शहरं
Join us  
Trending Stories
1
६ डिसेंबरला करायचा होता स्फोट, पण अटकसत्रामुळे उधळला कट, ‘कार बॉम्ब’ची सुरू होती तयारी, नेटवरून घेतले धडे
2
आजचे राशीभविष्य,१३ नोव्हेंबर २०२५: कामाच्या धावपळीत कुटुंबाकडे दुर्लक्ष; सरकारकडून लाभाची शक्यता
3
लग्न होत नाहीये, पत्नी मिळवून द्या! तुमचे उपकार विसरणार नाही! अकाेल्यातील तरुणाचे थेट शरद पवारांना साकडे
4
दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री
5
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र ठरलेले लंडनमधील ‘इंडिया हाऊस’ आता महाराष्ट्र सरकार करणार खरेदी
6
५०० वर्षांनी गुरु-शनिचा शुभ योग: १० राशींना चौफेर चौपट लाभ, समस्या संपतील; पद-पैसा-भाग्योदय!
7
Datta Jayanti 2025: यंदा दत्त जयंती गुरुवारी, अत्यंत शुभ दिवस; पाहा, महत्त्व अन् महात्म्य!
8
तेजस्वीची राजद घेईल सर्वाधिक जागा, पण सत्ता एनडीएचीच, 'ॲक्सिस माय इंडिया' एक्झिट पोलमध्ये अंदाज  
9
त्या दहशतवादी महिला डॉक्टरचा माजी पती म्हणतो... ती प्रेमळ आई
10
काश्मीरमध्ये तीन दिवसांत तब्बल १५०० जण ताब्यात, कुलगाम-सोपोरसह शेकडो ठिकाणी छापे, झडती तीव्र
11
एमसीएच्या निवडणुकीमध्ये आ. जितेंद्र आव्हाड यांची बाजी, उपाध्यक्षपदी १३६ मतांनी विजय; अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड
12
‘ओंकार’ जाणार वनतारामध्ये, सर्किट बेंचचा निर्णय, मूळ याचिका कायम
13
तुर्कीयेचे लष्करी मालवाहतूक विमान कोसळले; २० ठार
14
रोहित शर्मा ७ वर्षांनंतर खेळणार विजय हजारे करंडक, विराटबाबत संभ्रम
15
जुरेल घेणार रेड्डीचे स्थान, पहिल्या कसोटीत ऋषभ पंतही खेळणार, अक्षर पटेलला अंतिम संघात संधी
16
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
17
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
18
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
19
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
20
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा

जिल्ह्यातील उद्योग बंद राहण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 11:40 IST

CoronaVirus Shiroli Kolhapur : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संचार बंदीच्या काळात उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अजिंक्यतारा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विनंती केली होती; पण शासन निर्देशानुसार आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरू ठेवावे लागतील.

ठळक मुद्देजिल्ह्यातील उद्योग बंद राहण्याची शक्यताउद्योग बंद राहिल्यानंतर सर्वांना फटका

शिरोली : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संचार बंदीच्या काळात उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अजिंक्यतारा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विनंती केली होती; पण शासन निर्देशानुसार आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरू ठेवावे लागतील.

यामध्ये संबंधित कंपनीने कामगारांना कंपनीतच ठेवावे, किंवा इतर कुठे ही एकत्रित ठेवावे.कामगारांना ये-जा करता येणार नाही. अन्यथा बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. त्यामुळे १५ ते ३० एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंदे बंद राहण्याची शक्यता आहे.

मुंबई, पुणे या मोठ्या मेट्रो शहरानंतर कोल्हापूर येथील ऑटोमोबाइल उद्योग हे जगभरात प्रसिद्ध आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, या मोठ्या औद्योगिक वसाहतीबरोबरच कोल्हापूर शहरातील वाय. पी. पोवार नगर, उद्यमनगर याठिकाणी लहान लहान उद्योग आहेत, तसेच हातकणंगले, इचलकरंजी, कुशिरे, गडहिंग्लज याठिकाणीसुद्धा उद्योग विस्तार झालेला आहे. जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे पाच हजारांहून अधिक उद्योग आहेत, तर या उद्योगावर अवलंबून असलेले सुमारे एक लाखापेक्षा जास्त कामगार आहेत.

परप्रांतीय मंजुरांची संख्या २० हजार पेक्षा जास्त आहे. त्यामुळे उद्योग बंद राहिल्यानंतर या सर्वांना फटका बसणार आहे. यावेळी स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील,राजू पाटील,मॅक अध्यक्ष गोरख माळी, दिनेश बुधले यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेतील औषध तयार करणाऱ्या कंपन्या, शेती औजारे तयार करणारे उद्योग, कोरोगेटेड इंडस्ट्रीज सुरू राहणार आहेत.

शासनाने जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्राकानुसार नियम व अटी मान्य करून ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्योग सुरू ठेवावेत.

-अतुल पाटील-अध्यक्ष स्मॅक

कामगार रस्त्यावरून येणार-जाणार नाहीत. जे कामगारांना कंपनीतच ठेवतील त्यांचेच उद्योग सुरू राहणार आहेत.

-श्रीकांत पोतनीस -अध्यक्ष गोशिमा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर