शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

कायदा न पाळणाऱ्या सरकारचा निषेध

By admin | Updated: September 2, 2014 00:10 IST

धनगर समाज आरक्षण कृती समिती : राजकीय धोरण ठरविण्यासाठी लवकरच राज्यव्यापी मेळावा

कोल्हापूर : धनगर समाजाला हक्काचे आरक्षण न देणाऱ्या व कायद्याची पायमल्ली करणाऱ्या कॉँग्रेस आघाडी सरकारचा आज, सोमवारी धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे कोल्हापुरात जाहीर निषेध करण्यात आला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे पुढील राजकीय धोरण काय असावे? यासाठी लवकरच समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेण्याचा निर्णयही यावेळी झाला. ‘यळकोट... यळकोट... जय मल्हार...’, च्या जयघोषाने सभागृह दणाणले. यावेळी धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.राजर्षी शाहू स्मारक भवन येथे धनगर समाज आरक्षण कृती समिती तर्फे कॉँग्रेस आघाडी सरकारच्या निषेध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते रामाप्पाा करिगार होते.करिगार म्हणाले, समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी अनेकवेळा लढा देऊनही यश मिळाले नाही. शासनाने योग्य न्याय न दिल्याने अशा निष्क्रिय सरकारच्या निषेधाची घोषणा आपण करीत आहोत.बबनराव रानगे म्हणाले, राज्य शासनाने ६५ वर्षांत धनगर समाजावर अन्याय केला आहे. राज्यघटनेप्रमाणे या समाजाला आरक्षण असताना शासन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणाच्या तरी दबावाखाली यावर निर्णय घेत नाही. आमचा कोणालाही विरोध नाही; परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेत धनगर समाजाला आरक्षण असताना त्याची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे याचा उद्रेक झालेला आहे. गेल्या काही दिवसांत समाजाचे लाखो लोक रस्त्यावर उतरूनही सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे पुढील राजकीय धोरण ठरविण्यासाठी लवकरच धनगर समाजाचा राज्यव्यापी मेळावा घेण्यात येईल.प्रा. लक्ष्मण करपे म्हणाले, सम्राट चंद्रगुप्त मौर्यांचा धनगर समाज वारसदार आहे. त्यामुळे समाजाने प्रथम आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे.आपण गप्प बसलो, तर आपल्याला काहीच मिळणार नाही. आता रडायचे नाही, तर लढायचे. कृती समितीने आखून दिलेल्या कार्यक्रमाप्रमाणे वाटचाल करुया.छगन नांगरे यांनी आरक्षणाची वस्तुस्थिती मांडणारी कविता सादर करीत समाजावर नेहमीच अन्याय करणाऱ्या सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.राघू हजारे यांनी सरकारने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी आरक्षण लागू केले तर त्याचे स्वागतच आहे, असे सांगितले. असे न झाल्यास कृती समितीच्या माध्यमातून या सरकारला गाडावे, अशा जाहिराती गावागावांत, घराघरांत समाज बांधवांनी वाटाव्यात. एक-एक मत सरकारच्या विरोधात जाईल यासाठी प्रसार करावा, अशा सूचनाही त्यांनी मांडल्या.यावेळी ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा गावडे, बयाजी शेळके, नागेश पुजारी, प्रल्हाद देबाजे, कोंडिबा बनगर, आदींसह कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)