शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 12:19 IST

कोल्हापूर जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

ठळक मुद्दे पावसाच्या एंट्रीने शेतकऱ्यांना दिलासा, अधूनमधून जोरदार सरीमाळरानावरील पिकांच्या तोंडात पाणी

कोल्हापूर : जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गेले १० दिवस पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली होती. विशेषत: माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार पावसाने लोकांना सळो की पळो करून सोडले होते. आता पाऊस नको नको म्हणत, पाऊस थांबविण्यासाठी देवाकडे साकडे घालण्याची वेळ आली होती. ११ आॅगस्टनंतर पाऊस हळूहळू कमी होत गेला; पण त्यानंतर एकदमच पावसाने दडी मारली. गेले १० दिवस खडखडीत ऊन पडल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत.माळरानावरील पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. १० दिवसांपूर्वी अस्ताव्यस्त पसरलेल्या नद्या, ओढ्यांचे पाणी पात्रात जाऊन शांतपणे वाहू लागले आहे. नद्यांची पाणीपातळी एकदमच कमी झाली आहे. शिवारे कोरडी पडल्याने पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे.गुरुवार, शुक्रवारपासून पावसाचे वातावरण तयार होत गेले आणि अनेक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून मात्र वातावरणात बदल होऊन ढगाळ वातावरणासह दिवसभरात जोरदार सरी कोसळल्या. पावसाने पुन्हा एंट्री केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गगनबावड्यात अतिवृष्टीशुक्रवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ८४.५९ मिलिमीटर पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ७१ मिलिमीटर झाला आहे.तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असाहातकणंगले (०.६३), शाहूवाडी (१.६७), राधानगरी (२.००), गगनबावडा (७१.००), करवीर (१.३६), कागल (०.२९), गडहिंग्लज (२.४३), भुदरगड (१.८०), आजरा (२.२५), चंदगड (१.१७). 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरFarmerशेतकरी