शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, वरुणराजा हुलकावणी देत असल्याने चिंंता वाढली आहे.यंदा मान्सूनने वेळेत व चांगली सुरुवात केल्याने खरीप पिकांची उगवण चांगली राहिली. जूनमध्ये पावसाला ताकद लागली नसली तरी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांची वाढ जोमात झाली. उर्वरित दोन-अडीच महिन्यांत चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित होते. आॅगस्ट उजाडला आणि पावसाने दडी मारली. पहिले दोन-तीन दिवस अधूनमधून का असेना पण सरी कोसळत होत्या; पण गेले आठ-दहा दिवस पावसाने अक्षरश: पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली व भुईमूग ही पिके करपू लागल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेले दोन महिने मशागत व महागडी खते घालून पोटच्या पोरासारखे सांभाळलेली पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत.आज पाऊस येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी आहे. दिवसभर आकाशात ढग गोळा होतात; पण पाऊस हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. हाता-तोंडाला आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.नदी, विहिरीत पाणी; पण वीज गायबपावसाळ्यात साधारणपणे सप्टेंबरपर्यंत नदी व विहिरीवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद असतो. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस ओढ धरत असल्याने त्यानंतरच पिकांना पाण्याची गरज भासते; पण यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. नदी, विहिरीत पाणी आहे; पण काही ठिकाणी वीज नसल्याने पिके करपू लागली आहेत.दोन वर्षांपूर्वीची आठवण!दोन वर्षांपूर्वी पावसाने अशीच हुलकावणी दिली होती. जोमात वाढ होण्याच्या वेळेलाच पाऊस गायब झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासारखा अनुभव यंदा शेतकºयांना येऊ लागला आहे.पोषक हवामानामुळे किडींचे आक्रमणकिडीला पोषक असेच हवामान असल्याने सर्व पिकांवर विविध कीडरोगांनी आक्रमण सुरू केले आहे. सोयाबीनवर पाने खाणारी अळी, भाजीपाला व भुईमुगावर पांढºया माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव, तर भातावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.‘आॅक्टोबर हिट’चा अनुभवपावसाने दडी मारलीच, पण तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने अंग करपू लागते. रविवारी दिवसभर सरासरी २८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. उद्या, मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.तुलनात्मक पाऊस (मि.मी.), कंसात टक्केतालुका १३ आॅगस्ट २०१६ १३ आॅगस्ट २०१७हातकणंगले ४८१ (५९) २२७ (२७)शिरोळ ४५५ (११८) १४९ (३८)पन्हाळा १४६२ (१०३) ८३० (५८)शाहूवाडी १९१९ (१२४) १२३० (७९)राधानगरी १५०१ (४२) ११४१ (३२)गगनबावडा ३१७०(५६) २१११ (३७)करवीर ८६१ (१०८) ४०८(५१)कागल ९८३ (१५१) ५२० (८०)गडहिंग्लज ६८६(८७) ३३७ (४३)भुदरगड ११२६ (८३) ७९४ (५९)आजरा १५०३ (८४) ९४५ (५२)चंदगड १४८१ (५६) ११७७ (४५)एकूण १३०२ (७३) ८२२ (४६)