शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
4
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या 'फतेह-२'चे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
5
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
6
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
7
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
8
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
9
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
10
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
11
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
12
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
13
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
14
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
15
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
16
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
17
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
18
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
19
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
20
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...

टपाल विभागही होतोय ‘हायटेक’

By admin | Updated: April 8, 2015 00:31 IST

इचलकरंजीत एटीएम होणार : जिल्ह्यातील नऊ कार्यालयांत कोअर बँकिंग प्रणाली सुरू

अतुल आंबी - इचलकरंजी --टपाल विभागाचे आधुनिकीकरण सुरू झाले असून, जिल्ह्यातील पहिले एटीएम मशीन इचलकरंजीत बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील नऊ टपाल कार्यालये कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे जोडण्यात आली असून, लवकरच उर्वरित सर्व कार्यालयेही या प्रणालीला जोडून आॅनलाईन करण्यात येणार आहेत. त्यामुळे टपाल कार्यालयांचे कामकाज आता बॅँकांच्या बरोबरीने 'हायटेक' होत आहे.टपाल खात्याचे जिल्ह्यातील पहिले एटीएम मशीन इचलकरंजीत बसविण्यात येणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच ग्राहकांना ही सेवा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोल्हापूर व जयसिंगपूर येथे एटीएम मशीन बसविण्यात येणार आहे. पुढच्या टप्प्यात सर्व मुख्य टपाल कार्यालयांत एटीएम मशीन बसविले जाणार आहे. सुरुवातीला या एटीएम कार्डाद्वारे फक्त टपाल विभागाच्या खात्यावरीलच रक्कम काढता येणार आहे. मात्र, देशभरात सर्व टपाल कार्यालये आॅनलाईन पद्धतीने जोडणी झाल्यानंतर बॅँकेशी संलग्न करून बॅँकांप्रमाणे सर्व एटीएम मशीनमध्ये एकमेकाचे एटीएम कार्ड वापरता येणार आहे. त्यामुळे टपाल विभागातील व्यवहार आता सुलभ होणार आहेत.केंद्रीय विभागाच्या देखरेखीखाली चालणारा टपाल खात्याचा व्यवहार हा पारदर्शी व विश्वासार्ह म्हणून ओळखला जातो. त्यामुळे साहजिकच ग्राहकांचा याकडे कल वाढून टपाल कार्यालयातील उलाढालही वाढेल. याला चालना देण्यासाठी शासनाच्यावतीनेही टपाल खात्याच्या माध्यमातून विविध ठेव योजना राबविल्या जात आहेत. सर्वच क्षेत्रात आता अत्याधुनिक सेवा-सुविधा आॅनलाईन पद्धतीने देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये सर्वांत जुना असलेला टपाल विभागही आता ‘हायटेक’ होत असल्यामुळे ग्राहकांतून समाधान व्यक्त होत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण अशी एकूण ४६६ पोस्ट कार्यालये असून, पहिल्या टप्प्यात नऊ मुख्य कार्यालये कोअर बॅँकिंग प्रणालीद्वारे जोडली आहेत. यामध्ये कोल्हापूर शहर, रेल्वे स्टेशन, शाहूपुरी, शनिवार पेठ, इचलकरंजी, गडहिंग्लज, जयसिंगपूर, कुरुंदवाड यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जिल्ह्यातील ९६ कार्यालये आॅनलाईन जोडली जाणार आहेत. या पद्धतीने २०१८ पर्यंत सर्व टपाल कार्यालये या प्रणालीद्वारे जोडून आॅनलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बॅँकांमध्ये केले जाणारे सर्व व्यवहार टपाल कार्यालयात झाले तर नवल वाटायला नको.