शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

पाणी गळती रोखण्यासाठी बजेटमध्येच ठोस निधीच्या तरतुदीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:47 IST

पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईनची गळती काढून प्रश्न सुटणार नाही. नव्यानेच पाईपलाईन टाकावी लागणार आहेत. त्याचबरोबर पपिंग हाऊस येथील कालबाह्य मशिनरी बदलावी लागणार आहे. त्यासाठी बजेटमध्येच भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहे तरच पाण्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च कमी होणार आहे.

ठळक मुद्देवाया जाणारे पाणी रोखल्यास खर्च कमी, उत्पन्नात वाढ विजेवरील लाखो रुपयांची होणार बचत

विनोद सावंत

कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईनची गळती काढून प्रश्न सुटणार नाही. नव्यानेच पाईपलाईन टाकावी लागणार आहेत. त्याचबरोबर पपिंग हाऊस येथील कालबाह्य मशिनरी बदलावी लागणार आहे. त्यासाठी बजेटमध्येच भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहे तरच पाण्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च कमी होणार आहे.पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेमध्ये गळती हा विषय नवीन नाही. मात्र, कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरती मलमपट्टीने हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी दरवर्षीच्या बजेटमधून भरघोस निधीची तरतूद करावी लागणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई करण्याची गरज आहे. काही ग्राहक मीटरच्या अगोदरच व्हॉल्वमधून पाणी घेत असल्याचे समोर आले आहे; अशांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

श्ािंगणापूर योजनेच्या ठेकेदाराने एक किलोमीटरवर एक व्हॉल्व बसविण्याचे प्रस्तावित होते. त्याचे पैसेही त्याने घेतले. मात्र, व्हॉल्व बसवले नाहीत. त्यामुळे जादा दाबामुळे पाईपलाईनला वारंवार गळती लागत आहे. वास्तविक शिंगणापूर योजनेच्या देखभालाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे.

तत्कालीन महापौर, नगरसेवकांनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता; परंतु ‘एमजीपी’ने जबाबदारी झटकली आहे. योजनेवर जेवढा खर्च झाला नाही त्यापेक्षा जास्त महापालिकेला त्याच्या दुरूस्तीवर करावा लागला. त्यामुळे ‘एमजीपी’कडे देखभाल सोपवून. त्यांच्याकडून कामे करून घेतल्यास २५ टक्के गळती कमी होईल, महापालिकेवरील खर्चही कमी होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

अमृत योजनेतून ११५ कोटींच्या निधीतून ४५० किलोमीटरच्या पाईपलाईन बसविण्यात येत आहेत. मात्र, जुन्या पाईपलाईनचा त्यामध्ये समावेश नसून बहुतांशी उपनगरांत नव्याने टाकण्यात येणार आहे. जुन्या पाईपलाईन बदलण्यासाठी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मिळण्यासाठी तत्काळ प्रस्ताव करून शासनाला पाठविणे आवश्यक आहे. यातून निधी मिळाल्यास तसेच शिंगणापूर योजना एमजीपीकडे गेल्यास शहर गळतीमुक्त होईल.विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते, महापालिका

पाणी उपसा करण्यासाठी, जलशुद्धिकरण तसेच टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी महिन्याला २ कोटी तर वर्षाला २४ कोटी पाण्याचे बिल महापालिका देते. गळती काढल्यास निम्म्या पाण्यावरील खर्च कमी होणार आहे. वर्षाला १२ कोटींची बचत होणार आहे. त्यामुळे एकदाच नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खर्च केल्यास वीज बिल बचतीतून हा खर्च निघू शकतो.भूपाल शेटे,ज्येष्ठ नगरसेवक, महापालिका

जलशुद्धिकरणावरील खर्च ‘पाण्यात’जलशुद्धिकरण केंद्रामध्ये पंचगंगा नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यावर महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. गळतीमुळे शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी दररोज वापराविना वाया जात आहे. गळती रोखल्यास हा खर्च वाचणार असून याचाही विचार होणे आवयक आहे. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater shortageपाणीकपातkolhapurकोल्हापूर