शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
3
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
4
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
5
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
6
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
7
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
8
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
9
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
10
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
11
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
12
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
13
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
14
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
15
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
16
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
17
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
18
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
19
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
20
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   

शाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2019 13:38 IST

बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९९१मध्ये ते कोल्हापूरातील गंगावेश येथील गंगा आयुर्वेदीक कॉलेजमध्ये दाखल झाले.

ठळक मुद्देशाहू महाराजांच्या कोल्हापूरमध्ये गोव्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांची जडणघडणशिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ची पदवी १९९७मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले.

कोल्हापूर : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जागी शपथविधी झालेले डॉ. प्रमोद सावंत यांची राजकीय जडणघडण ही कोल्हापूरातून झाली आहे. या ठिकाणी वैद्यकिय शिक्षण घेताना त्यांनी जनरल सेक्रेटरी (जी.एस.) पदी निवडून येऊन आपल्यातील नेतृत्व गुणाची चुणूक दाखविली.

गोव्यातील छोट्याशा खेड्यात डॉ. सावंत यांचा जन्म झाला. वडील हे जनसंघाचे कार्यकर्ते होते. त्यामुळे त्यांच्यावर घरातूनच राजकीय व सामाजिक कार्याचे धडे मिळाले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी गोव्यात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी १९९१मध्ये ते कोल्हापूरातील गंगावेश येथील गंगा आयुर्वेदीक कॉलेजमध्ये दाखल झाले.

या काळात ते रंकाळा परिसरात भाड्याने राहीले. त्यांच्या नेतृत्व गुण ओळखून मित्र परिवाराने त्यांना १९९२मध्ये जनरल सेक्रेटरी पदाच्या निवडणुकीसाठी उभे केले. यामध्ये ते चांगल्या मतांनी विजयी झाले. त्यांच्या आयुष्यातील ही पहिली निवडणूक होती. या निमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला.

१९९७मध्ये त्यांचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले. यावेळी त्यांनी शिवाजी विद्यापीठातून ‘बीएएमएस’ची पदवी घेतली. या काळात त्यांचा अनेकांशी ऋणानुबंध आला. ते अंबाबाईचे निस्सिम भक्त आहेत. दरवर्षी ते नवरात्रात न चुकता अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. तसेच ते आपल्या महाविद्यालयीन मित्र परिवारालाही आवर्जुन भेटतात. गप्पांचा फड रंगतो व जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.

ते २०१२मध्ये पहिल्यांदा साखळी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले. त्यावेळी कोल्हापूरातील त्यांच्या १९९७च्या बॅचने त्यांचा सत्कार केला होता. त्यानंतर ते दुसऱ्यांदा विजयी होऊन विधानसभा सभापती झाल्यानंतरही कोल्हापूरात त्यांचा बॅचच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. ते मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे अत्यंत विश्वासू सहकारी असल्याने त्यांच्यावर विधानसभा अध्यक्ष आणि आता मुख्यमंत्रीपदाची माळ पडल्याचे त्यांचे मित्र डॉ. रणजीत सावंत सांगतात.

ते कोल्हापूरात आल्यानंतर चर्चेवेळी नेहमीच मुख्यमंत्री पर्रिकरांचा विषय काढून त्यांच्या कामाचे कौैतुक करायचे. कोल्हापूरात आल्यावर ते आवर्जून माझ्या उचगाव येथील निवासस्थानी रहायला यायचे,आमदार असतानाही ते आले होते. परंतु आत राजशिष्टाचारामुळे त्यांना ते शक्य होत नाही. परंतु आमच्या भेटी गाठी होत असतात असे रणजीत सावंत यांनी सांगितले.----------------आमचा वर्गमित्र हा गोव्याचा मुख्यमंत्री झाल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. सर्वात तरुण व मनमिळाऊ असणारे हे मुख्यमंत्री नक्कीच चांगले काम करतील असा विश्वास आहे. त्यांचा लवकरच आम्ही कोल्हापूरात सत्कार करणार आहोत.-डॉ.रणजीत सावंत, (मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे कोल्हापूरातील मित्र)

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतkolhapurकोल्हापूर