शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडीत, शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर वीजपुरवठा तात्काळ सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2021 18:08 IST

कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

कागल : येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाकडून कृषी पंपाची बिले भरली नाहीत म्हणून पुर्ण डीपीचाच वीजपुरवठा खंडीत करण्याचा तुघलकी निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात आज, शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन करीत महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. शेतकरीवर्ग आक्रमक झाल्याने डीपींचा वीजपुरवठा तात्काळ सुरू करीत असल्याचे कंपनीकडून जाहीर करण्यात आले.दरम्यान चुकीची तसेच वाढीव आलेली बिले दुरूस्त करून देण्यात येतील. मोठ्या रक्कमेच्या बिलांना हप्ते करून देण्यात येईल. मात्र दोन ते तीन दिवसानंतर जर बील भरले नाही तर वैयक्तीक कनेक्शन बंद करण्यात येतील. असेही उप कार्यकारी अभियंता विक्रांत सपाटे यांनी स्पष्ट केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर कोंडेकर, अविनाश मगदुम, प्रभु भोजे, सचिन घोरपडे, अशोक शिरोळे, बाळासाहेब पाटील यांच्यासह काही शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या मनमानीपणाबद्दल तक्रारी मांडल्या. या आंदोलनात कागल, करनुर, वंदुर या गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या‌वेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भाषणे केली. विज वितरण कंपनीचे विक्रांत सपाटे, तानाजी  कोरवी, विणा मठकर यांना धारेवर धरले. अजय पोवार हे कार्यकर्त्यांचा रोष पाहून तेथून पसार झाले. पोलीस उपनिरिक्षक शशिकांत गच्चे यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाकचौरे यांनी मध्यस्थी करीत आंदोलनात तोडगा काढला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी