शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष.मिठारी | Updated: September 18, 2022 18:53 IST

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर  - मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याने जर पेचप्रसंग निर्माण झाला असेल, तर राज्यपालांची संविधानिक जबाबदारी आहे की, त्यांनी तशा प्रकारचा अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठविला पाहिजे. राष्ट्रपती जे मार्गदर्शन करतील, त्यानुसार त्यांनी निर्णय दिला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांनी असा अहवाल राष्ट्रपती यांना पाठविलेला नाही. त्यामुळे संविधानिक पेचप्रसंग निर्माण झाल्याचे सर्वोच्य न्यायालयाचे मत झाल्यास राज्यातील ‘शिंदे सरकार कोसळणार’ अशी परिस्थिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मेळाव्यानिमित्त ते कोल्हापुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार जरी गेले, तरी सभागृह बरखास्त होणार नाही. एका स्टे ऑर्डरवर तीन महिने सरकार चालले आहे. ते अत्यंत गंभीर आणि देशाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. १६ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय द्यावा लागेल. राजाचा वाढदिवस लोकांनी साजरा करावा, असे आता सुरू झाले आहे. या देशात चित्तादेखील कधी आणावा? त्याचा मुहूर्त पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा असावा. हे जिथे ठरले जाते, तिथे राजेशाही नव्याने सुरू झाल्याचे लोकांनी लक्षात घ्यावे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राज्यात भाजप अथवा त्यांच्यासमवेत जाणाऱ्या मित्रपक्षांसमवेत आम्ही जाणार नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आघाडीचे पक्षनिरीक्षक सोमनाथ साळोखे, क्रांती सावंत, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले

१) म्यानमारमधील कडधान्य खासगी व्यापाऱ्यांऐवजी केंद्र सरकारने घेतले असते, तर महागाईवर नियंत्रण ठेवता आले असते.

२) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वेदांताने केलेली चर्चा अथवा प्रस्ताव कधी दिला, याची तारीख त्यांनी जाहीर करावी. त्यामुळे आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे अथवा नाही, ते स्पष्ट होईल.

३) काँग्रेसवर त्यांचे मित्रपक्ष टीका करत आहेत की, भारत जोडो यात्रा भाजपच्या राज्यांऐवजी इतर राज्यांत दिसत आहे, त्याचा खुलासा काँग्रेसकडून होत नाही. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी