शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
3
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
4
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
5
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
6
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
7
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
8
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
9
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
10
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
11
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
12
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
13
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
14
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
15
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
16
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
17
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
18
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
19
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
20
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 13:21 IST

उमेदवारांना थांबवताना अडचण

अतुल आंबीइचलकरंजी : विधानसभेसाठी उमेदवार निश्चित झाले नसले तरी आरोप-प्रत्यारोप मात्र सुरू झाले आहे. इचलकरंजी शहरातील विकासकामांसह पाणी योजनेभोवती राजकारण फिरत आहे; परंतु ऐन निवडणुकीवेळी कोणता मुद्दा चर्चेला येतो आणि त्यावेळी जो जोर लावतो, तोच बाजी मारतो, असे काहीसे समीकरण या मतदारसंघात दिसत आहे. त्यामुळे राजकीय व्यक्ती एकमेकांना घेरण्यासाठी सरसावले आहेत.गत निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनी ऐनवेळी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दहा वर्षे आमदार असलेल्या सुरेश हाळवणकर यांना वस्त्रोद्योग आणि पाणी या मुद्द्यांवर घेरले तसेच निवडून आल्यानंतर भाजपला पाठिंबा देणार असल्याची वातावरणनिर्मिती केली. त्याचे फलित म्हणून आवाडे विजयी झाले.गत लोकसभा निवडणुकीतही असाच प्रकार घडला. बघता बघता धैर्यशील माने यांना उमेदवारी मिळाली आणि शहराचा पाणीप्रश्न आणि वस्त्रोद्योग याच मुद्द्यांवर घेरून माजी खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करण्यात आले. तोच धागा पकडत या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पाणीप्रश्न गाजविण्याचा प्रयत्न झाला. परंतु तिरंगी लढत आणि हिंदुत्ववादी मतांचा प्रभाव यातून पुन्हा माने यांनी बाजी मारली.

यावेळी आमदार आवाडे यांनी पुत्र राहुल यांना उमेदवार घोषित केले आहे. त्यादृष्टीने त्यांची महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर उमेदवारी मिळविण्यासाठी फिल्डिंग सुरू आहे. उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्ष लढण्याची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक रान उठविण्याचा कार्यक्रम आमदार आवाडे यांनी सुरू केला आहे. कोणत्याही विषयाचा कार्यक्रम असो, आमदार आवाडे यांचे भाषण राजकीय विषयाला धरून चर्चेत राहील, असेच असते. पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेले संजय कांबळे यांच्यानंतर त्यांनी नाव न घेता हाळवणकरांवरही आगपाखड केली आहे.

त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनीही त्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विठ्ठल चोपडे यांनी, आवाडे यांच्याकडून स्वत:चे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यायावर आरोप करण्याचा प्रकार सुरू असल्याचे पत्रक काढले तसेच सागर चाळके यांनी, शहरातील पाच वर्षांत केलेले ठळक विकासकाम सांगा अथवा चौकात एका मंचावर सभा लावा, असे आव्हान दिले. तर कांबळे यांनी आवाडे खोटे बोलतात व दिशाभूल करतात, असा आरोप केला. त्यानंतरही आवाडे यांनी एका वार्षिक सभेत हाळवणकर यांना घेरत गावाशी देणं-घेणं नसलेल्या, नियोजन नसलेले व्यक्ती गावचे लोकप्रतिनिधी झाले. त्यामुळे विकास खुंटला, असा आरोप नाव न घेता केला.

उमेदवारांना थांबवताना अडचणमहाविकास आघाडी एकसंध असल्याचे सांगत असले तरी सर्व घटक पक्षांतील इच्छुक उमेदवार मात्र जोरदार तयारीला लागले आहेत. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर एका उमेदवाराचे नाव निश्चित झाल्यास तयारी पूर्ण झालेल्या अन्य उमेदवारांना थांबविताना अडचण होणार आहे. त्यामुळे वेळीच निर्णय होणे आवश्यक आहे.

बारा आमदारांची नियुक्ती पुढे गेलीविधानपरिषदेवर नियुक्त केल्या जाणाऱ्या बारा आमदारांमध्ये सुरेश हाळवणकर यांचे नाव घेतले जाईल आणि इचलकरंजीत महायुतीकडून आवाडे यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा सुरू होती. परंतु बाराजणांच्या नियुक्तीचा कार्यक्रम ऑक्टोबरपर्यंत पुढे गेल्याने पुन्हा पेच निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी कस लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरichalkaranji-acइचलकरंजीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाPrakash Awadeप्रकाश आवाडेSuresh Ganapati Halvankarसुरेश गणपती हाळवणकर