शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

राजकीय संन्यास नाही; योग्यवेळी सक्रिय : प्रकाश आवाडे, काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:28 IST

इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच,

ठळक मुद्देयंत्रमाग उद्योग मंदीवर उपाय गरजेचा

इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच, असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. मात्र, सध्याच्या सरकारकडून दाखविण्यात येणाऱ्या यंत्रमाग उद्योगाबाबतच्या उदासीनतेवर त्यांनी जोरदार टीका केली.येथील पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात आवाडे अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही ‘ताराराणी’चे की कॉँग्रेसचे, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली; पण यावेळी आवाडेंबरोबर राष्टÑीय कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे व नगरपालिकेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे आवाडे कॉँग्रेसचेच असल्याचे यावर शिक्कामोर्तब झाले.सर्वसामान्य जनतेसमोर सध्या अनेक समस्या उभ्या असताना सरकारकडून फक्त पोकळ आश्वासनापलीकडे काहीही केले जात नाही. महागाई, पेट्रोल-डिझेलचे उच्चांकी दर, शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही न मिळणारा भाव, रेशनिंगवरून गायब झालेले धान्य, अशा विविध समस्यांनी जनता ग्रासली आहे, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. या उद्योगातील मंदीवर सरकार कोणतेच उपाय करीत नाही. सवलतीत वीजदर आणि यंत्रमाग उद्योगासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात पाच टक्क्यांचे अनुदान दिले, तर रोजगाराभिमुख असलेल्या या उद्योगात निश्चितपणे ऊर्जितावस्था येईल. पण वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी, वीजदर सवलत व यंत्रमागधारकांना व्याजदराचे अनुदान सरकार देईल, असे सांगून पावणेदोन वर्षे उलटली; पण पदरात काहीच पडले नाही, असे सांगत माजी मंत्री आवाडे यांनी सरकार पोकळ आश्वासने देत असल्याबद्दल टीका केली.यंत्रमाग कामगारांची शासनाकडून क्रूर चेष्टायंत्रमाग उद्योगात तीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डासारखे कल्याणकारी मंडळ स्वतंत्रपणे स्थापन करून ते ताबडतोब कार्यान्वित करणे आवश्यक असताना १२४ उद्योग-व्यवसायातील असंघटित कामगारांच्या कल्याणकारी मंडळात यंत्रमाग कामगारांचा समावेश करण्याची घोषणा करून राज्य शासनाने या उद्योगाची आणि कामगार वर्गाची कू्रर चेष्टा केली आहे, असा आरोप आवाडे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण