शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

सीमावासीयांच्या पाठिंब्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये आंदोलन, 'मविआ'चा निर्णय

By समीर देशपांडे | Updated: December 7, 2022 18:05 IST

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद चिघळण्याची चिन्हे

समीर देशपांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: जिल्हा नेहमीच सीमा वासियांच्या पाठीशी खंबीरपणे राहिलेला आहे. सध्या केवळ राजकारणाचा भाग म्हणून मराठी माणसाची कळ काढली जात असून अशा प्रसंगी सीमा बांधवांना खंबीर पाठिंबा दर्शवण्यासाठी शनिवारी कोल्हापूरमध्ये शाहू समाधी परिसरामध्ये आंदोलन उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला आहे.

येथील शासकीय विश्रामगृहावर आज बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. यावेळी माजी मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, संजय पवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सर्वांनीच महाराष्ट्रातील भाजप शिंदे गटाच्या सरकारवर कडाडून टीका केली. कर्नाटकमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दल बदनामीचे वातावरण केले जात आहे. यावरून लक्ष विचलित करण्यासाठी सीमा प्रश्नाचा हा मुद्दा जाणीवपूर्वक समोर आणण्याचा आरोप यावेळी नेत्यांनी भाजप आणि शिंदे गटावर केला आहे.

टॅग्स :border disputeसीमा वादkolhapurकोल्हापूरMahavikas Aghadiमहाविकास आघाडी