शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णा दाबनलिकाप्रश्नी राजकीय द्वेष

By admin | Updated: August 6, 2016 00:43 IST

इचलकरंजीत कॉँग्रेस, राष्ट्रवादीकडून जाब : मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले; स्वच्छतेबद्दल प्रश्नांची सरबत्ती

इचलकरंजी : निव्वळ राजकीय द्वेषापोटी कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलण्याची २७ कोटी रुपयांची निविदा रद्द करणे म्हणजे शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासारख्या जीवनावश्यक बाबींसाठी वेठीस धरण्याचा प्रकार आहे. त्यामुळे नगरपालिकेने दाबनलिका बदलण्याचे काम पूर्ण करावे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जोरदार प्रयत्न करावेत. तसेच शहर स्वच्छता आणि रस्ते या प्रश्नांविषयी शुक्रवारी येथील राष्ट्रीय कॉँग्रेसचे पदाधिकारी व दोन्ही कॉँग्रेसच्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांना धारेवर धरले.मात्र, कृष्णा नळ पाणी योजनेची दाबनलिका बदलण्याच्या कामाचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित असल्याचे सांगून मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांनी या समस्येला बगल दिली. तसेच रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करून जे कोणी चुकीची कामे करणारे मक्तेदार असतील, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असेही आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी कॉँग्रेसच्या शिष्टमंडळास दिले. शहराला कृष्णा नदीतून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेची ११ किलोमीटर लांबीची दाबनलिका बदलण्याच्या २७ कोटी रुपयांची निविदा रद्द करण्याच्या हालचाली सुरू आहेत, अशी माहिती वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाली. त्याबाबतचा जाब विचारण्यासाठी कॉँग्रेसचे पदाधिकारी व राष्ट्रीय आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नगरसेवक मुख्याधिकारी डॉ. रसाळ यांच्याकडे गेले होते. त्यावेळी नगराध्यक्ष शुभांगी बिरंजे, पाणीपुरवठा सभापती दिलीप झोळ हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, माजी नगराध्यक्ष अशोकराव आरगे, उपनगराध्यक्ष महावीर जैन, गटनेते बाळासाहेब कलागते, नगरसेवक शशांक बावचकर, रवी रजपुते, आदींनी अनेक प्रश्न विचारून नगराध्यक्षांना भंडावून सोडले. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी कृष्णा नळ योजनेची दाबनलिका बदलण्याबाबत मी कोणतेही विधान केले नाही, असे उत्तर देऊन वेळ मारून नेली. मात्र, कॉँग्रेस नगरसेवकांनी हा मुद्दा न सोडता वारणा नळ योजना मंजूर झाली असली तरी ती पूर्ण होण्यास चार-पाच वर्षांचा कालावधी लागेल. या काळात कृष्णा योजनेची दाबनलिका बदलली नाही, तर शहरास तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, असेही उद्गार उद्विग्नपणे काढले. दरम्यान, शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि दैनंदिन कचरा उठाव होत नसल्याने आरोग्य व स्वच्छतेची समस्या निर्माण झाली असल्याबद्दल अनेकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. या शिष्टमंडळामध्ये नगरसेवक संजय कांबळे, रणजित जाधव, संजय केंगार, तेजश्री भोसले, सुजाता भोंगाळे, बिस्मिल्ला मुजावर, सुरेखा इंगवले, शकुंतला मुळीक, सुमन पोवार, नरसिंह पारीक, आदींचा समावेश होता.राजकीय द्वेषापोटी प्रस्ताव रद्द करण्याचा घाटकृष्णा नळ पाणी योजनेची एकूण १८ किलोमीटर लांबीच्या दाबनलिकेपैकी सात किलोमीटर लांबीची दाबनलिका यापूर्वी नगरपालिकेने बदलली आहे. मात्र, उर्वरित ११ किलोमीटर लांबीची दाबनलिका अत्यंत कमकुवत झाली आहे. त्यामुळे या नलिकेत वारंवार मोठ्या प्रमाणावर गळती लागत असल्याने ती बदलण्याचा प्रस्ताव कॉँग्रेसने शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून मंजूर करून घेतला. २७ कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी मिळाल्यानंतर केवळ राजकीय द्वेष, श्रेयवाद आणि व्यक्तिगत राजकीय स्वार्थापोटी ही योजना जीवन प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आली आणि आता तर राजकीय द्वेषापोटी दाबनलिका बदलण्याचाच प्रस्ताव रद्द करण्याचे सुरू असल्यामुळे अक्षरश: साडेतीन लाख लोकांच्या तोंडचे पाणी पळविले जात आहे, असे म्हणून कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांबरोबर नगरसेवकांनीही आमदार सुरेश हाळवणकर यांचे नाव न घेता जोरदार टीका केली. मात्र, कॉँग्रेसने याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, जनहिताच्या विरोधी असलेला हा डाव हाणून पाडला जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.