शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

ठोस आश्वासनाअभावीच कोतवालांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 13:06 IST

आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे गेले अडीच महिने गावपातळीवर खोळंबलेली कामे सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देठोस आश्वासनाअभावीच कोतवालांचे आंदोलन स्थगित८४ दिवसांनी हलला मुक्काम : आजपासून होणार कामावर रुजू

कोल्हापूर : आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून कोतवालांचा ८४ व्या दिवशी मुक्काम हलला. दहशतवादी हल्ला, किसान सन्मान योजना आणि दुष्काळी परिस्थिती यांमुळे आंदोलन स्थगित करून आज (गुरुवार) पासून कामावर रुजू होण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. त्यामुळे गेले अडीच महिने गावपातळीवर खोळंबलेली कामे सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.चतुर्थ श्रेणीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील १४ हजारांहून अधिक कोतवालांनी ६ डिसेंबरपासून राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले होते. दरम्यानच्या काळात शासनाने दोन वेळा मानधन वाढ केली; तथापि साडेसात हजार आणि पंधरा हजार रुपये अशी सेवाकाळानुसार केलेली वाढ ही कोतवालांमध्ये दुफळी माजविण्याचा प्रयत्न असल्याचे सांगून वाढ नाकारत त्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते. पण आता कोणतेही ठोस आश्वासन न मिळताच आंदोलन स्थगित करण्यात आले.

सध्या सीमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने आणि शेतकरी सन्मान योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने गावपातळीवर कोतवालांची गरज निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीचा विचार होऊन अखेर बुधवारी दुपारी आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे कोल्हापूर जिल्हा कोतवाल संघटनेने जाहीर केले. त्यानुसार सायंकाळी पाच वाजता या सर्वांनी सामानसुमानासह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील मांडव सोडला.

यावेळी संदीप टिपुगडे, श्रीकांत कोळी, अतुल जगताप, सुनील पाटील, पांडुरंग बरकाळे, संतोष पाटील, महादेव पोवार, नामदेव चौगले, दीपक शिंदे, पांडुरंग डवरी, महादेव भोसले, उमेश कांबळे यांच्यासह कोतवाल सहभागी झाले.बंद काळातील पगार द्याजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ८४ दिवस आंदोलनासाठी बसावे लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन महिने २४ दिवस काम बंद असल्याने या आंदोलन काळातील पगार द्यावा, अशी मागणी करणारा अर्ज शासनाकडे पाठविला असून, त्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करावा, अशी विनंती कोतवालांनी केली आहे.सर्वाधिक दिवसांचे आंदोलनकोतवालांचे हे आंदोलन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील सर्वाधिक दिवसांचे ठरले आहे. यापूर्वी ५१ दिवसांचे प्रदीर्घ आंदोलन केवळ धरणग्रस्तांनीच केले होते. कोतवालांनी सर्वाधिक दिवसांचे आंदोलनाचे रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहे.

 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर