शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

विषबाधा होऊन मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या: मल्हारसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 11:39 IST

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील फयेपैकी लिंगाडीच्या धनगर वाड्यावरील कविता व मंगल बाजारी या दोन बहिणींचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. ...

ठळक मुद्देविषबाधा होऊन मृत्यू झालेल्या मुलींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्या: मल्हारसेनेची मागणी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला निवेदन : भुदरगड तालुक्यातील घटना

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील फयेपैकी लिंगाडीच्या धनगर वाड्यावरील कविता व मंगल बाजारी या दोन बहिणींचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये अनुदान मंजूर करावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन मल्हार सेनेतर्फे सोमवारी जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.मल्हारसेनेचे अध्यक्ष बबन रानगे व जिल्हाध्यक्ष बयाजी शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार शीतल मुळे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.निवेदनात म्हटले आहे की, लिंगाडीच्या धनगरवाड्यावर कोंडीबा बाजारी व पत्नी ठकुबाई बाजारी हे त्यांच्या कविता व मंगल या दोन्ही मुली व एका मुलासह धनगर वाड्यावर राहत होते. भूमिहीन असल्याने, पावसाळ्यात रोजगार मिळत नसल्याने भीक मागून कुटुंबाचा चरितार्थ ते चालवित होते; परंतु या पाचही जणांवर शिळे अन्न खाल्ल्याने विषबाधा झाली.

यामध्ये दोघी बहिणींना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दोन्हीही प्रेते जवळच दफन करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर ७0 वर्षांनंतरही महाराष्ट्रातील धनगरांच्या वाट्याला हालअपेष्टाच असल्याचे खेदाने म्हणावे लागत आहे. ही घटना महसूलमंत्र्यांच्याच तालुक्यात घडते, हे दुर्दैवी आहे.शिष्टमंडळात राघु हजारे, छगन नांगरे, शहाजी सिद, बाबूराव बोडके, देवाप्पा बोडके, बबलू फाले, बाळासो दार्इंगडे, आण्णासो कोळेकर, विक्रम शिणगारे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर