शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

राजकीय संन्यास नाही; योग्यवेळी सक्रिय : प्रकाश आवाडे, काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:28 IST

इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच,

ठळक मुद्देयंत्रमाग उद्योग मंदीवर उपाय गरजेचा

इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच, असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. मात्र, सध्याच्या सरकारकडून दाखविण्यात येणाऱ्या यंत्रमाग उद्योगाबाबतच्या उदासीनतेवर त्यांनी जोरदार टीका केली.येथील पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात आवाडे अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही ‘ताराराणी’चे की कॉँग्रेसचे, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली; पण यावेळी आवाडेंबरोबर राष्टÑीय कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे व नगरपालिकेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे आवाडे कॉँग्रेसचेच असल्याचे यावर शिक्कामोर्तब झाले.सर्वसामान्य जनतेसमोर सध्या अनेक समस्या उभ्या असताना सरकारकडून फक्त पोकळ आश्वासनापलीकडे काहीही केले जात नाही. महागाई, पेट्रोल-डिझेलचे उच्चांकी दर, शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही न मिळणारा भाव, रेशनिंगवरून गायब झालेले धान्य, अशा विविध समस्यांनी जनता ग्रासली आहे, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. या उद्योगातील मंदीवर सरकार कोणतेच उपाय करीत नाही. सवलतीत वीजदर आणि यंत्रमाग उद्योगासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात पाच टक्क्यांचे अनुदान दिले, तर रोजगाराभिमुख असलेल्या या उद्योगात निश्चितपणे ऊर्जितावस्था येईल. पण वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी, वीजदर सवलत व यंत्रमागधारकांना व्याजदराचे अनुदान सरकार देईल, असे सांगून पावणेदोन वर्षे उलटली; पण पदरात काहीच पडले नाही, असे सांगत माजी मंत्री आवाडे यांनी सरकार पोकळ आश्वासने देत असल्याबद्दल टीका केली.यंत्रमाग कामगारांची शासनाकडून क्रूर चेष्टायंत्रमाग उद्योगात तीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डासारखे कल्याणकारी मंडळ स्वतंत्रपणे स्थापन करून ते ताबडतोब कार्यान्वित करणे आवश्यक असताना १२४ उद्योग-व्यवसायातील असंघटित कामगारांच्या कल्याणकारी मंडळात यंत्रमाग कामगारांचा समावेश करण्याची घोषणा करून राज्य शासनाने या उद्योगाची आणि कामगार वर्गाची कू्रर चेष्टा केली आहे, असा आरोप आवाडे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण