शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय संन्यास नाही; योग्यवेळी सक्रिय : प्रकाश आवाडे, काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 00:28 IST

इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच,

ठळक मुद्देयंत्रमाग उद्योग मंदीवर उपाय गरजेचा

इचलकरंजी : मी काही राजकीय संन्यास घेतलेला नाही. काही काळ अलिप्त राहायच ठरवलेय. योग्य वेळी राजकारणात सक्रिय होईनच, असा विश्वास माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केला. मात्र, सध्याच्या सरकारकडून दाखविण्यात येणाऱ्या यंत्रमाग उद्योगाबाबतच्या उदासीनतेवर त्यांनी जोरदार टीका केली.येथील पत्रकार कक्षात आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमात आवाडे अनौपचारिकपणे पत्रकारांशी बोलत होते. तुम्ही ‘ताराराणी’चे की कॉँग्रेसचे, या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल दिली; पण यावेळी आवाडेंबरोबर राष्टÑीय कॉँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश मोरे व नगरपालिकेतील कॉँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील आवर्जून उपस्थित होते. त्यामुळे आवाडे कॉँग्रेसचेच असल्याचे यावर शिक्कामोर्तब झाले.सर्वसामान्य जनतेसमोर सध्या अनेक समस्या उभ्या असताना सरकारकडून फक्त पोकळ आश्वासनापलीकडे काहीही केले जात नाही. महागाई, पेट्रोल-डिझेलचे उच्चांकी दर, शेतीमालाला उत्पादन खर्चाइतकाही न मिळणारा भाव, रेशनिंगवरून गायब झालेले धान्य, अशा विविध समस्यांनी जनता ग्रासली आहे, असेही आवाडे यांनी स्पष्ट केले.राज्यात शेतीखालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग आहे. या उद्योगातील मंदीवर सरकार कोणतेच उपाय करीत नाही. सवलतीत वीजदर आणि यंत्रमाग उद्योगासाठी घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावरील व्याजदरात पाच टक्क्यांचे अनुदान दिले, तर रोजगाराभिमुख असलेल्या या उद्योगात निश्चितपणे ऊर्जितावस्था येईल. पण वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी, वीजदर सवलत व यंत्रमागधारकांना व्याजदराचे अनुदान सरकार देईल, असे सांगून पावणेदोन वर्षे उलटली; पण पदरात काहीच पडले नाही, असे सांगत माजी मंत्री आवाडे यांनी सरकार पोकळ आश्वासने देत असल्याबद्दल टीका केली.यंत्रमाग कामगारांची शासनाकडून क्रूर चेष्टायंत्रमाग उद्योगात तीन लाखांहून अधिक कामगार कार्यरत आहेत. यंत्रमाग कामगारांसाठी माथाडी बोर्डासारखे कल्याणकारी मंडळ स्वतंत्रपणे स्थापन करून ते ताबडतोब कार्यान्वित करणे आवश्यक असताना १२४ उद्योग-व्यवसायातील असंघटित कामगारांच्या कल्याणकारी मंडळात यंत्रमाग कामगारांचा समावेश करण्याची घोषणा करून राज्य शासनाने या उद्योगाची आणि कामगार वर्गाची कू्रर चेष्टा केली आहे, असा आरोप आवाडे यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण