शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
भारताच्या ड्रग्ज तस्करांवरील कारवाईमुळे दाऊद इब्राहिमला धक्का; आता दक्षिण आफ्रिका आणि मेक्सिकोमधील नवीन ठिकाणांचा घेतोय शोध
4
भरला संसार मोडून प्रियकरासोबत पळाली ३ मुलांची आई, जाताना पैसे अन् दागिनेही लुटून गेली; पतीची पोलिसांत धाव
5
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
6
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूममध्ये शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
7
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
8
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
9
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
10
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
11
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
12
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
13
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
14
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
15
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
16
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
17
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
18
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
19
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
20
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद संभाजीराजेंकडेच राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:27 IST

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.

कोल्हापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या ‘रायगड विकास प्राधिकरण’चे अध्यक्षपद सत्तांतरानंतरही खासदार संभाजीराजे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये गतवेळी भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी पक्षात अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. याच दरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे यांची राज्यभर असलेली प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रपतीनियुक्त खासदारपदी नियुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घालून त्यांचा सन्मान केला.याही पुढे जात त्यांनी संभाजीराजे यांच्या रायगड विकासासाठीच्या प्रयत्नांना मूर्त रूप देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपदही संभाजीराजे यांच्याकडे दिले. आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपयांची कामे या ठिकाणी झाली आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.

खासदार संभाजीराजे हे शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत. खासदार झाल्यापासून त्यांनी दिल्लीतील पुरातत्त्व विभागाशी सातत्याने संपर्क ठेवून रायगड विकासाची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी शुक्रवारी या दोघांचीही मुंबईत भेट घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे. 

नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलाच निर्णय घेताना आम्ही रायगड विकास प्राधिकरणाचा जो विकासकामांचा २० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, तोच प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे. यावरून त्यांचे किल्ल्यांवरील प्रेम दिसून येते. विविध विभागांचे अनेक प्रस्ताव असताना त्यांनी किल्ले रायगडच्या विकास प्रस्तावाला प्राधान्य दिले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.खासदार संभाजीराजे  .अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर