शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेल"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
4
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
5
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
6
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
7
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
8
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
9
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
10
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
11
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
12
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
13
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
14
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
15
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
16
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
17
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
18
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
19
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
20
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST

रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली ...

रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या पावसामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम हाेणार असल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, दापोली या भागात पावसाने हजेरी लावली हाेती. उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे यावर्षी आंबा पीक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अजूनही काही ठिकाणी झाडांना माेहोर येण्याची प्रक्रियाच न झाल्याने आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून थंडी जाणवू लागल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला हाेता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकाचा माेहोर काळा पडून गळून पडण्याची भीती आहे.

-------------------------------------------------------------------

कोल्हापुरात ढगाळ वातावरण

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासू्च पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी थांबून-थांबून सरी कोसळत राहिल्या. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत पावसाचे थेंब पडतच होते. दिवसभर ढगाळ वातावरण आणि तीननंतर काहीसे सूर्यदर्शन झाले तरी वातावरण कुंदच राहिले. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कायम राहणार असल्याने आज शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारपासून वातावरण निवळेल, असाही अंदाज आहे.

दरम्यान, गळीत हंगामावर अवकाळीची अवकृपा झाली असून, शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडी खोळंबल्या आहेत. आधीच मजूर टंचाईमुळे तोडणी पत्रक विस्कटले असताना आता पावसाने घातलेल्या धिंगाण्याने ऊस उत्पादक, तोडणी मजुरांसह कारखाना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे.

दक्षिण-मध्य अरबी समुद्र ते उत्तर-मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार नाही, पण ढगांच्या गडगडासह येणाऱ्या बिगरमोसमी पावसाने जानेवारी महिन्यातील शेतीसह ऊस तोडणी, वीज भट्टी, गुऱ्हाळे आदी हंगामावर पाणी फिरवले आहे. हे सगळे हंगाम ऐन जोरात असताना अवकाळीने मोठा ‘ब्रेक’ लावला आहे.

-------------------------------------------------------------------

साताऱ्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ आणि पावसाचे वातावरण झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षीची हाता-तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी चिंतेत पडला आहे.