शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

पाणी गळती रोखण्यासाठी बजेटमध्येच ठोस निधीच्या तरतुदीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 11:47 IST

पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईनची गळती काढून प्रश्न सुटणार नाही. नव्यानेच पाईपलाईन टाकावी लागणार आहेत. त्याचबरोबर पपिंग हाऊस येथील कालबाह्य मशिनरी बदलावी लागणार आहे. त्यासाठी बजेटमध्येच भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहे तरच पाण्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च कमी होणार आहे.

ठळक मुद्देवाया जाणारे पाणी रोखल्यास खर्च कमी, उत्पन्नात वाढ विजेवरील लाखो रुपयांची होणार बचत

विनोद सावंत

कोल्हापूर : पन्नास वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईनची गळती काढून प्रश्न सुटणार नाही. नव्यानेच पाईपलाईन टाकावी लागणार आहेत. त्याचबरोबर पपिंग हाऊस येथील कालबाह्य मशिनरी बदलावी लागणार आहे. त्यासाठी बजेटमध्येच भरीव निधीची तरतूद करणे आवश्यक आहे तरच पाण्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च कमी होणार आहे.पाणीपुरवठ्याच्या यंत्रणेमध्ये गळती हा विषय नवीन नाही. मात्र, कोल्हापूर शहरातील महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात इतर शहरांच्या मानाने १५ ते २० टक्के जादा गळती होत आहे ही गंभीर बाब आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिका प्रशासन, पदाधिकाऱ्यांनी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्याची गरज आहे. तात्पुरती मलमपट्टीने हा प्रश्न सुटणार नाही. यासाठी दरवर्षीच्या बजेटमधून भरघोस निधीची तरतूद करावी लागणार आहे. पाणी चोरी रोखण्यासाठी विशेष पथक नेमून कारवाई करण्याची गरज आहे. काही ग्राहक मीटरच्या अगोदरच व्हॉल्वमधून पाणी घेत असल्याचे समोर आले आहे; अशांवर कडक कारवाई होणे आवश्यक आहे.

श्ािंगणापूर योजनेच्या ठेकेदाराने एक किलोमीटरवर एक व्हॉल्व बसविण्याचे प्रस्तावित होते. त्याचे पैसेही त्याने घेतले. मात्र, व्हॉल्व बसवले नाहीत. त्यामुळे जादा दाबामुळे पाईपलाईनला वारंवार गळती लागत आहे. वास्तविक शिंगणापूर योजनेच्या देखभालाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे.

तत्कालीन महापौर, नगरसेवकांनी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढला होता; परंतु ‘एमजीपी’ने जबाबदारी झटकली आहे. योजनेवर जेवढा खर्च झाला नाही त्यापेक्षा जास्त महापालिकेला त्याच्या दुरूस्तीवर करावा लागला. त्यामुळे ‘एमजीपी’कडे देखभाल सोपवून. त्यांच्याकडून कामे करून घेतल्यास २५ टक्के गळती कमी होईल, महापालिकेवरील खर्चही कमी होणार असल्याचे मत तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

अमृत योजनेतून ११५ कोटींच्या निधीतून ४५० किलोमीटरच्या पाईपलाईन बसविण्यात येत आहेत. मात्र, जुन्या पाईपलाईनचा त्यामध्ये समावेश नसून बहुतांशी उपनगरांत नव्याने टाकण्यात येणार आहे. जुन्या पाईपलाईन बदलण्यासाठी अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून निधी मिळण्यासाठी तत्काळ प्रस्ताव करून शासनाला पाठविणे आवश्यक आहे. यातून निधी मिळाल्यास तसेच शिंगणापूर योजना एमजीपीकडे गेल्यास शहर गळतीमुक्त होईल.विजय सूर्यवंशी, विरोधी पक्षनेते, महापालिका

पाणी उपसा करण्यासाठी, जलशुद्धिकरण तसेच टाकीमध्ये पाणी सोडण्यासाठी महिन्याला २ कोटी तर वर्षाला २४ कोटी पाण्याचे बिल महापालिका देते. गळती काढल्यास निम्म्या पाण्यावरील खर्च कमी होणार आहे. वर्षाला १२ कोटींची बचत होणार आहे. त्यामुळे एकदाच नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी खर्च केल्यास वीज बिल बचतीतून हा खर्च निघू शकतो.भूपाल शेटे,ज्येष्ठ नगरसेवक, महापालिका

जलशुद्धिकरणावरील खर्च ‘पाण्यात’जलशुद्धिकरण केंद्रामध्ये पंचगंगा नदीतून उपसा केलेल्या पाण्यावर प्रक्रिया केली जाते. त्यावर महापालिका दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. गळतीमुळे शुद्ध केलेले लाखो लिटर पाणी दररोज वापराविना वाया जात आहे. गळती रोखल्यास हा खर्च वाचणार असून याचाही विचार होणे आवयक आहे. 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाwater shortageपाणीकपातkolhapurकोल्हापूर