शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

ग्राऊंड रिपोर्ट : राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 17:41 IST

Flood Kolhapur : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.

ठळक मुद्देराजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली, व्यवहारांची गती वाढली : दुकानांना वेळ वाढवून देण्याची मागणी

कोल्हापूर : लॉकडाऊनमधून सवलत मिळून दुकाने सुरू होऊन कसेबसे तीन दिवस झाले असताना महापुराने पुन्हा दुकाने बंद झाली. पावसाने विश्रांती दिल्याने आणि पाणी ओसरल्याने कोल्हापूर शहरातील राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजू लागली आहे. ग्राहकांच्या संख्येबरोबरच व्यवहारांची गती थोडी वाढली आहे. कोरोना आणि महापुराने व्यापार, व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. त्यातून पूर्वपदावर येण्यासाठी दुकाने सुरू ठेवण्याची वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवून देण्याची आग्रही मागणी व्यापारी, व्यावसायिकांनी गुरुवारी केली.कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊनमुळे तीन महिने जीवनावश्यक, अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने बंद राहिली. राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळाली. त्यानुसार दि. १९ जुलैपासून दुकाने सुरू झाली. त्यामुळे व्यापाऱ्यांचा उत्साह वाढला. मात्र, तीननंतर जोरदार पाऊस आणि महापुरामुळे पुन्हा चार दिवस दुकाने बंद झाली.

पुराचे पाणी ओसरल्यानंतर आता गेल्या तीन दिवसांपासून दुकाने पूर्ववत सुरू झाली. राजारामपुरी व्यापारपेठेत रेडिमेड गारमेंट, ज्वेलर्स, गिफ्ट आर्टीकल, फूड प्रॉडक्ट, मेडिकल, आदी १,७०० दुकाने आहेत. त्यातील ८० दुकानांच्या बेसमेंटमध्ये पाणी शिरले. कोरोनानंतर महापुरातून सावरून दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारपेठ पुन्हा गजबजली आहे.

राजारामपुरी व्यापारपेठ दृष्टिक्षेपात

  • दुकानांची संख्या : १,७००
  • वार्षिक उलाढाल : ७०० कोटी

 

व्यापार, व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सध्या दुकाने सुरू ठेवण्याची वेळ सकाळी ७ ते दुपारी चारपर्यंत आहे. पण, राजारामपुरीतील बहुतांश दुकाने १० वाजता उघडण्याची पूर्वीपासूनची पद्धत आहे. कोरोना आणि महापुराचा बसलेला फटका लक्षात घेऊन शासनाने सर्व दुकाने रात्रीनऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी. विकेंड लॉकडाऊनही रद्द करावा.-ललित गांधी,अध्यक्ष, राजारामपुरी व्यापारी असोसिएशन

गेल्या तीन दिवसांपासून राजारामपुरीतील आमचे दुकाने पूर्ववत सुरू झाले आहे. ग्राहकांची संख्या वाढत असल्याने व्यवहारांची गतीही वाढत आहे. दुकाने सुरू ठेवण्याची सध्याची वेळ गैरसोयीची ठरत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दुकाने सुरू ठेवण्याची वेळ आम्हा सर्व व्यापाऱ्यांना वाढवून मिळावी.- प्रशांत पोकळे,मालक, बालाजी कलेक्शन

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूर