शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

गांधी विचारांचा प्रसार परीक्षांद्वारे

By admin | Updated: October 1, 2015 23:29 IST

शिवाजी विद्यापीठ : गांधी अभ्यास केंद्राचा नवा उपक्रम

संतोष मिठारी - कोल्हापूर--चर्चासत्र, परिषद, कार्यशाळा, अभ्यासक्रमांच्या माध्यमातून राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांचा शिवाजी विद्यापीठातील गांधी अभ्यास केंद्राकडून प्रचार व प्रसार केला जातो. आता पुढचे पाऊल म्हणून परीक्षांद्वारे गांधीविचारांच्या प्रसाराचा उपक्रम केंद्र राबविणार आहे. शिवाय राज्यातील गांधीविचारांनी कार्यरत संस्थांशी सामंजस्य करार करून उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात येणार आहे.विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) ‘युगप्रवर्तक नेते’ योजनेंतर्गत विद्यापीठाला गांधी अभ्यासकेंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली. गांधीविचारांचा प्रसार, प्रचार आणि याबाबतचे संशोधन करणे असा उद्देश असलेल्या या केंद्राचे उद्घाटन २ आॅक्टोबर २००० रोजी गांधीवादी विचारवंत श्रीकांत आपटे यांच्या हस्ते झाले. स्थापनेपासून ‘यूजीसी’कडून या केंद्राला दरवर्षी ७ लाख ५० हजारांचा निधी मिळत होता. गेल्या वर्षीपासून तो बंद झाला. त्यामुळे विद्यापीठाच्या निधीतून या केंद्राचे कामकाज चालते. गेल्या १५ वर्षांच्या वाटचालीत केंद्राने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्रे आदींच्या माध्यमातून देशात शिवाजी विद्यापीठ व कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण केली. शालेय विद्यार्थी, तुरुंगांतील बंदीजन, आदींमध्ये गांधीविचार रुजविण्यासाठी परीक्षेचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्याद्वारे समाजातील घटकांपर्यंत गांधीविचार पोहोचविले जाणार आहेत. शिवाय कोथरूड (पुणे)मधील महात्मा गांधी स्मारक केंद्र आणि जळगावच्या महात्मा गांधी फौंडेशनशी सामंजस्य करार करून उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र पाऊल टाकणार आहे.सध्या केंद्राद्वारे गांधीजींसह उत्तर गांधीवादी नेते विनोबा भावे, काका कालेलकर, जयप्रकाश नारायण, प्रेमा कंटक, आदींबाबतचे संशोधन झाले आहे. त्यानुषंगाने पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापुढील टप्पा म्हणून समाजातील विविध घटकांपर्यंत गांधीविचार पोहोचविण्यासाठी परीक्षा घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून दरवर्षी तीन लाख रुपयांचा निधी केंद्राला मिळतो. पण केंद्राचे कार्य, उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी निधीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून लोकवर्गणीद्वारे निधी संकलित केला जाईल. - प्रा.डॉ. भारती पाटील, समन्वयक, गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ, गांधीजींचे आत्मचरित्र आणि त्यांच्या जीवनावरील अन्य काही छोटी-छोटी पुस्तके परीक्षा घेण्यापूर्वी शालेय विद्यार्थी, तुरुंगातील बंदीजन, आदींना वाचण्यास दिली जातील. त्यावर एक तासाची परीक्षा घेण्यात येईल. त्याची सुरुवात जूनपासून करण्यात येणार आहे.सध्या केंद्राद्वारे गांधीजींसह उत्तर गांधीवादी नेते विनोबा भावे, काका कालेलकर, जयप्रकाश नारायण, प्रेमा कंटक, आदींबाबतचे संशोधन झाले आहे. त्यानुषंगाने पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यापुढील टप्पा म्हणून समाजातील विविध घटकांपर्यंत गांधीविचार पोहोचविण्यासाठी परीक्षा घेण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून दरवर्षी तीन लाख रुपयांचा निधी केंद्राला मिळतो. पण केंद्राचे कार्य, उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यासाठी निधीचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून लोकवर्गणीद्वारे निधी संकलित केला जाईल. - प्रा.डॉ. भारती पाटील, समन्वयक, गांधी अभ्यास केंद्र, शिवाजी विद्यापीठ,