शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

जलजीवन योजनेतील चिरीमिरी, टक्केवारीने अडचणीत ठेकेदारी, लोकवर्गणीही भरण्यासाठी ठेकेदारावर दबाव

By समीर देशपांडे | Updated: February 15, 2023 18:31 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : आपल्याकडे जे काही करायचे आहे ते शासनाने करावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्यामुळे जलजीवन मिशनसाठीची लोकवर्गणीही ...

समीर देशपांडेकोल्हापूर : आपल्याकडे जे काही करायचे आहे ते शासनाने करावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्यामुळे जलजीवन मिशनसाठीची लोकवर्गणीही ठेकेदारानेच भरावी यासाठी आता दबावतंत्र सुरू आहे. मुळात योजनाच चिरीमिरी आणि टक्केवारी ठरल्याशिवाय मंजूर होत नाही असे बहुतांशी योजनांच्या बाबतीत घडत असल्याने ‘चिरीमिरी, टक्केवारी, अडचणीत आली ठेकेदारी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासकीय सर्व योजनांच्या बाबतीत सर्वच विभागांचे टक्केवारीचे दरपत्रक ठरलेले असते. आता नागरिकांनाही हे पाठ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने एवढ्या कोटींची विकासकामे मंजूर केली अशी घोषणा केली की, लगेच नागरिक २० टक्क्याने हिशेब घालायला सुरुवात करतात. त्यामुळे जलजीवन मिशनच्या बाबतीतही हेच झाले आहे.मुळात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता पाणी योजनांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची संख्या मोजकी आहे. त्यातही उच्चशिक्षित आणि पात्रता असणाऱ्यांची संख्या कमीच आहे. परंतु, वेळेत आणि सर्वच जिल्ह्यांत योजना करायच्या असल्याने कमी असणारे ठेकेदार आणि अधिक संख्येच्या योजना अशी व्यस्त परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे घेतलेल्या हातातील योजना पूर्ण करताना ठेकेदारांचीही दमछाक होणार आहे.या योजना तयार करताना पाणीपुरवठा विभागाकडे असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बळावर अंदाजपत्रके तयार करताना ठेकेदारांनाही मदतीची भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे ‘प्रोटेाकॉल’नुसार राजकीय, प्रशासकीय अशा सर्वच पातळ्यांवर फायदा होण्याच्या आधीच वाटा देऊन ठेकेदार आता कामाला लागले आहेत.या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी शिरोळ आणि हातकणंगले या दोन तालुक्यांसाठी दहा टक्के वर्गणी सक्तीची आहे, तर उर्वरित दहा तालुके डोंगराळ असल्याने त्यांना पाच टक्के लोकवर्गणी बंधनकारक आहे. म्हणजे एखाद्या गावची योजना १ कोटी रुपयांची असेल तर किमान पाच लाख रुपये तरी ग्रामस्थांना लोकवर्गणी भरावी लागणार आहे. परंतु, आपल्याकडे ही वर्गणी ठेकेदाराने भरण्याची परंपरा असल्याने आताही याच पद्धतीने ती भरण्यासाठी दबाव आहे. नेतेमंडळीही आपल्या कार्यकर्त्यांचे ऐकून ठेकेदारालाच पैसे भरायला सांगत आहेत.

कामाचा दर्जा ठेवायचा कसायोजना मंजूर होण्याआधी ‘प्रोटोकॉल’ करायचा, योजना मंजूर झाली की आजी, माजी लोकप्रतिनिधी यांचाही ‘प्रोटेाकॉल’ पाहायचा. गावात प्रत्यक्ष काम सुरू करताना आजी, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेही समाधान करायचे आणि लोकवर्गणीही भरायची. हे सगळे करून दर्जेदार पाणी योजना कशी करायची, असा सवाल ठेकेदार विचारत आहेत.

७० ठेकेदारांकडे १००० योजनाजिल्ह्यातील फक्त ७० ठेकेदारांकडे १००० पाणी योजनांचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच ठेकेदाराकडे असलेल्या दहा, बारा पाणी योजनांची कामे ते वेळेत पूर्ण कशी करणार आणि त्याचा दर्जा राहणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी