शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

‘जनसुराज्य शक्ती’च्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा सुपडा साफ उडाला. गेल्या पाच वर्षांत पक्षाची सुरू असलेली वाटचाल पाहता पक्षाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्षाचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या ‘पन्हाळा-शाहूवाडी’चा गडही पक्षाला राखता आला नाही.  विनय कोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेत २००४ ला जनसुराज्य पक्षाची स्थापना करत राज्यात सुराज्य आणण्याचा विडा उचलला. या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यशही मिळाले. कोल्हापुरात तीन, तर सोलापुरात एक अशा चार ठिकाणी पक्षाला यश मिळाले; पण त्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा देत मंत्रिपद पदरात पाडून घेतले. पाच वर्षे मंत्री म्हणून काम करताना ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही. परिणामी २००९ च्या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. केवळ विनय कोरे विजयी झाले. या पराभवातून धडा घेत कोरे यांनी पक्षबांधणीत फारसे बदल केले नाहीत. आताच्या निवडणुकीत पक्षाने कोल्हापुरात चार उमेदवार उभे केले होते. शाहूवाडीतून पक्षाचे संस्थापक विनय कोरे, हातकणंलेतून राजीव आवळे, चंदगडमधून संग्रामसिंह कुपेकर, तर करवीरमधून राजू सूर्यवंशी हे रिंगणात होते. कोरे यांचा निसटता पराभव झाला; पण त्यांच्या इतर तीन उमेदवारांची दाणादाण उडाली. एकंदरीत विनय कोरे यांचा करिश्मा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)