शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोल्हापुरात पावसाच्या हलक्या सरी, रब्बीला दिलासा

By राजाराम लोंढे | Updated: November 28, 2023 15:57 IST

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. साधारणता पंधरा मिनिटे एक सारख्या सरी कोसळत होत्या. ...

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात आज, मंगळवारी दुपारी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. साधारणता पंधरा मिनिटे एक सारख्या सरी कोसळत होत्या. ग्रामीण भागातही पावसाने हजेरी लावल्याने खोळंबलेल्या रब्बी पेरणीला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.यंदा, मान्सूनमध्येही पाऊस नाही आणि परतीचाही नाही. त्यामुळे पाणीदार जिल्ह्यात आतापासूनच नद्यांची पात्रे कोरडी पडू लागली आहे. याची झळ जानेवारी, फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्याला सोसावी लागणार आहे. गेली तीन-चार दिवस मराठवाडा, विदर्भात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. उभी पिके आडवी केली आहेत, पण कोल्हापुरात केवळ ढगाळ वातावरण राहिले. आज, मंगळवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात दुपारनंतर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे दिवसभरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज होता. मात्र कोल्हापूर शहरात दुपारी नुसता शिडकावा झाला. त्यानंतर तीन वाजता जोरदार सरी कोसळल्याने हवामानात गारवा निर्माण झाला.सध्या पावसाची गरज असून जमीनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे खरीप काढल्यानंतर शिवार मोकळी पडली आहेत. जमीनीत पाणी नसल्या विहीरांनाही पाणी कमी पडू लागले आहे. अशा परिस्थिती एक-दोन जोरदार पावसाची गरज आहे. गेल्या दोन दिवस ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र मंगळवारी हलका पाऊसच झाला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊस