शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या पाल्याला पुन्हा पहिलीतच बसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोनाकाळात ऑनलाईन पध्दतीने शिकविले. पण, पाल्याला जर लिहिता, वाचता येत नसेल, तर पुढील वर्गात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोरोनाकाळात ऑनलाईन पध्दतीने शिकविले. पण, पाल्याला जर लिहिता, वाचता येत नसेल, तर पुढील वर्गात पाठविणे योग्य ठरणार नाही. पाल्याचे भविष्य महत्त्वाचे असल्याचे सांगत अनेक पालक हे त्यांच्या पाल्याला पुन्हा पहिलीतच बसविण्याची मागणी शाळांकडे करत आहेत. मात्र, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार (आरटीई) पालकांची ही मागणी मान्य करता येत नसल्याने शाळांसमोर पेच निर्माण झाला आहे. त्याबाबत राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्यावर्षी जूनमध्ये इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना कोरोनाच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण देण्यात आले आहे. मात्र, हे शिक्षण त्याला समजले का? हाताला धरून पहिलीच्या विद्यार्थ्याला शिकवावे लागते. मग, मोबाईलवर पीडीएफद्वारे पाठविलेली अक्षरे त्याला समजली का? जर समजली, तर प्रत्यक्षात ती लिहिता येतात का?, जर लिहिता येत नसेल, तर मग त्याला पुढच्या वर्गात प्रवेश द्यायचा का?, असे अनेक प्रश्न पालकांमध्ये निर्माण झाले आहेत. त्यामुळे आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करून त्याला पुन्हा पहिलीतच बसविण्याचा निर्णय पालक घेत आहेत. शासनाच्या आरटीई कायद्यानुसार कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवता येत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी जूनमध्ये पहिलीत प्रवेशित झालेले विद्यार्थी हे नियमानुसार यंदा जूनमध्ये इयत्ता दुसरीच्या वर्गामध्ये जाणार आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांच्यादृष्टीने निर्माण झालेला हा प्रश्न शासन, शिक्षण विभागाने गांभीर्याने विचार करून सोडविणे आवश्यक आहे.

चौकट

...तर पटसंख्येचा घोळ होणार

पाल्य प्रवेशित असलेल्या शाळेने याबाबत सकारात्मक कार्यवाही केली नाही, तर शाळा बदलून पाल्याला पहिलीमध्ये नव्याने प्रवेशित करण्याच्या पर्यायाचा पालक विचार करीत आहेत. अशा पध्दतीने जरी पाल्याला दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळाल्यास विद्यार्थी पटसंख्येचा घोळ निर्माण होणार आहे. ‘आरटीई’नुसार ते योग्य ठरणार नाही.

प्रतिक्रिया

पालकांच्या या स्वरूपातील मागणीमुळे शाळा व्यवस्थापनासमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी पहिलीमध्ये प्रवेशित झालेल्या ज्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी प्रत्यक्ष शिकविण्याची गरज आहे, त्याला पुन्हा त्याच वर्गात ठेवता येईल का? याबाबत लवकर निर्णय व्हावा.

- विश्वास केसरकर, मुख्याध्यापक, कोल्हापूर.