शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
2
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलिन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
3
"ज्यांनी तुम्हाला हिंदुत्व शिकवलं त्या बाळासाहेबांच्या कुटुंबाला..."; बाळा नांदगावकरांचा टोला
4
"मुंबईचे मारेकरी कोण? राजकीय स्वार्थासाठी मराठी माणसाला वापरले"; भाजपाचा ठाकरेंना टोला
5
निर्मला सीतारामन यांचं एक वक्तव्य आणि 'या' शेअर्सना लागले पंख; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
6
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
7
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
8
Chandrapur Farmer : किडनी वीक पण कर्ज फेड ! सावकाराच्या सांगण्यावरून शेतकऱ्याने ८ लाखांना विकली किडनी; कंबोडियात जाऊन केले ऑपेरेशन
9
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
10
धक्कादायक! ७ वर्षांच्या मुलीचा तिसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू, आईनेच खाली फेकल्याचा संशय  
11
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
12
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
13
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
14
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
15
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
16
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
17
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
18
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
19
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
20
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
Daily Top 2Weekly Top 5

kolhapur: पुरणपोळी खाल्ली; परंतु विजयाचा गोडवा चाखला नाही; आवाडे-माने मनोमिलनाचा अनुभव जुना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 16:57 IST

फडणवीस यांना त्रास नको..

अतुल आंबीइचलकरंजी : पारंपरिक विरोधक असलेल्या माने-आवाडे यांच्यात समेट घडवत वरिष्ठांनी सूत जुळवले. पंधरा वर्षांपूर्वी २००९ च्या निवडणुकीत निवेदिता माने आणि आवाडे यांच्यात असाच समेट घडला होता. त्यावेळी दोघांनी पुरणपोळी खाऊन आम्ही एक झालो, असा संदेश जरूर दिला; परंतु प्रत्यक्षात त्या निवडणुकीत निवेदिता माने यांचा राजू शेट्टींकडून पराभव झाला. माने गटाला विजयाचा गोडवा चाखता आला नाही. या जुन्या आठवणींची इचलकरंजीकरांना मंगळवारी पुन्हा आठवण झाली. निमित्त होते प्रकाश आवाडे यांच्या निवडणुकीतील माघारीचे.गेल्या पाच वर्षांतील दोघांत झालेली धुसफूस पाहता यंदा प्रत्यक्षात मनोमिलन होणार का, याकडे आता मतदारसंघाचे लक्ष लागले आहे. माने आणि आवाडे घराण्यात पारंपरिक राजकीय संघर्ष आहे. त्यात १५ वर्षांपूर्वी सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत निवेदिता माने यांच्याविरोधात राहुल आवाडे यांनी पहिल्यांदाच लोकसभा लढविण्याची घोषणा केली. त्यानिमित्ताने खासदारकीचा मतदारसंघ पिंजून काढत जुन्या गटांना सक्रिय करण्यास सुरुवात केली;परंतु त्यावेळी कल्लाप्पाण्णा आवाडे यांची काँग्रेसबद्दलची एकनिष्ठता असल्याने वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर राहुल यांना शांत करण्यात आले आणि माने-आवाडे या दोघांच्यात समेट घडविण्यात आला. त्यावेळी गुढीपाडव्यानिमित्ताने आवाडे यांच्या बंगल्यावर पुरणपोळीचे जेवण करून आम्ही एकत्र झालो असल्याचे जाहीर केले. निवेदिता माने यांचा प्रचार करणार असल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात तसे फारसे घडले नाही.

या निवडणुकीतही राहुल आवाडे यांनी लोकसभेची तयारी सुरू केली. सुरुवातीला भाजपकडून उमेदवारी मिळेल, या आशेवर जोरदार काम सुरू झाले; परंतु माने यांची उमेदवारी कायम राहिली आणि राहुल यांचा पत्ता कट झाला. त्यामुळे त्यांनी उमेदवारीसाठी उद्धवसेनेची चाचपणी केली. त्यातूनही काही होत नसल्याचे पाहून अखेर अपक्षाचा नारा दिला. या बंडाला धार यावी, यासाठी राहुल यांचे नाव बाजूला करत आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव पुढे आणले आणि ताकद दाखवून दिली.

आवाडेंच्या उमेदवारीमुळे धैर्यशील यांना धोका निर्माण होणार, हे जाणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना फिल्डिंग लावली. दोन बैठका आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून फोन करून आवाडेंचे बंड थंड केले. त्यानंतर इचलकरंजी मतदारसंघात सर्व जुन्या चर्चांना नव्याने सुरुवात झाली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत दोघांतील मनोमिलन खासदार माने यांना विजयापर्यंत कसे नेते, याकडे लक्ष लागले आहे.

फडणवीस यांना त्रास नको..आवाडेंच्या बंडखोरीमागे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव येत असल्याने त्यांची अडचण होऊ नये, यासाठी माघार घेतल्याचे आवाडे गोटातून सांगण्यात आले.

संघर्ष कशामुळे?इचलकरंजीतील कृष्णा पाणीपुरवठा योजनेची पाच किलोमीटरची पाइपलाइन बदलणे, सहा जलकुंभांची उभारणी, शंभर कोटींचे रस्ते अशा कामांमध्ये माने यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी नाव न घेता केला होता. त्यातून दोघांतील संघर्ष वाढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणPrakash Awadeप्रकाश आवाडेdhairyasheel maneधैर्यशील माने