शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
2
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
3
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
4
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
5
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
6
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
7
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
8
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
9
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
10
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
11
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
12
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
13
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
14
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
15
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
16
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
17
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
18
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
19
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांविरुद्ध प्रचार म्हणजेच भाजपचा महाराष्ट्र द्वेष - आदित्य ठाकरे

By संदीप आडनाईक | Updated: April 28, 2024 21:33 IST

आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूर : शाहू महाराजांविरुद्ध प्रचार करणे यातूनच भाजपचा महाराष्ट्र द्वेष दिसून येत आहे, अशा शब्दात उध्दवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली. 

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात कितीही ठाण मांडले तरी जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहील असे सांगून आदित्य यांनी भाजपला लोकशाही संपवायची आहे, त्यांचे पहिले लक्ष्य संविधान बदलणे आहे, हेही देशातल्या लोकांना माहित आहे. आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 ते म्हणाले, महाराष्ट्रात जे काही चालले आहे, त्यावरुन भाजपचे सारे काही गुजरातसाठी सुरु आहे. गुजरातमधील कांदा निर्यात बंदी प्रथमत: हटवली आणि त्यानंतर देशातील कांदा निर्यात बंदी हटवायला ४८ तास लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात झाली असली तरीही आमची मते दुप्पट होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 गुवाहटी आणि गोव्याला जाउन जे रडगाणं गायले आणि पळाले, त्या गद्दारांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या आजोबांचे नाव घेत त्यांची बरोबरी करण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांना त्यांची नाव घेण्याचीही लायकी नाही. जॉईन आणि जेल पॉलिसीमुळे ते पळाले, पण संजय राऊत यांच्यासारखे नेते जेलमध्ये गेले तरीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. टाटा काय बोलले हे माहित नाही, पण गेल्या अडीच वर्षात दिल्लीतून आलेले अनेक फोन कॉलनंतर सगळे उद्योग गुजरातला जायला लागले हेसुध्दा खरं आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांचा एकही नवा उद्योग राज्यात आला का असा प्रश्न त्यांनी विचारला. 

गेल्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. कुठेही सरकार आहे असे जाणवत नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी