शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:22 IST

रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली ...

रत्नागिरी : हवामान खात्याने मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असतानाच गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली हाेती. या पावसामुळे आंबा व काजू पिकावर परिणाम हाेणार असल्याने आंबा बागायतदार धास्तावले आहेत.

जिल्ह्यातील रत्नागिरी, संगमेश्वर, लांजा, दापोली या भागात पावसाने हजेरी लावली हाेती. उशिरापर्यंत लांबलेला पाऊस, उशिराने सुरू झालेली थंडी यामुळे यावर्षी आंबा पीक समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. अजूनही काही ठिकाणी झाडांना माेहोर येण्याची प्रक्रियाच न झाल्याने आंबा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून थंडी जाणवू लागल्याने आंबा बागायतदारांना दिलासा मिळाला हाेता. मात्र, गुरुवारी जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकाचा माेहोर काळा पडून गळून पडण्याची भीती आहे.

-------------------------------------------------------------------

कोल्हापुरात ढगाळ वातावरण

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात बुधवारी सायंकाळपासू्च पावसाला सुरुवात झाली होती. यावेळी थांबून-थांबून सरी कोसळत राहिल्या. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत पावसाचे थेंब पडतच होते. दिवसभर ढगाळ वातावरण आणि तीननंतर काहीसे सूर्यदर्शन झाले तरी वातावरण कुंदच राहिले. दरम्यान, कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कायम राहणार असल्याने आज शुक्रवारी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शनिवारपासून वातावरण निवळेल, असाही अंदाज आहे.

दरम्यान, गळीत हंगामावर अवकाळीची अवकृपा झाली असून, शिवारात चिखल झाल्याने ऊसतोडी खोळंबल्या आहेत. आधीच मजूर टंचाईमुळे तोडणी पत्रक विस्कटले असताना आता पावसाने घातलेल्या धिंगाण्याने ऊस उत्पादक, तोडणी मजुरांसह कारखाना यंत्रणेच्या तोंडाला फेस आला आहे.

दक्षिण-मध्य अरबी समुद्र ते उत्तर-मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार नाही, पण ढगांच्या गडगडासह येणाऱ्या बिगरमोसमी पावसाने जानेवारी महिन्यातील शेतीसह ऊस तोडणी, वीज भट्टी, गुऱ्हाळे आदी हंगामावर पाणी फिरवले आहे. हे सगळे हंगाम ऐन जोरात असताना अवकाळीने मोठा ‘ब्रेक’ लावला आहे.

-------------------------------------------------------------------

साताऱ्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या मनात चिंतेचे ढग!

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून सततचे ढगाळ आणि पावसाचे वातावरण झाल्याने पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. यावर्षीची हाता-तोंडाशी आलेली पिके या प्रतिकूल वातावरणामुळे जाण्याच्या धास्तीने शेतकरी चिंतेत पडला आहे.