शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

"...तर राज्यातील ‘शिंदे सरकार’ कोसळणार"; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

By संतोष.मिठारी | Updated: September 18, 2022 18:53 IST

काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोल्हापूर  - मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याने जर पेचप्रसंग निर्माण झाला असेल, तर राज्यपालांची संविधानिक जबाबदारी आहे की, त्यांनी तशा प्रकारचा अहवाल राष्ट्रपती यांच्याकडे पाठविला पाहिजे. राष्ट्रपती जे मार्गदर्शन करतील, त्यानुसार त्यांनी निर्णय दिला पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे राज्यपालांनी असा अहवाल राष्ट्रपती यांना पाठविलेला नाही. त्यामुळे संविधानिक पेचप्रसंग निर्माण झाल्याचे सर्वोच्य न्यायालयाचे मत झाल्यास राज्यातील ‘शिंदे सरकार कोसळणार’ अशी परिस्थिती असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील पदाधिकारी मेळाव्यानिमित्त ते कोल्हापुरात आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सरकार जरी गेले, तरी सभागृह बरखास्त होणार नाही. एका स्टे ऑर्डरवर तीन महिने सरकार चालले आहे. ते अत्यंत गंभीर आणि देशाच्या दृष्टिकोनातून घातक आहे. १६ आमदारांच्या निलंबनाबाबत विधानसभेच्या अध्यक्षांना निर्णय द्यावा लागेल. राजाचा वाढदिवस लोकांनी साजरा करावा, असे आता सुरू झाले आहे. या देशात चित्तादेखील कधी आणावा? त्याचा मुहूर्त पंतप्रधानांच्या वाढदिवसाचा असावा. हे जिथे ठरले जाते, तिथे राजेशाही नव्याने सुरू झाल्याचे लोकांनी लक्षात घ्यावे. आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही राज्यात भाजप अथवा त्यांच्यासमवेत जाणाऱ्या मित्रपक्षांसमवेत आम्ही जाणार नाही. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला आमच्यासमवेत समझोता करायचा असेल तर आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आघाडीचे पक्षनिरीक्षक सोमनाथ साळोखे, क्रांती सावंत, जिल्हाध्यक्ष दयानंद कांबळे, विलास कांबळे आदी उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले

१) म्यानमारमधील कडधान्य खासगी व्यापाऱ्यांऐवजी केंद्र सरकारने घेतले असते, तर महागाईवर नियंत्रण ठेवता आले असते.

२) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी वेदांताने केलेली चर्चा अथवा प्रस्ताव कधी दिला, याची तारीख त्यांनी जाहीर करावी. त्यामुळे आशिष शेलार यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे अथवा नाही, ते स्पष्ट होईल.

३) काँग्रेसवर त्यांचे मित्रपक्ष टीका करत आहेत की, भारत जोडो यात्रा भाजपच्या राज्यांऐवजी इतर राज्यांत दिसत आहे, त्याचा खुलासा काँग्रेसकडून होत नाही. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी