शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
2
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
3
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
4
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
5
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
6
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
7
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
8
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
9
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
10
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
11
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
12
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
13
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
14
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
15
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
16
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
17
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
18
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
19
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
20
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप

कोल्हापूर महापालिका स्थापनेचा हेतूच असफल : चार दशकांनंतरही हद्दवाढ रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:10 IST

ज्या हेतूने आणि अपेक्षांनी कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, तो लोकप्रतिनिधींचा हेतू आणि जनतेच्या अपेक्षा चार दशकांनंतरही असफल

भारत चव्हाण ।कोल्हापूर : ज्या हेतूने आणि अपेक्षांनी कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, तो लोकप्रतिनिधींचा हेतू आणि जनतेच्या अपेक्षा चार दशकांनंतरही असफल ठरल्या आहेत. प्रस्थापित राज्यकर्त्यांनी केलेले दुर्लक्ष, नेतृत्व करणाऱ्यांना नेत्यांनी दाखविलेली उदासीनता, त्यांच्यासमोर विकासाच्या ‘मॉडेल’चा असलेला अभाव, आदी विविध कारणांनी शहराचा विकास आजही खुंटलेला पाहायला मिळतो. ज्या गतीने शहराचा विस्तार आणिविकास व्हायला पाहिजे होता तो दिसत नसल्याचे शल्य शहरवासीयांच्या मनात आजही कायम आहे.

या नगरपालिकेचे रूपांतर १५ डिसेंबर १९७२ रोजी महानगरपालिकेत झाले. महापालिकेचा ठराव करताना कै. तात्यासाहेब पाटणे, कै. पोपटराव जगदाळे, कै. बापूसाहेब मोहिते, कै. के. आर. अकोळकर, कै. सखारामबापू खराडे यांच्यासह माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, शिवाजीराव कदम, आदी मंडळींनी शेवटच्या सभागृहात महानगरपालिका करीत असतानाच त्याचबरोबर शहराची हद्दसुद्धा वाढवून द्यावी, अशी जोरदार मागणी केली होती. त्यावेळी शहरालगतच्या गावांचा आणि शहराचा आजच्याइतका विस्तारही झाला नव्हता. त्यामुळे त्या काळात निर्णय घेणे सहज शक्य होते. कोणाचा विरोध होण्याची शक्यताही नव्हती; परंतु त्यावेळी दुर्लक्ष झाले. शहरवासीयांच्या मागणीची दखल घेतली नाही. आज ४६ वर्षे होत आहेत, हा प्रश्न अद्यापही अधांतरीच राहिला आहे.

महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी आपले मतदार, आपली गावे शहरात जातील या एकाच भीतीपोटी शहराच्या हद्दवाढीला विरोध केला. हा विरोध जाहीर नसला तरी कार्यवाहीची शासनस्तरावरील फाईल बंद कपाटात कशी राहील याची त्यांनी खबरदारी घेतली. त्यानंतर प्रत्येक महापौरांच्या पहिल्या सभेत शहराची हद्दवाढ करावी, असा ठराव करायचा आणि तशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यायचे असा अनेक वर्षांचा प्रघातच पडला. शहरावर तसेच महापालिकेतील सत्ताकारणात एकहाती प्रभाव कोणत्याच नेत्यांचा नसल्यामुळे ही मागणी पुढे रेटण्यास मर्यादा पडल्या. त्या आजही कायम आहेत.भाजप सरकारने दाखविली गाजरेराज्यात भाजप सरकार आल्यावर शहराच्या हद्दवाढीची मागणी जोर धरू लागली. आंदोलनाने वातावरण तापले. त्यातून त्याला विरोधही मोठा झाला. गावांचे तसेच शेतीचे अस्तित्व, संस्कृती, अर्थव्यवस्था यांना बाधा पोहोचणार म्हणून ग्रामीण भागातून मोठा उठाव झाला. दोन्ही बाजूंनी आंदोलने सुरू झाल्यानंतर भाजप सरकारने हद्दवाढीला पर्याय म्हणून क्षेत्र विकास प्राधिकरणाचा शोध लावला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूंची बैठक घेऊन प्राधिकरण म्हणजे शहर आणि परिसरातील ४२ गावांच्या विकासाची जादूची कांडी असल्याचे भासविले.

‘प्राधिकरणास सहकार्य करा, मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे कोरा चेक दिला आहे. हवा तेवढा निधी देतो,’ अशी गाजरं दाखविली. पालकमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून दोन्ही बाजूंनी प्राधिकरणास सहमती दिली; पण गेल्या दीड वर्षात एक मुख्य कार्यकारी अधिकाºयाची नेमणूक आणि त्यांच्या कार्यालयातील चार -पाच खुर्च्या, टेबल यापलीकडे काम झाले नाही. ‘ना निधी - ना विकास’ अशी परिस्थिती आहे.

विकास आराखड्याची अंमलबजावणी नाहीचमहानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत दोन वेळा शहर विकास आराखडा तयार केला. दुसरा सुधारित विकास आराखडा १९९९ मध्ये मंजूर होऊन तो २००० सालापासून अमलात आला; पण त्याची अंमलबजावणी कितपत झाली हा तपासून पाहण्यासारखा व अभ्यासाचा विषय आहे. अनेक आरक्षित जागा मूळ मालकांच्या ताब्यात आहेत. त्यांचा मूळ हेतूने विकास झालेला नाही. अनेक डी. पी. रोडची कामे प्रलंबित राहिली आहेत.विकासाच्या मॉडेलचा अभावमहानगरपालिका स्थापन झाल्यानंतर द्वारकानाथ कपूर, ना. पा. देवस्थळे, वि. ना. मखिजा, डी. टी. जोसेफ अशा चार प्रशासकांनी पहिल्या सहा वर्षांत कारभार पाहिला. त्यांपैकी द्वारकानाथ कपूर यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांनी शहरातील बºयाच जागा विकसित केल्या. रस्ते रुंदीकरण केले.विकासकामांची यादी करून त्यांची अंमलबजावणी केली; पण त्यानंतर आलेल्या प्रशासकांकडून नवीन काही झाले नाही, मागच्याच धोरणांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी जोर दिला. त्यानंतरच्या काळात शहराच्या विकासाचे मॉडेल काही तयार झाले नाही. दूूरदृष्टीच्या अभावाचे हे लक्षण आहे.

 

आम्ही ज्या अपेक्षेने महानगरपालिका स्थापन करण्याचा ठराव केला, त्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. हद्दवाढ व्हावी अशी आमची मागणी होती. तीही अद्याप अपूर्णच राहिली. हद्दवाढ न झाल्याने शहराचा विकास झालेला नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढले नाही. नागरिकांना चांगल्या सेवा-सुविधा देऊ शकलो नाही.- प्रल्हाद चव्हाण,माजी महापौर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका