शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

प्रदूषणप्रश्नी अद्याप कारवाई शून्य

By admin | Updated: January 19, 2015 00:49 IST

पंचगंगा प्रदूषण : तीव्र आंदोलनानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळ सुस्तच; आरोग्याचा प्रश्न गंभीर

गणपती कोळी - कुरुंदवाड\पंचगंगा नदी प्रदूषणामुळे नदीतील मासे मृत होत असल्याने शुक्रवारी स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन केले. आंदोलन झाले, अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, आश्वासने दिली, दूषित पाणी वाहून जाण्यासाठी बंधाऱ्याचे बरगे काढण्याचाही निर्णय झाला; मात्र दोन दिवस उलटले तरी अद्याप कोणतीही कारवाई नाही. माशांचे मरण मात्र अद्यापही चालूच आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय माशांवर उदरनिर्वाह करणाऱ्या बागडी समाजावरही उपासमारीची वेळ येत आहे. त्यामुळे आंदोलकर्त्यांनी तीव्र आंदोलन करूनही अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर कोणताही परिणाम न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत असून, पंचगंगा प्रदूषण प्रश्न आणखी पेटण्याची शक्यता आहे.पंचगंगा नदीवरील शिरोळचा बंधारा शेवटचा असला तरी तेरवाड बंधाऱ्यावर पाणी तटवून तालुक्यातील बहुतांश गावांना पिण्यासाठी व शेतीसाठी पाण्याचा पुरवठा केला जातो. सध्या नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग कमी झाला असल्याने रूई, चंदूर, कबनूर, इचलकरंजी शहरांतील सांडपाण्याबरोबर औद्योगिकरणाचे पाणी नदीत सोडले जात असल्याने पाणी काळेकुट्ट झाले आहे. पाण्याला उग्र वास येत असून, पाण्यातील आॅक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने पाणी स्वच्छ करणारे जलचर प्राणी (मासे) तडफडून मृत होत आहेत. तेरवाड बंधाऱ्याला तटून पाण्यामध्ये माशांचा थर लागल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बंडू पाटील (हेरवाड), विश्वास बालिघाटे (शिरढोण), महेश पाटील (सैनिक टाकळी) यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत नदी प्रदूषणाला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी शंकर केंदुळे यांना जबाबदार धरत त्यांना मृत माशांचा हार घालत दूषित पाणी पाजण्याचा प्रयत्न करीत आपल्या भावना तीव्र केल्या. अद्यापही दूषित पाण्याचा प्रवाह नदीत चालू असल्याने मासे मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे नदीकाठी उग्र वास येत असून, तालुक्यातील अनेक गावांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच तेरवाड बंधाऱ्यावर तालुक्यातील बागडी समाज मच्छिमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, मासेच मृत होत असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. आंदोलनकर्त्यांनी आंदोलन तीव्र करून आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. मात्र, याचे गांभीर्य प्रदूषण नियंत्रण मंडळानी न घेता आपल्या कार्यप्रणालीवर कोणतेही परिणाम न झाल्याचे दाखविल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.