शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद संभाजीराजेंकडेच राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 12:27 IST

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देअशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.

कोल्हापूर : तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून स्थापन झालेल्या ‘रायगड विकास प्राधिकरण’चे अध्यक्षपद सत्तांतरानंतरही खासदार संभाजीराजे यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी किल्ले रायगडच्या विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये गतवेळी भाजप-शिवसेनेची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाचा जनाधार वाढविण्यासाठी पक्षात अनेक मान्यवरांना निमंत्रित केले होते. याच दरम्यान कोल्हापूरचे संभाजीराजे यांची राज्यभर असलेली प्रतिमा लक्षात घेऊन त्यांना राष्ट्रपतीनियुक्त खासदारपदी नियुक्त करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गळ घालून त्यांचा सन्मान केला.याही पुढे जात त्यांनी संभाजीराजे यांच्या रायगड विकासासाठीच्या प्रयत्नांना मूर्त रूप देण्यासाठी रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्षपदही संभाजीराजे यांच्याकडे दिले. आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपयांची कामे या ठिकाणी झाली आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत रायगड विकासासाठी २० कोटी रुपये मंजूर केले.

खासदार संभाजीराजे हे शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याचे वंशज आहेत. खासदार झाल्यापासून त्यांनी दिल्लीतील पुरातत्त्व विभागाशी सातत्याने संपर्क ठेवून रायगड विकासाची कामे वेगाने सुरू केली आहेत. त्यांना मानणारा राज्यात मोठा वर्ग आहे. शाहू छत्रपती आणि उद्धव ठाकरे, तसेच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यांनी शुक्रवारी या दोघांचीही मुंबईत भेट घेतली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात सत्तांतर झाले असले तरी, महामंडळे आणि समित्यांवर नवे पदाधिकारी नेमण्यात येणार असले तरी, संभाजीराजे यांच्याकडेच रायगड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची सूत्रे कायम राहण्याची शक्यता आहे. 

नूतन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिलाच निर्णय घेताना आम्ही रायगड विकास प्राधिकरणाचा जो विकासकामांचा २० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला होता, तोच प्रस्ताव त्यांनी मंजूर केला आहे. यावरून त्यांचे किल्ल्यांवरील प्रेम दिसून येते. विविध विभागांचे अनेक प्रस्ताव असताना त्यांनी किल्ले रायगडच्या विकास प्रस्तावाला प्राधान्य दिले, याबद्दल मी त्यांचे कौतुक करतो.खासदार संभाजीराजे  .अध्यक्ष, रायगड विकास प्राधिकरण 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर