शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

पावसाची दडी; खरिपाने मान टाकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 00:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वरुणराजाने गेले आठ-दहा दिवस दडी मारल्याने खरिपाची पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील पिकांनी माना टाकल्या असून, जिल्ह्यातील सुमारे ३० हजार हेक्टरवरील भात, भुईमूग व नागलीची पिके करपू लागल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे. ‘आज पाऊस येईल, उद्या येईल,’ या आशेवर शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले असून, वरुणराजा हुलकावणी देत असल्याने चिंंता वाढली आहे.यंदा मान्सूनने वेळेत व चांगली सुरुवात केल्याने खरीप पिकांची उगवण चांगली राहिली. जूनमध्ये पावसाला ताकद लागली नसली तरी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. जुलैअखेर वार्षिक सरासरीच्या ४४ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे पिकांची वाढ जोमात झाली. उर्वरित दोन-अडीच महिन्यांत चांगला पाऊस होईल, असे अपेक्षित होते. आॅगस्ट उजाडला आणि पावसाने दडी मारली. पहिले दोन-तीन दिवस अधूनमधून का असेना पण सरी कोसळत होत्या; पण गेले आठ-दहा दिवस पावसाने अक्षरश: पाठ फिरविल्याने पिके धोक्यात आली आहेत. माळरान व डोंगरमाथ्यावरील भात, नागली व भुईमूग ही पिके करपू लागल्याने शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. गेले दोन महिने मशागत व महागडी खते घालून पोटच्या पोरासारखे सांभाळलेली पिके डोळ्यांदेखत करपू लागली आहेत.आज पाऊस येईल, उद्या येईल, या आशेवर शेतकरी आहे. दिवसभर आकाशात ढग गोळा होतात; पण पाऊस हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली आहे. हाता-तोंडाला आलेल्या पिकांनी पाण्याअभावी माना टाकण्यास सुरुवात केली आहे.नदी, विहिरीत पाणी; पण वीज गायबपावसाळ्यात साधारणपणे सप्टेंबरपर्यंत नदी व विहिरीवरील विद्युत पंपांचा वीजपुरवठा बंद असतो. सप्टेंबरच्या दुसºया आठवड्यापासून पाऊस ओढ धरत असल्याने त्यानंतरच पिकांना पाण्याची गरज भासते; पण यंदा परिस्थिती थोडी वेगळी आहे. नदी, विहिरीत पाणी आहे; पण काही ठिकाणी वीज नसल्याने पिके करपू लागली आहेत.दोन वर्षांपूर्वीची आठवण!दोन वर्षांपूर्वी पावसाने अशीच हुलकावणी दिली होती. जोमात वाढ होण्याच्या वेळेलाच पाऊस गायब झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यासारखा अनुभव यंदा शेतकºयांना येऊ लागला आहे.पोषक हवामानामुळे किडींचे आक्रमणकिडीला पोषक असेच हवामान असल्याने सर्व पिकांवर विविध कीडरोगांनी आक्रमण सुरू केले आहे. सोयाबीनवर पाने खाणारी अळी, भाजीपाला व भुईमुगावर पांढºया माशी व फुलकिडीचा प्रादुर्भाव, तर भातावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव दिसत आहे.‘आॅक्टोबर हिट’चा अनुभवपावसाने दडी मारलीच, पण तापमानातही कमालीची वाढ झाली आहे. सकाळी नऊ वाजल्यापासूनच सूर्य आग ओकत असल्याने अंग करपू लागते. रविवारी दिवसभर सरासरी २८ अंश सेल्सिअस तापमान राहिले. उद्या, मंगळवारी ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान खात्याचा आहे.तुलनात्मक पाऊस (मि.मी.), कंसात टक्केतालुका १३ आॅगस्ट २०१६ १३ आॅगस्ट २०१७हातकणंगले ४८१ (५९) २२७ (२७)शिरोळ ४५५ (११८) १४९ (३८)पन्हाळा १४६२ (१०३) ८३० (५८)शाहूवाडी १९१९ (१२४) १२३० (७९)राधानगरी १५०१ (४२) ११४१ (३२)गगनबावडा ३१७०(५६) २१११ (३७)करवीर ८६१ (१०८) ४०८(५१)कागल ९८३ (१५१) ५२० (८०)गडहिंग्लज ६८६(८७) ३३७ (४३)भुदरगड ११२६ (८३) ७९४ (५९)आजरा १५०३ (८४) ९४५ (५२)चंदगड १४८१ (५६) ११७७ (४५)एकूण १३०२ (७३) ८२२ (४६)