शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

महावितरण कंत्राटी कामगारांची पिळवणूक

By admin | Updated: April 3, 2015 23:54 IST

शासनाकडूनही निर्णय नाही : दहा हजार कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत

सांगली : महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी पध्दतीने ठेकेदाराकडून कामगारांचा पुरवठा केला जात आहे. या ठेकेदारास महावितरणकडून प्रति कामगार दिवसाला ४०५ रूपये दिले जात आहेत. परंतु, ठेकेदार प्रतिदिन १८० रूपये कामगारांच्या हातात टेकवत असून उर्वरित रक्कम स्वत:च्या घशात घालत आहे. कामगार पुरवठ्याच्या संस्थाही राज्यकर्त्यांशी संबंधित कार्यकर्त्यांच्या असल्यामुळे त्यांच्याकडून होणाऱ्या छळावर शासनही कोणतीच कारवाई करीत नाही. यामुळे दहा हजार कंत्राटी वीज कामगारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.विद्युत मंडळाचे महावितरण कंपनीमध्ये रूपांतर झाल्यानंतर फार मोठे बदल झाले आहेत. महावितरणमध्ये विद्युत वाहिन्यांची देखभाल, महसूल वसुलीचे काम करण्यासाठी कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अन्य शासकीय कार्यालयातही कंत्राटी पध्दतीने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पण, येथे थेट शासनाने नियुक्ती केली असून तेच पगारही देत आहेत. महावितरणमध्ये मात्र कुणाच्या हितासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची थेट शासनाकडून नव्हे, तर ठेकेदारांकडून नियुक्ती केली आहे. हे ठेकेदारही जुन्या सरकारमधील मंत्र्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्तेच आहेत. यामुळे कामगारांच्या हितापेक्षा येथे ठेकेदारांचेच हित पाहिल्याचे दिसत आहे. ठेकेदारास महावितरण कंपनीकडून प्रति कामगाराचे वेतन देण्यासाठी महिना १२ हजार १५० रूपये मिळत आहेत. परंतु, ठेकेदार कामगारांच्या हातावर प्रति कामगारास महिना पाच हजार ४०० रूपये टेकवत आहेत. प्रत्यक्षात काही कामगारांना केवळ साडेतीन ते चार हजार रूपयेच मिळत असल्याच्या कामगारांच्या तक्रारी आहेत. ठेकेदाराकडून शासनाच्या किमान वेतन कायद्याचेही उलंघन होत असताना, शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. शासनाने कंत्राटी पध्दत बंद करून त्या कामगारांना नियमित सेवेत घेतल्यास महावितरणचाही फायदा होणार असल्याचे कामगार सांगत आहेत. (प्रतिनिधी)कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरणार : सुनील वाघमारेयाबाबत महाराष्ट्र राज्य कंत्राटी वीज कामगार युनियनचे राज्य संघटक सुनील वाघमारे म्हणाले, ठेकेदाराकडून कंत्राटी पध्दतीने महावितरण कंपनी कामगार घेत आहे. यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा असून कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होत आहे. या गैरकारभाराची सखोल चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करूनही शासन याकडे लक्ष देत नाही. तसेच कंत्राटी पध्दत रद्द करून ते कामगार नियमित सेवेत घेतल्यास महावितरण कंपनीचा फायदा होणार आहे. याकडे शासनाने लक्ष दिले नाही, तर राज्यातील दहा हजार कंत्राटी कामगार रस्त्यावर उतरतील, अशा मागणीचे निवेदन सांगली जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.