शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

महावितरण कंत्राटी कामगारांची पिळवणूक

By admin | Updated: April 3, 2015 23:54 IST

शासनाकडूनही निर्णय नाही : दहा हजार कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

सांगली : महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पध्दतीने ठेकेदाराकडून कामगारांचा पुरवठा केला जात आहे. या ठेकेदारास महावितरणकडून प्रति कामगार दिवसाला ४०५ रूपये दिले जात आहेत. परंतु, ठेकेदार प्रतिदिन १८० रूपये कामगारांच्या हातात टेकवत असून उर्वरित रक्कम स्वत:च्या घशात घालत आहे. कामगार पुरवठ्याच्या संस्थाही राज्यकर्त्यांशी संबंधित कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या छळावर शासनही कोणतीच कारवाई करीत नाही. यामुळे दहा हजार कंत्राटी वीज कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.विद्युत मंडळाचे महावितरण कंपनीमध्ये रूपांतर झाल्यानंतर फार मोठे बदल झाले आहेत. महावितरणमध्ये विद्युत वाहिन्यांची देखभाल, महसूल वसुलीचे काम करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अन्य शासकीय कार्यालयातही कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण, येथे थेट शासनाने नियुक्ती केली असून तेच पगारही देत आहेत. महावितरणमध्ये मात्र कुणाच्या हितासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची थेट शासनाकडून नव्हे, तर ठेकेदारांकडून नियुक्ती केली आहे. हे ठेकेदारही जुन्या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्तेच आहेत. यामुळे कामगारांच्या हितापेक्षा येथे ठेकेदारांचेच हित पाहिल्याचे दिसत आहे. ठेकेदारास महावितरण कंपनीकडून प्रति कामगाराचे वेतन देण्यासाठी महिना १२ हजार १५० रूपये मिळत आहेत. परंतु, ठेकेदार कामगारांच्या हातावर प्रति कामगारास महिना पाच हजार ४०० रूपये टेकवत आहेत. प्रत्यक्षात काही कामगारांना केवळ साडेतीन ते चार हजार रूपयेच मिळत असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. ठेकेदाराकडून शासनाच्या किमान वेतन कायद्याचेही उलंघन होत असताना, शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासनाने कंत्राटी पध्दत बंद करून त्या कामगारांना नियमित सेवेत घेतल्यास महावितरणचाही फायदा होणार असल्याचे कामगार सांगत आहेत. (प्रतिनिधी)कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरणार : सुनील वाघमारेयाबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटी वीज कामगार युनियनचे राज्य संघटक सुनील वाघमारे म्हणाले, ठेकेदाराकडून कंत्राटी पध्दतीने महावितरण कंपनी कामगार घेत आहे. यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा असून कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत आहे. या गैरकारभाराची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करूनही शासन याकडे लक्ष देत नाही. तसेच कंत्राटी पध्दत रद्द करून ते कामगार नियमित सेवेत घेतल्यास महावितरण कंपनीचा फायदा होणार आहे. याकडे शासनाने लक्ष दिले नाही, तर राज्यातील दहा हजार कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरतील, अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.