शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन, अद्याप ६७ कारखान्यांचे गाळप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 07:10 IST

देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर  : देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले आहे. ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.

उत्तर प्रदेशात १०१.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून कर्नाटकात ५५.५० लाख टन तर तामिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ लाख टन व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरयाणा (७.१५ लाख टन),पंजाब (६.६५ लाख टन) साखरेचे  उत्पादन झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिना अखेरपर्यंत चालेल व त्यातून सुमारे ३२७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन होईल. या व्यतिरिक्त सुमारे ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल असा अंदाज आहे.’ 

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

उताऱ्यात महाराष्ट्र चौथा

देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये  १०.८० टक्के असून त्यानंतर  कर्नाटक आणि तेलंगणात तो १०.१० टक्के,  तर महाराष्ट्रात १० टक्के आहे. यानंतर आंध्र प्रदेश, बिहारमध्ये प्रत्येकी ९.७० टक्के,उत्तर प्रदेशात ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने