शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कोल्हापूर महापालिका स्थापनेचा हेतूच असफल : चार दशकांनंतरही हद्दवाढ रेंगाळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 19:10 IST

ज्या हेतूने आणि अपेक्षांनी कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, तो लोकप्रतिनिधींचा हेतू आणि जनतेच्या अपेक्षा चार दशकांनंतरही असफल

भारत चव्हाण ।कोल्हापूर : ज्या हेतूने आणि अपेक्षांनी कोल्हापूर नगरपालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत करण्यात आले, तो लोकप्रतिनिधींचा हेतू आणि जनतेच्या अपेक्षा चार दशकांनंतरही असफल ठरल्या आहेत. प्रस्थापित राज्यकर्त्यांनी केलेले दुर्लक्ष, नेतृत्व करणाऱ्यांना नेत्यांनी दाखविलेली उदासीनता, त्यांच्यासमोर विकासाच्या ‘मॉडेल’चा असलेला अभाव, आदी विविध कारणांनी शहराचा विकास आजही खुंटलेला पाहायला मिळतो. ज्या गतीने शहराचा विस्तार आणिविकास व्हायला पाहिजे होता तो दिसत नसल्याचे शल्य शहरवासीयांच्या मनात आजही कायम आहे.

या नगरपालिकेचे रूपांतर १५ डिसेंबर १९७२ रोजी महानगरपालिकेत झाले. महापालिकेचा ठराव करताना कै. तात्यासाहेब पाटणे, कै. पोपटराव जगदाळे, कै. बापूसाहेब मोहिते, कै. के. आर. अकोळकर, कै. सखारामबापू खराडे यांच्यासह माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, शिवाजीराव कदम, आदी मंडळींनी शेवटच्या सभागृहात महानगरपालिका करीत असतानाच त्याचबरोबर शहराची हद्दसुद्धा वाढवून द्यावी, अशी जोरदार मागणी केली होती. त्यावेळी शहरालगतच्या गावांचा आणि शहराचा आजच्याइतका विस्तारही झाला नव्हता. त्यामुळे त्या काळात निर्णय घेणे सहज शक्य होते. कोणाचा विरोध होण्याची शक्यताही नव्हती; परंतु त्यावेळी दुर्लक्ष झाले. शहरवासीयांच्या मागणीची दखल घेतली नाही. आज ४६ वर्षे होत आहेत, हा प्रश्न अद्यापही अधांतरीच राहिला आहे.

महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर स्थानिक राजकीय नेत्यांनी आपले मतदार, आपली गावे शहरात जातील या एकाच भीतीपोटी शहराच्या हद्दवाढीला विरोध केला. हा विरोध जाहीर नसला तरी कार्यवाहीची शासनस्तरावरील फाईल बंद कपाटात कशी राहील याची त्यांनी खबरदारी घेतली. त्यानंतर प्रत्येक महापौरांच्या पहिल्या सभेत शहराची हद्दवाढ करावी, असा ठराव करायचा आणि तशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यायचे असा अनेक वर्षांचा प्रघातच पडला. शहरावर तसेच महापालिकेतील सत्ताकारणात एकहाती प्रभाव कोणत्याच नेत्यांचा नसल्यामुळे ही मागणी पुढे रेटण्यास मर्यादा पडल्या. त्या आजही कायम आहेत.भाजप सरकारने दाखविली गाजरेराज्यात भाजप सरकार आल्यावर शहराच्या हद्दवाढीची मागणी जोर धरू लागली. आंदोलनाने वातावरण तापले. त्यातून त्याला विरोधही मोठा झाला. गावांचे तसेच शेतीचे अस्तित्व, संस्कृती, अर्थव्यवस्था यांना बाधा पोहोचणार म्हणून ग्रामीण भागातून मोठा उठाव झाला. दोन्ही बाजूंनी आंदोलने सुरू झाल्यानंतर भाजप सरकारने हद्दवाढीला पर्याय म्हणून क्षेत्र विकास प्राधिकरणाचा शोध लावला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन्ही बाजूंची बैठक घेऊन प्राधिकरण म्हणजे शहर आणि परिसरातील ४२ गावांच्या विकासाची जादूची कांडी असल्याचे भासविले.

‘प्राधिकरणास सहकार्य करा, मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे कोरा चेक दिला आहे. हवा तेवढा निधी देतो,’ अशी गाजरं दाखविली. पालकमंत्र्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून दोन्ही बाजूंनी प्राधिकरणास सहमती दिली; पण गेल्या दीड वर्षात एक मुख्य कार्यकारी अधिकाºयाची नेमणूक आणि त्यांच्या कार्यालयातील चार -पाच खुर्च्या, टेबल यापलीकडे काम झाले नाही. ‘ना निधी - ना विकास’ अशी परिस्थिती आहे.

विकास आराखड्याची अंमलबजावणी नाहीचमहानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत दोन वेळा शहर विकास आराखडा तयार केला. दुसरा सुधारित विकास आराखडा १९९९ मध्ये मंजूर होऊन तो २००० सालापासून अमलात आला; पण त्याची अंमलबजावणी कितपत झाली हा तपासून पाहण्यासारखा व अभ्यासाचा विषय आहे. अनेक आरक्षित जागा मूळ मालकांच्या ताब्यात आहेत. त्यांचा मूळ हेतूने विकास झालेला नाही. अनेक डी. पी. रोडची कामे प्रलंबित राहिली आहेत.विकासाच्या मॉडेलचा अभावमहानगरपालिका स्थापन झाल्यानंतर द्वारकानाथ कपूर, ना. पा. देवस्थळे, वि. ना. मखिजा, डी. टी. जोसेफ अशा चार प्रशासकांनी पहिल्या सहा वर्षांत कारभार पाहिला. त्यांपैकी द्वारकानाथ कपूर यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांनी शहरातील बºयाच जागा विकसित केल्या. रस्ते रुंदीकरण केले.विकासकामांची यादी करून त्यांची अंमलबजावणी केली; पण त्यानंतर आलेल्या प्रशासकांकडून नवीन काही झाले नाही, मागच्याच धोरणांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी जोर दिला. त्यानंतरच्या काळात शहराच्या विकासाचे मॉडेल काही तयार झाले नाही. दूूरदृष्टीच्या अभावाचे हे लक्षण आहे.

 

आम्ही ज्या अपेक्षेने महानगरपालिका स्थापन करण्याचा ठराव केला, त्या अपेक्षा फोल ठरल्या आहेत. हद्दवाढ व्हावी अशी आमची मागणी होती. तीही अद्याप अपूर्णच राहिली. हद्दवाढ न झाल्याने शहराचा विकास झालेला नाही. महापालिकेचे उत्पन्न वाढले नाही. नागरिकांना चांगल्या सेवा-सुविधा देऊ शकलो नाही.- प्रल्हाद चव्हाण,माजी महापौर 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका