शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘जनसुराज्य शक्ती’च्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा सुपडा साफ उडाला. गेल्या पाच वर्षांत पक्षाची सुरू असलेली वाटचाल पाहता पक्षाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्षाचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या ‘पन्हाळा-शाहूवाडी’चा गडही पक्षाला राखता आला नाही.  विनय कोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेत २००४ ला जनसुराज्य पक्षाची स्थापना करत राज्यात सुराज्य आणण्याचा विडा उचलला. या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यशही मिळाले. कोल्हापुरात तीन, तर सोलापुरात एक अशा चार ठिकाणी पक्षाला यश मिळाले; पण त्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा देत मंत्रिपद पदरात पाडून घेतले. पाच वर्षे मंत्री म्हणून काम करताना ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही. परिणामी २००९ च्या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. केवळ विनय कोरे विजयी झाले. या पराभवातून धडा घेत कोरे यांनी पक्षबांधणीत फारसे बदल केले नाहीत. आताच्या निवडणुकीत पक्षाने कोल्हापुरात चार उमेदवार उभे केले होते. शाहूवाडीतून पक्षाचे संस्थापक विनय कोरे, हातकणंलेतून राजीव आवळे, चंदगडमधून संग्रामसिंह कुपेकर, तर करवीरमधून राजू सूर्यवंशी हे रिंगणात होते. कोरे यांचा निसटता पराभव झाला; पण त्यांच्या इतर तीन उमेदवारांची दाणादाण उडाली. एकंदरीत विनय कोरे यांचा करिश्मा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)