शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

देशात ३२० लाख टन साखरेचे उत्पादन, अद्याप ६७ कारखान्यांचे गाळप सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 07:10 IST

देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर  : देशात ३० एप्रिलअखेर ३२०.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले असून हंगाम अखेरपर्यंत ३२७.३५ लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे १०५.३० लाख टन साखरेचे  उत्पादन झाले आहे. ५३१ साखर कारखान्यांपैकी ६७ कारखान्यात अजूनही ऊस गाळप सुरू आहे.

उत्तर प्रदेशात १०१.९० लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून कर्नाटकात ५५.५० लाख टन तर तामिळनाडू व गुजरातमध्ये अनुक्रमे १०.९५ लाख टन व १०.१० लाख टन साखरेची निर्मिती झाली आहे. याशिवाय हरयाणा (७.१५ लाख टन),पंजाब (६.६५ लाख टन) साखरेचे  उत्पादन झाले असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने एका पत्रकाद्वारे दिली आहे.

देशातील गाळप हंगाम जेमतेम मे महिना अखेरपर्यंत चालेल व त्यातून सुमारे ३२७ लाख टनाचे नवे साखर उत्पादन होईल. या व्यतिरिक्त सुमारे ४५ लाख टन साखर इथेनॉलकडे वळविली जाईल असा अंदाज आहे.’ 

- जयप्रकाश दांडेगावकर, अध्यक्ष, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ

उताऱ्यात महाराष्ट्र चौथा

देशात सर्वाधिक सरासरी साखर उतारा गुजरातमध्ये  १०.८० टक्के असून त्यानंतर  कर्नाटक आणि तेलंगणात तो १०.१० टक्के,  तर महाराष्ट्रात १० टक्के आहे. यानंतर आंध्र प्रदेश, बिहारमध्ये प्रत्येकी ९.७० टक्के,उत्तर प्रदेशात ९.६५ टक्के या राज्यांचा क्रमांक लागतो.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने