शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

बालवयात कौशल्यविकासास प्राधान्य द्यावे

By admin | Updated: December 9, 2014 00:30 IST

रवींद्र नाईक : श्रीमंत माईसाहेब बावडेकर जन्मशताब्दीला प्रारंभ

कोल्हापूर : सर्वच क्षेत्रात अलीकडे झपाट्याने बदल होत आहेत. बदलानुसार शैक्षणिक अभ्यासक्रम बदलणे अवघड आहे. मर्यादाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये यशस्वी होण्यासाठी बालवयातच बलस्थाने शोधून कौशल्यविकास करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिक्षणतज्ज्ञ रवींद्र नाईक यांनी केले. येथील श्री पंत अमात्य बाल विकास विश्वस्त निधीच्या श्रीमंत माईसाहेब बावडेकर जन्मशताब्दी कार्यक्रमांच्या प्रारंभप्रसंगी ते ‘मुलांमधील कौशल्य विकास’ या विषयावर बोलत होते. श्रीमंत शाहू महाराज अध्यक्षस्थानी होते. विश्वस्त निधीचे अध्यक्ष माधवराजे पंडित बावडेकर, उपाध्यक्षा नीतू पंडित बावडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीमंत शाहू महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नाईक म्हणाले, प्रत्येक मुलांमध्ये सुप्तावस्थेत काही ना काही कौशल्य असते. ते पालकांनी शोधून बालवयातच प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. अशा प्रोत्साहनाने कौशल्याला आकार मिळतो. निरीक्षण, उत्सुकता, स्वतंत्र विचार, समस्या निराकरण, चाकोरीबाहेरचा विचार, नियोजन, लवचिकता ही सर्वसाधारणपणे कौशल्ये आहेत. यातील कोणते कौशल्य आपल्या मुलामध्ये आहे, हे शोधून काढणे महत्त्वाचे आहे.श्रीमंत शाहू महाराज म्हणाले, बावडेकर आणि छत्रपती घराण्याचे ३०० वर्षांपासूनचे संबंध आहेत. बाल शिक्षणामध्ये माईसाहेब बावडेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या आदर्शाने शहरात बावडेकर शाळा सुरू आहे.संस्थेचे विश्वस्त डॉ. उद्धव पाटील यांनी श्रीमंत माईसाहेब यांचा जीवनपट छायाचित्रांसह उलगडून दाखविला. माधवराजे यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक एस. डी. कुंभार, नीतू पंडित यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. नीलराजे पंडित बावडेकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)