शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

चार तासांत केला ६० गावांचा वीज पुरवठा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापुरात दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे ७० गावांतील वीज ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे कोल्हापुरात दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे ७० गावांतील वीज पुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात काम करून अवघ्या चार तासांत त्यातील ६० गावांचा वीज पुरवठा सुरळीत केला. राधानगरी तालुक्यात तर नदीतून पोहत जाऊन वीज वाहिन्या जोडून नागरिकांची गैरसोय टाळली.

तौक्ते चक्रीवादळाचा फटका कोल्हापूरलाही बसला. महावितरणला आर्थिक झळ बसली नसली तरी ४५ हून अधिक ठिकाणचे विद्युत खांब पडले होते. अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या वीज वाहिनीवर पडल्याने तारा तुटल्या होत्या. त्यामुळे ७० हून अधिक गावातील वीज पुरवठा खंडित झाला होता. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांची भर पावसात खंडित वीज पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. सोमवारी बहुतांशी ठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत केला.

नदीपात्रात उतरून तुटलेल्या तारा जोडल्या

बिद्री बोरवडे फीडरची तुरंबे येथील नदी क्रॉसिंगची तुटलेली वीज वाहिनी सरवडे शाखा कार्यालयातील जनमित्र निवास पाटील, अजित बागडी यांनी धाडसाने नदीतून पाेहत जाऊन अभिजित चौगले व रूपेश सापळे यांच्या मदतीने जोडली. वीज वाहिनीवर पडलेली झाडे काढून तुरंबे, कपिलेश्वर, मांगोली येथील खंडित वीजपुरवठा सुरळीत केला. शाखा अभियंता नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे धाडसी काम केले.

फोटो ओळी : वादळी पावसाने महावितरणचे विद्युत खांब पडले, विद्युत वाहिनी तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता. सरवडे (ता. राधानगरी) शाखेच्या कर्मचाऱ्यांंनी पावसात विद्युत वाहिन्या दुरुस्त करून वीज पुरवठा सुरळीत केला. (फोटो-१७०५२०२१-कोल-सरवडे व सरवडे०१)