शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
भयानक धाडस...! प्रेक्षकांनी छेडछाड केली, प्रसिद्ध गायिकेने भर कार्यक्रमात स्वत:चे कपडे उतरविले; Video व्हायरल...
3
आता ₹३०,००० सॅलरी असेल तरी नो टेन्शन; EPF तुम्हाला बनवेल २ कोटींचा मालक, पाहा कॅलक्युलेशन
4
भारतावर २५ टक्के टॅरिफ, अमेरिकेचा धक्कादायक निर्णय; 'ट्रम्प'नितीमुळे कोणत्या वस्तू महागणार?
5
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
6
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
7
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
8
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
9
'व्हायरल गर्ल' मनीषाला नवऱ्यानेच लावला चुना; लग्नाच्या अवघ्या १० दिवसांत केलं कांड
10
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
11
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
12
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
13
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
14
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
15
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
16
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
17
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
18
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
19
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
20
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र

रेल्वे फाटक पादचाऱ्यांसाठी बंद, नागरिकांच्यामधून नाराजी; परीख पुलाखालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:46 IST

रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने उचलले पाऊल रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून केला मार्गच बंद

कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना पाहता रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला आहे.

राजारामुपरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे व मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचार्यांसाठी जवळचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज अनेक नागरिक ये - जा करत होते. आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबूभाई परिघ पूलांच्या खालून प्रवास करावा लागणार आहे. परीघ फूल अधिच अरुंद आहे. त्यामध्ये आता वाहनधारक व पदाचारी एकाच वेळी ये - जा करत असल्याने वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.

 

रेल्वे रुळावरून पदचार्यांनी प्रवास करू नये अशा वारंवार सूचना देवून सुध्दा प्रवासी येथून ये - जा करत असल्याने ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने कर्मचाऱ्यांवर तणाव येत आहे. येथील वाहतूक बंद करावी अशा सूचना वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत आल्यानेच ही शुक्रवार पासून ही वाहतूक बंद केली आहे.- विजयकुमार(रेल्वेस्थानक) प्रबंधक

वादाचे प्रसंग....रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचारी यांना आता परीघ पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेज पाणी येत असल्याने वाहनाचे पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचारी यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधवा पण त्यापूर्वी परीघ पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईने काम तात्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Railwayभारतीय रेल्वे