शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

पाऊस थांबला, धरणातील विसर्गही घटला, राधानगरीचे दोन दरवाजे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 17:03 IST

महापुराच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेल्या पावसाने बुधवारी किरकोळ सरी वगळता पूर्णत: विश्रांती घेतली. पाऊस थांबल्याने सर्वच धरणातून विसर्गही बंद झाला आहे. राधानगरी धरणाचे सुरु असलेले दोन स्वयंचलित दरवाजे बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद झाले.

ठळक मुद्देनद्यांच्या पाणीपातळीतही घट, १५ बंधारे वाहतूकीसाठी खुलेअद्याप ३४ बंधारे पाण्याखाली

कोल्हापूर: महापुराच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेल्या पावसाने बुधवारी किरकोळ सरी वगळता पूर्णत: विश्रांती घेतली. पाऊस थांबल्याने सर्वच धरणातून विसर्गही बंद झाला आहे. राधानगरी धरणाचे सुरु असलेले दोन स्वयंचलित दरवाजे बुधवारी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बंद झाले.

अलमट्टी धरणातूनही तब्बल १ लाख ४१ हजार क्यूसेकने विसर्ग कमी झाला आहे. नद्यांच्या पाणीपातळीतही घट होत असून पंचगंगेची पातळी ३८.११ फुटापर्यंत खाली आली आहे. कालच्या तुलनेत आणखी १५ बंधारे खुले झाले असून ३४ बंधारे अद्याप पाणीखाली आहेत.गेल्या आठवड्याच्या उत्तरार्धात जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. अवघ्या तीन चार दिवसाच्या पावसाने सर्वच नद्यांना पूर येऊन पुन्हा एकदा महापुराच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा, वारणेसह सर्वच प्रमुख नद्या इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या दिशेने वाहू लागल्या होत्या.

राधानगरीच्या सात स्वयंचलित दरवाजासह सर्वच धरणातून विसर्ग वाढवल्याने पाणीपातळी वाढून पूरपरिस्थिती निर्माण होऊन नागरीकांनी स्थलांतरही सुरु केले. दरम्यान सोमवारपासून पावसाचा जोर ओसरु लागला. मंगळवारीही पावसाने उसंत घेतली. बुधवारी दिवसभर किरकोळ सरी वगळता पावसाने उघडीप घेतली.

दरम्यान बुधवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ८.९७ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यात सर्वाधिक ५१ मिलीमीटर पाऊस गगनबावड्यात तर सर्वात कमी १.१३ मिलिमीटर पाऊस हातकणंगले झाला आहे. शिरोळ पूर्णपणे निरंक आहेत. पन्हाळा ९, शाहूवाडी १५, राधानगरी ८, भूदरगड ४, कागल व करवीर प्रत्येकी २, गडहिग्लज १, आजरा ६, चंदगड ३ मिलीमीटर पाऊस झाला आहे.-

टॅग्स :Rainपाऊसkolhapurकोल्हापूर