शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

साखर कामगारांच्या सुविधांना प्राधान्य द्या : जयंत पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:17 IST

आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपन्हाळा येथे राज्य साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर

पन्हाळा : आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.

पाटील म्हणाले की, साखर कारखान्यात कामगारांची संख्या वाढविण्यापेक्षा कार्यरत असलेल्या कामगारांनाच जास्त पगार व सुखसोयी देण्यासाठी प्रत्येक सहकारी साखर कारखान्याने प्राधान्य दिले पाहिजे. प्रारंभी जयंत पाटील व कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

राज्य सहकारी साखर कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष राऊसो पाटील यांनी स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), संघटनेचे उपाध्यक्ष युवराज रणवरे, कोषाध्यक्ष रावसाहेब भोसले, डी. बी. मोहिते, राजेंद्र तावरे, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, संजय मोरबाळे, कैलास आवळे, संतोष धुमाळ, आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.साखर क्षेत्रात नवतंत्रज्ञान हवेयावेळी अध्यक्षस्थानावरून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण जनता ही शेती व्यवसायावरच टिकून आहे. या गोरगरीब जनतेला रोजगार मिळावा व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी म्हणूनच सहकारी साखर कारखान्यांची उभारणी करण्यात आली आहे. साखर क्षेत्रात आपणास टिकायचे असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जुन्या तंत्रज्ञानामुळे आपण स्पर्धेत टिकणार नाही. तसेच स्थानिक परिस्थिती समजावून कामगारांनी व व्यस्थापन समितीने समन्वय साधून सहकारी साखर कारखाने चालविले पाहिजेत, असे सांगितले.पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जयंत पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, रावसाहेब काळे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण