शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘गोकुळ’चे राजकारण : अध्यक्ष निवडीवर ‘महाडिक-पी. एन.’ यांचे मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 16:20 IST

‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीबाबत ‘चारा वीट प्रकल्पा’च्या कार्यक्रमात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी मौनच पाळले. उलट महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या कामाची प्रशंसा केल्याने इच्छुकांची गोची झाली आहे.

ठळक मुद्दे‘गोकुळ’चे राजकारण : अध्यक्ष निवडीवर ‘महाडिक-पी. एन.’ यांचे मौनमहाडिक यांनी केली विश्वास पाटील यांची प्रशंसा

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीबाबत ‘चारा वीट प्रकल्पा’च्या कार्यक्रमात संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व पी. एन. पाटील यांनी मौनच पाळले. उलट महाडिक यांनी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या कामाची प्रशंसा केल्याने इच्छुकांची गोची झाली आहे.विश्वास पाटील हे गेली साडेतीन वर्षे ‘गोकुळ’चे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ज्येष्ठ संचालकांनी दोन वेळा महाडिक यांची भेट घेऊन बदलण्याची पुन्हा मागणी केली. ७ डिसेंबरला ‘गोकुळ’च्या चारा वीट प्रकल्पाचे उद्घाटन आहे. ते झाल्यानंतर १४ डिसेंबर रोजी आपण व पी. एन. पाटील बसून काय तो निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी संचालकांना दिले.

चारा वीट प्रकल्पाचे उद्घाटन शुक्रवारी (दि. १४) झाल्यानंतर अध्यक्ष बदलाबाबत इच्छुकांमध्ये जोरदार खलबते सुरू झाली आहेत; पण याच कार्यक्रमात महाडिक यांनी ‘पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये अध्यक्ष पाटील यांनी मान्यतेपेक्षा जादा जागा घेऊन संघाचा कोट्यवधी रुपयांचा फायदा अध्यक्ष पाटील यांनी करून दिल्या’चे प्रशंसोद्गार काढले. यामुळे एरव्ही कोणत्याही हास्यविनोदात रमत असलेल्या संचालकांच्या चेहऱ्यावर तणाव दिसत होता.

पाटील यांना बदलणे अशक्य कसे?अध्यक्ष पाटील हे करवीर विधानसभा मतदारसंघातील आहेत; त्यामुळे विधानसभा निवडणूक होईपर्यंत त्यांच्याकडेच अध्यक्षपद राहावे, यासाठी पी. एन. पाटील आग्रही राहू शकतात. तालुक्याच्या राजकारणात ते नरके गटाचे विरोधक आहेत, हीदेखील त्यांची जमेची बाजू आहे. त्यामुळे पी. एन. यांचा पहिला प्रयत्न अध्यक्षबदल विधानसभा निवडणुकीनंतरच करू, असाच राहील.

...तर डोंगळे, रणजितसिंह, अंबरीश यांची शक्यताअध्यक्षबदलाबाबत संचालकांनी फारच आग्रह धरला तर अरुण डोंगळे व रणजित पाटील यांचा विचार होऊ शकतो. डोंगळे आक्रमक आहेत. ‘भोगावती’त ते पी. एन. पाटील यांच्यासोबतआहेत. डोंगळे यांच्या नावास महाडिक कितपत तयार होतात, हे महत्त्वाचे आहे. रणजित पाटील हेदेखील प्रबळ दावेदार आहेत. ते दोन्ही घाटगे गटांना चालू शकतात. आगामी लोकसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण करून कागल तालुक्यातून मदत मिळावी, यासाठी दोन्ही घाटगे गटांत समझोता घडवून आणण्यासाठी महाडिक प्रयत्नशील आहेत. त्याचा भाग म्हणून अंबरीश घाटगे यांना ‘गोकुळ’मध्ये संधी देऊन समरजित घाटगे यांचा विधानसभेचा मार्ग मोकळा केला जाण्याचीही एक शक्यता आहे.

बदल करायचा की नाही याचा कोणताही निर्णय या क्षणाला आम्ही घेतलेला नाही. मी व पी. एन. पाटील १४ तारखेला एकत्र बसू व त्यानंतरच याचा निर्णय होईल. युद्धाला सामोरे गेल्यावर समोरच्याला गोळी घालायची की तेथून पळून यायचे हे त्यावेळी ठरवायचे, अशी महाडिक यांची कार्यपद्धती आहे.- महादेवराव महाडिक, नेते, गोकुळ 

 

टॅग्स :Gokul Milkगोकुळkolhapurकोल्हापूर