शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Kolhapur Flood: स्थलांतरित व्हा, आरामात राहा; महासैनिक दरबार येथे 'सेंट्रल किचन'ची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2024 14:05 IST

कोल्हा पूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे ...

कोल्हापूर : राधानगरी धरणातून ‘भोगावती’त, दुसरीकडे ‘कोयने’तून कृष्णा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने रात्रीत पाणीपातळी वाढणार आहे. त्यामुळे पूरबाधित भागातील नागरिकांनी दारापर्यंत पूर येण्याची वाट बघू नये, स्थलांतरित व्हा, आरामात राहा, घरात राहिल्यासारखे वाटेल, अशी चांगली सोय करू, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी केले.मागील महापुराप्रमाणे यंदाही ‘महासैनिक दरबार हॉल’मध्ये सेंट्रल किचन केले जाणार असून ‘केडीएम’सह, कंपन्या, कारखान्यांना व स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने नागरिकांची काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी शहर-जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी केली. त्यानंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, घरांमध्ये रात्रीतून पाणी घुसले तर लोकांना बाहेर काढणे अवघड होईल. त्यामुळे प्रशासन सांगेल ते ऐकून सहकार्य करा, वेळेत स्थलांतरित व्हा. तुम्हाला घरात राहिल्यासारखे वाटेल असे सहकार्य करू. आज शनिवारी दुपारी सर्व स्वयंसेवी संस्था, कारखाने, कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करणार आहे. मागील दोन महापुरांप्रमाणे महासैनिक दरबार हॉल येथे सेंट्रल किचन सुरू केले जाईल.

दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी राहिल्यास १० हजार देणारपालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, २८ जुलै २०२३ च्या अधिसूचनेनुसार घरात दोन दिवसांपेक्षा जास्त काळ पाणी राहिले असेल तर १० हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. तसेच दुकानदार, टपऱ्यांसाठीही मदत केली जाईल. एका दिवसात ६५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस होऊन घरांची पडझड झाली असेल तरी नुकसानभरपाई दिली जाईल.

पांडुरंगाला प्रार्थनामंत्री मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील सर्व धरणे भरली आहे. त्यामुळे आज मी पांडुरंग आणि तुळजाभवानीचे दर्शन घेऊन आलो. पाऊस मनासारखा झाला आहे; पण आता महापूर तेवढा येऊ नये, शेतकऱ्यांचे कल्याण होऊ दे, अशी प्रार्थना केली आहे.

‘अलमट्टी’तून विसर्ग योग्य पद्धतीने‘अलमट्टी’च्या आधी असलेल्या हिप्परगी बंधाऱ्यातून विसर्ग केला जात नाही अशी तक्रार होती; पण कोल्हापुरातून हिप्परगीमध्ये २ लाख आणि तितकाच विसर्ग हिप्परगीतून ‘अलमट्टी’मध्ये होत आहे. अलमट्टीतून ३ लाख क्युसेक विसर्ग सुरू असून तेथे महाराष्ट्रातील एका उपअभियंत्याची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शंका दूर झाली आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरHasan Mushrifहसन मुश्रीफ