शहरं
Join us  
Trending Stories
1
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
2
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
3
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
4
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
5
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
6
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
7
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
8
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
9
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
10
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
11
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
12
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
13
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
14
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
16
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
17
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
18
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
19
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
20
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप

देशाचे पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकाचवेळी राजीनामा देण्याची चिन्हे : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2019 11:42 PM

येत्या २६ जानेवारीच्या झेंडावंदनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपापल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देलोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्रित?

शिरटे : येत्या २६ जानेवारीच्या झेंडावंदनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपापल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्चमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे जावे लागेल, असा अंदाज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथे श्री पशुपती विकास सोसायटीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक बी. डी. पवार होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, जि. प. सदस्य धनाजी बिरमुळे उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात सहकारी चळवळीचा वाटा मोठा आहे. मुक्त अर्थव्यवस्थेमुळे अनेक पर्याय निर्माण झाले तरी, सहकाराचा मूलमंत्र कधीही विसरता कामा नये. नोटाबंदी व जीएसटीने देशाची अर्थव्यवस्था मंदावली आहे. आश्वासनांच्या स्वप्नात असणाऱ्या जनतेत निराशावादी विचार वाढू लागला आहे. भाजप-शिवसेनेचे सरकार घालविण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.

राजारामबापू शुगर टेकचे संस्थापक बी. डी. पवार म्हणाले, सोसायटीच्या स्थापनेनंतर अल्पावधीतच प्रगतीचे टप्पे पार केले आहेत.उपसरपंच व संस्थेचे अध्यक्ष नीलेश पवार यांनी प्रास्ताविक केले. बी. के. पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रकाश रसाळ यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी भरत देशमुख, उमेश पवार, सभापती सचिन हुलवान, उपसभापती नेताजी पाटील, सुनील पोळ, ‘कृष्णा’चे संचालक सुजित मोरे, विजय पाटील, संग्रामसिंह पाटील, रमेश पाटील, भरत कदम, प्रशांत रणदिवे, विशाल पवार, कल्पना कोळेकर आदी उपस्थित होते.जिल्हा बँकेचे नफ्याचे शतक होणार : पाटीलजिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील म्हणाले, जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असल्याने बँकेला तालुकानिहाय वेगवेगळे धोरण आखावे लागते. यावर्षी बँकेला १०० कोटी रुपयांचा नफा होणार आहे.