शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
2
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
3
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
4
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
5
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
6
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
7
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
8
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
9
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
10
विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा 
11
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
12
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
13
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
14
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
15
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये या अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार रावणाच्या जवळच्या व्यक्तीची भूमिका
17
हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली...
18
पत्नी आणि दोन मुलींची हत्या करून पती फरार; तिहेरी हत्याकांडांने दिल्ली हादरली
19
'या' देशातील लोक आता आपला पत्ताच बदलणार; संपूर्ण देश ऑस्ट्रेलियामध्ये सामील होणार! कारण काय?
20
ICICI Bank Minimum Balance: आता ₹१०००० नाही, बचत खात्यात ₹५०००० चा मिनिमम बॅलन्स ठेवावा लागणार, 'या' दिवसापासून नियम लागू होणार

भांडवली मूूल्यावर आधारित घरफाळा रद्द होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 12:03 IST

मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घरफाळा विभागाकडे चौकशी केली असता, निकालाची अधिकृत माहिती नसल्याने याबाबत भाष्य करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.

ठळक मुद्देभांडवली मूूल्यावर आधारित घरफाळा रद्द होण्याची शक्यतामुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घरफाळा विभागाकडे चौकशी केली असता, निकालाची अधिकृत माहिती नसल्याने याबाबत भाष्य करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.मुंबई महानगरपलिकेतर्फे २०१० सालापासून भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केली जात होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती अवैध ठरली आहे. तसेच मुंबई म्युनिसिपल कायद्यातील संबंधित कलमे रद्द होतील.कोल्हापूर महानगरपालिकाही सन २०१२-१३ या वर्षापासून शहरातील मिळकतींवर भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी करीत आहे.

ही करपद्धती अन्यायकारक तसेच भरमसाटी असल्याच्या तक्रारी शहरातील विविध संघटना तसेच व्यक्तींनी यापूर्वी केल्या असून ती रद्द करण्याची मागणी होत आहे. परंतु महापालिका प्रशासनाने त्यास दाद लागू दिली नाही. तिची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे.

जेव्हा ही करवाढ लागू केली तेव्हा ती एकदम ४० टक्के झाली होती. तसेच भांडवली मूल्य २०१२-१३ सालचे धरण्यात आले होते. आजही तेच दर आहेत. त्यामुळे अन्य महानगरपालिकांच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिकेचे दर सर्वाधिक असल्याने येथील व्यवसायवाढीवर परिणाम झाला आहे. अलीकडेच काही पदाधिकाऱ्यांनी भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारे कोल्हापुरातूनही न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता असून येथील कर आकारणी पद्धत रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पाहिल्याशिवाय यावर काहीही भाष्य करता येणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर