शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

शाहू महाराजांविरुद्ध प्रचार म्हणजेच भाजपचा महाराष्ट्र द्वेष - आदित्य ठाकरे

By संदीप आडनाईक | Updated: April 28, 2024 21:33 IST

आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

कोल्हापूर : शाहू महाराजांविरुद्ध प्रचार करणे यातूनच भाजपचा महाराष्ट्र द्वेष दिसून येत आहे, अशा शब्दात उध्दवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका केली. 

ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात कितीही ठाण मांडले तरी जिल्हा महाविकास आघाडी सोबतच राहील असे सांगून आदित्य यांनी भाजपला लोकशाही संपवायची आहे, त्यांचे पहिले लक्ष्य संविधान बदलणे आहे, हेही देशातल्या लोकांना माहित आहे. आदित्य ठाकरे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 ते म्हणाले, महाराष्ट्रात जे काही चालले आहे, त्यावरुन भाजपचे सारे काही गुजरातसाठी सुरु आहे. गुजरातमधील कांदा निर्यात बंदी प्रथमत: हटवली आणि त्यानंतर देशातील कांदा निर्यात बंदी हटवायला ४८ तास लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कोल्हापुरात झाली असली तरीही आमची मते दुप्पट होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 गुवाहटी आणि गोव्याला जाउन जे रडगाणं गायले आणि पळाले, त्या गद्दारांकडे मी लक्ष देत नाही. माझ्या आजोबांचे नाव घेत त्यांची बरोबरी करण्याचा ते प्रयत्न करतात, त्यांना त्यांची नाव घेण्याचीही लायकी नाही. जॉईन आणि जेल पॉलिसीमुळे ते पळाले, पण संजय राऊत यांच्यासारखे नेते जेलमध्ये गेले तरीही उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. टाटा काय बोलले हे माहित नाही, पण गेल्या अडीच वर्षात दिल्लीतून आलेले अनेक फोन कॉलनंतर सगळे उद्योग गुजरातला जायला लागले हेसुध्दा खरं आहे. गेल्या अडीच वर्षात त्यांचा एकही नवा उद्योग राज्यात आला का असा प्रश्न त्यांनी विचारला. 

गेल्या पाच वर्षात महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. कुठेही सरकार आहे असे जाणवत नाही असे ते म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी