शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

टपाल विभागही होतोय ‘हायटेक’

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

इचलकरंजीत एटीएम होणार : जिल्ह्यातील नऊ कार्यालयांत कोअर बँकिंग प्रणाली सुरू

अतुल आंबी - इचलकरंजी --टपाल विभागाचे आधुनिकीकरण सुरू झाले असून, जिल्ह्यातील पहिले एटीएम मशीन इचलकरंजीत बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ टपाल कार्यालये कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे जोडण्यात आली असून, लवकरच उर्वरित सर्व कार्यालयेही या प्रणालीला जोडून आॅनलाईन करण्यात येणार आहेत. त्यामुळे टपाल कार्यालयांचे कामकाज आता बॅँकांच्या बरोबरीने 'हायटेक' होत आहे.टपाल खात्याचे जिल्ह्यातील पहिले एटीएम मशीन इचलकरंजीत बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर व जयसिंगपूर येथे एटीएम मशीन बसविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात सर्व मुख्य टपाल कार्यालयांत एटीएम मशीन बसविले जाणार आहे. सुरुवातीला या एटीएम कार्डाद्वारे फक्त टपाल विभागाच्या खात्यावरीलच रक्कम काढता येणार आहे. मात्र, देशभरात सर्व टपाल कार्यालये आॅनलाईन पद्धतीने जोडणी झाल्यानंतर बॅँकेशी संलग्न करून बॅँकांप्रमाणे सर्व एटीएम मशीनमध्ये एकमेकाचे एटीएम कार्ड वापरता येणार आहे. त्यामुळे टपाल विभागातील व्यवहार आता सुलभ होणार आहेत.केंद्रीय विभागाच्या देखरेखीखाली चालणारा टपाल खात्याचा व्यवहार हा पारदर्शी व विश्वासार्ह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा याकडे कल वाढून टपाल कार्यालयातील उलाढालही वाढेल. याला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीनेही टपाल खात्याच्या माध्यमातून विविध ठेव योजना राबविल्या जात आहेत. सर्वच क्षेत्रात आता अत्याधुनिक सेवा-सुविधा आॅनलाईन पद्धतीने देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये सर्वांत जुना असलेला टपाल विभागही आता ‘हायटेक’ होत असल्यामुळे ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी एकूण ४६६ पोस्ट कार्यालये असून, पहिल्या टप्प्यात नऊ मुख्य कार्यालये कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे जोडली आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर, रेल्वे स्टेशन, शाहूपुरी, शनिवार पेठ, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९६ कार्यालये आॅनलाईन जोडली जाणार आहेत. या पद्धतीने २०१८ पर्यंत सर्व टपाल कार्यालये या प्रणालीद्वारे जोडून आॅनलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बॅँकांमध्ये केले जाणारे सर्व व्यवहार टपाल कार्यालयात झाले तर नवल वाटायला नको.