शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
3
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
4
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
5
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
6
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
7
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
8
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
9
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
10
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
11
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
12
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
13
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
14
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
15
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
16
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
17
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
18
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
19
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
20
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
Daily Top 2Weekly Top 5

पुष्पा भावे यांची कोल्हापुरशी वैचारीक नाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 16:55 IST

ज्येष्ठ कृतीशील विचारवंत, लेखिका, आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश असो वा आंतरजातीय विवाह असो प्रत्येक चळवळीत कृतीशील सहभागच नव्हे तर पुढाकार घेतला.

ठळक मुद्देपुष्पा भावे यांचा कोल्हापुरशी वैचारीक नाळकोल्हापुरातील प्रत्येक चळवळीत कृतीशील पुढाकार

इंदुमती गणेश

कोल्हापूर : ज्येष्ठ कृतीशील विचारवंत, लेखिका, आणि स्त्रीवादी चळवळीतील कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर गाभारा प्रवेश असो वा आंतरजातीय विवाह असो प्रत्येक चळवळीत कृतीशील सहभागच नव्हे तर पुढाकार घेतला. त्यांनी व्यवस्थेला परखडपणे जाब विचारतानाचा त्यामागचा पुरोगामी विचार रुजवला. त्यांच्या या कार्याला सलाम करत २०१८ साली त्यांना राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.पुष्पा भावे यांचे शनिवारी निधन झाले आणि त्यांचे कोल्हापुरशी असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा मिळाला. महाराष्ट्र स्त्री अभ्यास व्यासपीठचे पहिले अधिवेशन १९८९ साली गारगोटीत झाले होते तेंव्हापासून त्यांचा प्रा. डॉ. भारती पाटील यांच्याशी परिचय होता.

पुष्पाताईंचे विचार ऐकत, जगत आणि बघत भारती पाटील, मेघा पानसरे, तनुजा शिपूरकर यांच्यासारखे वैचारीक बैठक असणारे कार्यकर्ते घडले. शिवाजी विद्यापीठात आयोजित केल्या जाणाऱया अनेक कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्रांमध्ये, त्यांनी बीज भाषण केले आहे.शारदाबाई पवार अध्यासनच्या सल्लागार होत्या. तसेच विद्यापीठातर्फे शिवादी महाराज यांच्या नावाने सुरु करण्यात येणाऱया पुरस्कार समितीवरही त्या होत्या. स्त्री अभ्यास केंद्र, केशव गोरे ट्रस्ट अशा संस्थांवर त्या कार्यरत होत्या.

२००३ साली आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी जागतिकीकरण आणि स्त्रिया " या विषयावर त्यांनी विस्तृत मांडणी केली. संध्याकाळी मिरवणुकीतही त्या उत्साहाने सामील झाल्या.

आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह सहायता केंद्र आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या संदर्भातील कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यासोबत अनेकदा त्यांनी मार्गदर्शन केले. कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉ. अशोक चौसाळकर यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध कायम राहिले.दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहास संशोधक प्रा. डॉ. जयसिंगराव पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेस त्या अध्यक्षा म्हणून उपस्थित होत्या. गेल्या वर्षी विद्यापीठातील बैठक ही त्यांची अखेरची कोल्हापूर भेट होती. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर