्याची सध्याची वेळ गैरसोयीची ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आम्हा सर्व व्यापाऱ्यांना वाढवून मिळावी.- प्रशांत पोकळे,मालक, बालाजी कलेक्शन

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर