शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

‘जनसुराज्य शक्ती’च्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह

By admin | Updated: October 21, 2014 00:19 IST

ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यासह राज्यात जनसुराज्य शक्ती पक्षाचा सुपडा साफ उडाला. गेल्या पाच वर्षांत पक्षाची सुरू असलेली वाटचाल पाहता पक्षाच्या अस्तित्वासमोर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पक्षाचे प्रभावक्षेत्र असणाऱ्या ‘पन्हाळा-शाहूवाडी’चा गडही पक्षाला राखता आला नाही.  विनय कोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसपासून फारकत घेत २००४ ला जनसुराज्य पक्षाची स्थापना करत राज्यात सुराज्य आणण्याचा विडा उचलला. या निवडणुकीत त्यांना अपेक्षित यशही मिळाले. कोल्हापुरात तीन, तर सोलापुरात एक अशा चार ठिकाणी पक्षाला यश मिळाले; पण त्यानंतर राष्ट्रवादीला पाठिंबा देत मंत्रिपद पदरात पाडून घेतले. पाच वर्षे मंत्री म्हणून काम करताना ज्या गतीने पक्षाचा विस्तार करणे अपेक्षित होते ते त्यांनी केलेच नाही. परिणामी २००९ च्या निवडणुकीत पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला. केवळ विनय कोरे विजयी झाले. या पराभवातून धडा घेत कोरे यांनी पक्षबांधणीत फारसे बदल केले नाहीत. आताच्या निवडणुकीत पक्षाने कोल्हापुरात चार उमेदवार उभे केले होते. शाहूवाडीतून पक्षाचे संस्थापक विनय कोरे, हातकणंलेतून राजीव आवळे, चंदगडमधून संग्रामसिंह कुपेकर, तर करवीरमधून राजू सूर्यवंशी हे रिंगणात होते. कोरे यांचा निसटता पराभव झाला; पण त्यांच्या इतर तीन उमेदवारांची दाणादाण उडाली. एकंदरीत विनय कोरे यांचा करिश्मा संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)