शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राक्षसाला उठवला; आता महाग पडेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 00:45 IST

कोल्हापूर : ‘माझ्या गुरूने मला सांगितले होते की, राक्षस झोपला असेल तर त्याला झोपू द्यावे. त्याला उठविले तर महाग पडते. विरोधकांनी आता राक्षसाला उठवले आहे. तुम्हाला ते महाग पडेल,’ असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.एक थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही साधुसंत ...

कोल्हापूर : ‘माझ्या गुरूने मला सांगितले होते की, राक्षस झोपला असेल तर त्याला झोपू द्यावे. त्याला उठविले तर महाग पडते. विरोधकांनी आता राक्षसाला उठवले आहे. तुम्हाला ते महाग पडेल,’ असा गर्भित इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.एक थोबाडीत मारल्यावर दुसरा गाल पुढे करायला मी काही साधुसंत नाही. पाय पडला तर मुंगीसुद्धा दंश केल्याशिवाय सोडत नाही. मी तर या राज्यातील बलाढ्य नेता आहे. तुमच्या साऱ्या भानगडी बाहेर काढल्याशिवाय सोडणार नाही, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.कोल्हापूरच्या वेशीवर असलेल्या गांधीनगर-उचगाव परिसरातील अवैध बांधकामे पाडण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे; परंतु २०१५ पूर्वीची अवैध बांधकामे दंड भरून नियमित करावीत, असा निर्णय राज्य सरकारनेच घेतला असल्याने ही बांधकामे पाडण्यास सरकारने स्थगिती दिली आहे. त्यावरून महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीने पालकमंत्री पाटील यांच्यावर गेले दोन दिवस आरोप केले होते. ते वाचून संतप्त झालेले मंत्री पाटील यांनी अत्यंत त्वेषाने आपल्यावरील आरोपांना प्रत्युत्तर दिले.चंद्रकांत पाटील शांत व मवाळ असल्याचे महाराष्ट्राला माहीत होते; परंतु ते चिडले तर काय करू शकतात, ते विधान परिषदेत तुम्ही पाहिले आहे. ते किती आक्रमक भाषण करू शकतात, त्याचीही झलक भाजपच्या मेळाव्यात महाराष्ट्राने अनुभवली आहे. विरोधक काहीतरी माहिती देतात आणि पत्रकारही काहीच शहानिशा न करता ती छापतात; कारण चंद्रकांत पाटीलच्या विरोधात छापले की पेपरवाल्यांचीही हेडलाईन होते; परंतु असे चुकीचे आरोप कुणी केले तर मात्र मी यापुढे गप्प बसणार नाही. मी पत्रकारांनाही हा इशारा देऊ इच्छितो. प्रत्येक गोष्टीत कोर्ट-कचेºया केल्याशिवाय मी राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.कुणाच्या अन्नात माती कालवायची नाही, असा संस्कार माझ्यावर झाला असल्याने आजपर्यंत मी कुणाच्या भानगडी बाहेर काढण्याच्या फंदात पडलो नाही. उलट चांगली सामाजिक कामे करण्यावरच भर देत आलो. या कामांबद्दल कधी चांगले म्हणण्याचा, माझे अभिनंदन करण्याचा मोठेपणा विरोधकांनी दाखविला नाही. या कामांतून मला मते मिळतील की नाही, हे आज सांगता येत नाही; परंतु त्या कामांचे मला आत्मिक समाधान मिळते. तथापि ते सगळेच सोडून नुसते खोटे आरोप माझ्यावर केले गेले तर मी ते कदापि खपवून घेणार नाही, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.व्हिक्टर पॅलेस, शालिनी पॅलेस घेतले...मंत्री पाटील म्हणाले, ‘काचेच्या घरात राहणाºयांनी दुसºयाच्या घरांवर दगड मारू नयेत, याचे भान बाळगावे. गांधीनगर-उचगाव परिसरात माझी एक खोलीच नव्हे, तर गुंठाभर जमीनही नाही. त्यामुळे तेथील बांधकामांना पाठीशी घालण्यात माझा व्यक्तिगत काहीच स्वार्थ नाही. माझे स्वत:चे राहते घर सोडले तर कुठेही इंचभर मालमत्ता नाही. काहीनी आता चंद्रकांतदादांनी कोल्हापुरातील बंद पडलेले व्हिक्टर पॅलेस व शालिनी पॅलेस ही हॉटेल्स घेतली, अशीही चर्चा सुरू केली आहे. ती ऐकून माझे मलाच हसू येते. असे आणखी मी काय-काय घेतले याची माहिती जरा मला पत्रकारांनीच द्यावी,’ असेही मंत्री पाटील यांनी हसत-हसत सुचविले.फस्त केलेल्या जागांची चौकशीकोल्हापूर : महापालिकेत गेल्या वीस वर्षांत विविध आरक्षणे उठवून फस्त केलेल्या जागांची चौकशी करणार असल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.काँग्रेसने थेट २०२४ साठीच तयारी करावीराज्यातील काँग्रेसने ओमर अब्दुला यांचा सल्ला मानावा व त्यांनी २०१९ च्या नव्हे, तर २०२४ च्या निवडणुकीचीच तयारी करावी, असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी दिला. गेल्या चार वर्षांत भाजपने सर्व निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने निवडणुका लढवून उगीच श्रम व पैसा वाया घालवू नये, म्हणजे २०२४ ला तुम्ही ताकदीने आमच्याविरोधात लढू शकाल.