शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

रेल्वे फाटक पादचाऱ्यांसाठी बंद, नागरिकांच्यामधून नाराजी; परीख पुलाखालून प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:46 IST

रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने उचलले पाऊल रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून केला मार्गच बंद

कोल्हापूर : रेल्वे प्रशासनाने शुक्रवार पासून मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारा रेल्वे फाटक क्रमांक एक पादचाऱ्यांना ये - जा करण्यासाठी बंदी घातली आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मार्गावरून प्रवास करण्यासाठी आता परीख पुलाखालून ये - जा करावी लागणार आहे. याबाबत प्रवाशांमधून तीव्र नारजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्याच आठवड्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकासह परिसराची पाहणी केली होती. मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरीला जोडणारे रेल्वे फाटक क्रमांक एक या ठिकाणी घडणाऱ्या वारंवार होणाऱ्या दुर्घटना पाहता रेल्वे रूळ पादचाऱ्यांसाठी बंद करण्याचा करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता. त्यानुसार या ठिकाणी रेल्वे प्रशासनाने संरक्षक भिंत बांधून हा मार्गच बंद केला आहे.

राजारामुपरी मार्ग मध्यवर्ती बसस्थानकाकडे व मध्यवर्ती बसस्थानक ते राजारामपुरी व शाहुपूरीकडे येण्यासाठी रेल्वे फाटक हा पादचार्यांसाठी जवळचा मार्ग होता. या मार्गावरून दररोज अनेक नागरिक ये - जा करत होते. आता हा मार्ग बंद झाल्याने नागरिकांना बाबूभाई परिघ पूलांच्या खालून प्रवास करावा लागणार आहे. परीघ फूल अधिच अरुंद आहे. त्यामध्ये आता वाहनधारक व पदाचारी एकाच वेळी ये - जा करत असल्याने वाहतूकींची मोठी कोंडी होत आहे.

 

रेल्वे रुळावरून पदचार्यांनी प्रवास करू नये अशा वारंवार सूचना देवून सुध्दा प्रवासी येथून ये - जा करत असल्याने ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने कर्मचाऱ्यांवर तणाव येत आहे. येथील वाहतूक बंद करावी अशा सूचना वरिष्ठ अधिकारी यांच्यामार्फत आल्यानेच ही शुक्रवार पासून ही वाहतूक बंद केली आहे.- विजयकुमार(रेल्वेस्थानक) प्रबंधक

वादाचे प्रसंग....रेल्वे प्रशासनाने वाहतूक बंद केल्याने पादचारी यांना आता परीघ पुलाखालून प्रवास करावा लागतो, या ठिकाणी नेहमी ड्रेनेज पाणी येत असल्याने वाहनाचे पाणी येथून ये - जा करणाऱ्या पादचारी यांच्या अंगावर उडत असल्याने वादाचे प्रसंग घडत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने पादचारी पूल बांधवा पण त्यापूर्वी परीघ पूलाखालील ड्रेनेज पाईप लाईने काम तात्काळ करावे, अशी मागणी प्रवाशांच्यामधून होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरIndian Railwayभारतीय रेल्वे