शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पालेभाज्या महागल्या, कोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; दुधाची तहान ताकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 11:33 IST

गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्देकोल्हापूरकरांना कडधान्यांचा आधार; चढे दर खिशाला परवडेनासेपूरपरिस्थितीमुळे पालेभाज्यांची आवक मंदावली

कोल्हापूर : गेल्या आठवडाभरात कोल्हापूर शहराला चोहोबाजंूनी पुराच्या पाण्याने वेढले होते. त्यामुळे जिल्ह्यासह परजिल्ह्यातून येणाऱ्या पालेभाज्यांची आवक कमी झाली आहे. याशिवाय उपलब्ध झालेल्या पालेभाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे नाहीत. परिणामी शहरवासीयांना जेवणात भाजीला पर्याय म्हणून कडधान्यांचा आधार घ्यावा लागत आहे.रोजच्या जेवणात नियमितपणे अनेकांना भाजीपाला असल्याशिवाय जेवण जात नाही. मात्र, अशा खवय्यांना गेल्या आठवडाभरात केवळ आणि केवळ कडधान्यांचे मोड आलेले उसळ, आमटीवरच पालेभाजीची तल्लफ भागवावी लागत आहे. अशा या कडधान्यांमध्ये स्वयंपाक त्वरित होणारा पदार्थ म्हणून मसूरडाळ सध्या जोर सुरू आहे.

पूरग्रस्तांच्या पातळ भाजीमध्ये हाच पदार्थ अधिक दिसत आहे. याशिवाय मूग, चवळी अशा कडधान्यांची उसळ जेवणात हमखास दिसत आहे. या कडधान्यांचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आहेत. घाऊक बाजारात मसूर ६० रुपये नियमित, तर बेळगावी १२० ते १३० रुपये असा प्रतिकिलो दर आहे.

मटकी १२०, तर मूग ७० ते ८० रुपये किलोप्रमाणे आहे. हाच दर किरकोळ व्यापाऱ्यांकडे दहा ते वीस रुपये जादा दराने ग्राहकांना पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा कल असे कडधान्य खरेदीकडे वाढला आहे. त्यामुळे दुधाची तहान ताकावर भागविली जात आहे. दर कमी असल्याने अशा प्रकारची भाजी रोजच्या जेवणात हमखास मेन्यू बनली आहे. 

 

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरvegetableभाज्या