शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

जलजीवन योजनेतील चिरीमिरी, टक्केवारीने अडचणीत ठेकेदारी, लोकवर्गणीही भरण्यासाठी ठेकेदारावर दबाव

By समीर देशपांडे | Updated: February 15, 2023 18:31 IST

समीर देशपांडे कोल्हापूर : आपल्याकडे जे काही करायचे आहे ते शासनाने करावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्यामुळे जलजीवन मिशनसाठीची लोकवर्गणीही ...

समीर देशपांडेकोल्हापूर : आपल्याकडे जे काही करायचे आहे ते शासनाने करावे अशीच ग्रामस्थांची भूमिका असल्यामुळे जलजीवन मिशनसाठीची लोकवर्गणीही ठेकेदारानेच भरावी यासाठी आता दबावतंत्र सुरू आहे. मुळात योजनाच चिरीमिरी आणि टक्केवारी ठरल्याशिवाय मंजूर होत नाही असे बहुतांशी योजनांच्या बाबतीत घडत असल्याने ‘चिरीमिरी, टक्केवारी, अडचणीत आली ठेकेदारी’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.शासकीय सर्व योजनांच्या बाबतीत सर्वच विभागांचे टक्केवारीचे दरपत्रक ठरलेले असते. आता नागरिकांनाही हे पाठ झाले आहे. त्यामुळे कोणत्याही नेत्याने एवढ्या कोटींची विकासकामे मंजूर केली अशी घोषणा केली की, लगेच नागरिक २० टक्क्याने हिशेब घालायला सुरुवात करतात. त्यामुळे जलजीवन मिशनच्या बाबतीतही हेच झाले आहे.मुळात कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता पाणी योजनांची कामे करणाऱ्या ठेकेदारांची संख्या मोजकी आहे. त्यातही उच्चशिक्षित आणि पात्रता असणाऱ्यांची संख्या कमीच आहे. परंतु, वेळेत आणि सर्वच जिल्ह्यांत योजना करायच्या असल्याने कमी असणारे ठेकेदार आणि अधिक संख्येच्या योजना अशी व्यस्त परिस्थिती दिसत आहे. त्यामुळे घेतलेल्या हातातील योजना पूर्ण करताना ठेकेदारांचीही दमछाक होणार आहे.या योजना तयार करताना पाणीपुरवठा विभागाकडे असणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बळावर अंदाजपत्रके तयार करताना ठेकेदारांनाही मदतीची भूमिका घ्यावी लागली आहे. त्यामुळे ‘प्रोटेाकॉल’नुसार राजकीय, प्रशासकीय अशा सर्वच पातळ्यांवर फायदा होण्याच्या आधीच वाटा देऊन ठेकेदार आता कामाला लागले आहेत.या जलजीवन मिशनच्या योजनांसाठी शिरोळ आणि हातकणंगले या दोन तालुक्यांसाठी दहा टक्के वर्गणी सक्तीची आहे, तर उर्वरित दहा तालुके डोंगराळ असल्याने त्यांना पाच टक्के लोकवर्गणी बंधनकारक आहे. म्हणजे एखाद्या गावची योजना १ कोटी रुपयांची असेल तर किमान पाच लाख रुपये तरी ग्रामस्थांना लोकवर्गणी भरावी लागणार आहे. परंतु, आपल्याकडे ही वर्गणी ठेकेदाराने भरण्याची परंपरा असल्याने आताही याच पद्धतीने ती भरण्यासाठी दबाव आहे. नेतेमंडळीही आपल्या कार्यकर्त्यांचे ऐकून ठेकेदारालाच पैसे भरायला सांगत आहेत.

कामाचा दर्जा ठेवायचा कसायोजना मंजूर होण्याआधी ‘प्रोटोकॉल’ करायचा, योजना मंजूर झाली की आजी, माजी लोकप्रतिनिधी यांचाही ‘प्रोटेाकॉल’ पाहायचा. गावात प्रत्यक्ष काम सुरू करताना आजी, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी यांचेही समाधान करायचे आणि लोकवर्गणीही भरायची. हे सगळे करून दर्जेदार पाणी योजना कशी करायची, असा सवाल ठेकेदार विचारत आहेत.

७० ठेकेदारांकडे १००० योजनाजिल्ह्यातील फक्त ७० ठेकेदारांकडे १००० पाणी योजनांचे काम देण्यात आले आहे. त्यामुळे एकाच ठेकेदाराकडे असलेल्या दहा, बारा पाणी योजनांची कामे ते वेळेत पूर्ण कशी करणार आणि त्याचा दर्जा राहणार का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरWaterपाणी