शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST

रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली ...

रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या पावसामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम हाेणार असल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, दापोली या भागात पावसाने हजेरी लावली हाेती. उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे यावर्षी आंबा पीक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अजूनही काही ठिकाणी झाडांना माेहोर येण्याची प्रक्रियाच न झाल्याने आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून थंडी जाणवू लागल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला हाेता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकाचा माेहोर काळा पडून गळून पडण्याची भीती आहे.

-------------------------------------------------------------------

कोल्हापुरात ढगाळ वातावरण

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासू्च पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी थांबून-थांबून सरी कोसळत राहिल्या. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत पावसाचे थेंब पडतच होते. दिवसभर ढगाळ वातावरण आणि तीननंतर काहीसे सूर्यदर्शन झाले तरी वातावरण कुंदच राहिले. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कायम राहणार असल्याने आज शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारपासून वातावरण निवळेल, असाही अंदाज आहे.

दरम्यान, गळीत हंगामावर अवकाळीची अवकृपा झाली असून, शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडी खोळंबल्या आहेत. आधीच मजूर टंचाईमुळे तोडणी पत्रक विस्कटले असताना आता पावसाने घातलेल्या धिंगाण्याने ऊस उत्पादक, तोडणी मजुरांसह कारखाना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे.

दक्षिण-मध्य अरबी समुद्र ते उत्तर-मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार नाही, पण ढगांच्या गडगडासह येणाऱ्या बिगरमोसमी पावसाने जानेवारी महिन्यातील शेतीसह ऊस तोडणी, वीज भट्टी, गुऱ्हाळे आदी हंगामावर पाणी फिरवले आहे. हे सगळे हंगाम ऐन जोरात असताना अवकाळीने मोठा ‘ब्रेक’ लावला आहे.

-------------------------------------------------------------------

साताऱ्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ आणि पावसाचे वातावरण झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षीची हाता-तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी चिंतेत पडला आहे.