शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

भांडवली मूूल्यावर आधारित घरफाळा रद्द होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 12:03 IST

मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घरफाळा विभागाकडे चौकशी केली असता, निकालाची अधिकृत माहिती नसल्याने याबाबत भाष्य करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.

ठळक मुद्देभांडवली मूूल्यावर आधारित घरफाळा रद्द होण्याची शक्यतामुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा परिणाम

कोल्हापूर : मुंबई महानगरपालिकेने केलेली भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी रद्द करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेतील अशाच प्रकारे होत असलेली कर आकारणी रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. याबाबत रात्री महापालिका घरफाळा विभागाकडे चौकशी केली असता, निकालाची अधिकृत माहिती नसल्याने याबाबत भाष्य करण्याचे अधिकाऱ्यांनी टाळले.मुंबई महानगरपलिकेतर्फे २०१० सालापासून भांडवली मूल्यावर आधारित कर आकारणी केली जात होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ती अवैध ठरली आहे. तसेच मुंबई म्युनिसिपल कायद्यातील संबंधित कलमे रद्द होतील.कोल्हापूर महानगरपालिकाही सन २०१२-१३ या वर्षापासून शहरातील मिळकतींवर भांडवली मूल्यावर आधारित करआकारणी करीत आहे.

ही करपद्धती अन्यायकारक तसेच भरमसाटी असल्याच्या तक्रारी शहरातील विविध संघटना तसेच व्यक्तींनी यापूर्वी केल्या असून ती रद्द करण्याची मागणी होत आहे. परंतु महापालिका प्रशासनाने त्यास दाद लागू दिली नाही. तिची अंमलबजावणी सुरूच ठेवली आहे.

जेव्हा ही करवाढ लागू केली तेव्हा ती एकदम ४० टक्के झाली होती. तसेच भांडवली मूल्य २०१२-१३ सालचे धरण्यात आले होते. आजही तेच दर आहेत. त्यामुळे अन्य महानगरपालिकांच्या तुलनेत कोल्हापूर महानगरपालिकेचे दर सर्वाधिक असल्याने येथील व्यवसायवाढीवर परिणाम झाला आहे. अलीकडेच काही पदाधिकाऱ्यांनी भाड्याने दिलेल्या मिळकतींचा कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या आधारे कोल्हापुरातूनही न्यायालयात याचिका दाखल होण्याची शक्यता असून येथील कर आकारणी पद्धत रद्द होण्याची आशा निर्माण झाली आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल पाहिल्याशिवाय यावर काहीही भाष्य करता येणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर