शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साखर कामगारांच्या सुविधांना प्राधान्य द्या : जयंत पाटील यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 00:17 IST

आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देपन्हाळा येथे राज्य साखर कामगार कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर

पन्हाळा : आजच्या युगात खासगी साखर कारखान्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे साखर उद्योगात स्पर्धा वाढली असून, सहकारी साखर कारखान्यांचे भवितव्य भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारखान्यांनी कामगारांना जास्तीत जास्त सुविधा द्याव्यात, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कारखाना प्रतिनिधी मंडळाच्यावतीने आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार व राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे होते.

पाटील म्हणाले की, साखर कारखान्यात कामगारांची संख्या वाढविण्यापेक्षा कार्यरत असलेल्या कामगारांनाच जास्त पगार व सुखसोयी देण्यासाठी प्रत्येक सहकारी साखर कारखान्याने प्राधान्य दिले पाहिजे. प्रारंभी जयंत पाटील व कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

राज्य सहकारी साखर कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष राऊसो पाटील यांनी स्वागत केले. संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर), संघटनेचे उपाध्यक्ष युवराज रणवरे, कोषाध्यक्ष रावसाहेब भोसले, डी. बी. मोहिते, राजेंद्र तावरे, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, संजय मोरबाळे, कैलास आवळे, संतोष धुमाळ, आदींसह कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.साखर क्षेत्रात नवतंत्रज्ञान हवेयावेळी अध्यक्षस्थानावरून माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे म्हणाले, महाराष्ट्रातील ग्रामीण जनता ही शेती व्यवसायावरच टिकून आहे. या गोरगरीब जनतेला रोजगार मिळावा व शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती व्हावी म्हणूनच सहकारी साखर कारखान्यांची उभारणी करण्यात आली आहे. साखर क्षेत्रात आपणास टिकायचे असेल तर नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जुन्या तंत्रज्ञानामुळे आपण स्पर्धेत टिकणार नाही. तसेच स्थानिक परिस्थिती समजावून कामगारांनी व व्यस्थापन समितीने समन्वय साधून सहकारी साखर कारखाने चालविले पाहिजेत, असे सांगितले.पन्हाळा येथे महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ आयोजित कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी जयंत पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, रावसाहेब काळे, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPoliticsराजकारण