शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

बेसुमार वृक्षतोडीने वन्यप्राणी लोकवस्तीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 23:54 IST

विक्रम पाटील।करंजफेण : अनेक दिवसांपासून पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांमध्ये गव्यांबरोबर तस्कर हत्तीनेही धुमाकूळ घातल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असतानाच यवलूज-पडळ परिसरामध्ये खुद्द बिबट्याने एका शेतकऱ्याला अवघ्या काही अंतरावरून दर्शन दिल्यामुळे व वनअधिकाºयांनी पाऊलखुणा ओळखल्यामुळे बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केला असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. वन्यप्राणी डोंगर-दºया सोडून लोकवस्तीत शिरकाव का करत आहेतहा चिंतनाचा विषय ...

विक्रम पाटील।करंजफेण : अनेक दिवसांपासून पन्हाळा, शाहूवाडी तालुक्यांमध्ये गव्यांबरोबर तस्कर हत्तीनेही धुमाकूळ घातल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले असतानाच यवलूज-पडळ परिसरामध्ये खुद्द बिबट्याने एका शेतकऱ्याला अवघ्या काही अंतरावरून दर्शन दिल्यामुळे व वनअधिकाºयांनी पाऊलखुणा ओळखल्यामुळे बिबट्याने लोकवस्तीत शिरकाव केला असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. वन्यप्राणी डोंगर-दºया सोडून लोकवस्तीत शिरकाव का करत आहेतहा चिंतनाचा विषय बनून राहिला आहे.एकेकाळी पन्हाळा, शाहूवाडी परिसर घनदाट जंगल व झाडा झुडपांचा भाग म्हणून ओळखला जात होता, परंतु दिवसेंदिवस डोळ्यांदेखत होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे रिकामी होत चाललेली जंगले, त्यामुळे येथील डोंगर परिसर भकास होऊ लागला आहे.

वनखात्याचा बेसुमार वृक्षतोडीवर अंकुश न राहिल्यामुळे घनदाट जंगले भुईसपाट झाली असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येऊ लागल्यामुळे लहानमोठ्या जंगली प्राण्यांना लपण्यासाठीसुद्धा जागा न राहिल्यामुळे छोटे छोटे जंगलात वावरणारे प्राणी दुर्मीळ होऊ लागले आहेत. यामुळे वन्यप्राण्यांचीभक्ष्याची साखळी तुटली असल्यामुळे अन्नाच्या शोधासाठी हत्ती, बिबट्या यासारख्या अजस्त्र प्राण्यांना लोकवस्तीत येण्याची वेळ येऊन ठेपली आहे. लोकांना फोटोत पाहायला मिळणारे हे अजस्त्र प्राणी लोकांच्या प्रत्यक्ष समोर येऊ लागल्यामुळे निसर्गप्रेमींना त्यांच्या अस्तित्वाची चिंता लागून राहिली आहे.बेसुमार वृक्षतोडीचा परिणाम जंगलातील प्राण्यांबरोबर हवामानावर सुद्धा झाल्यामुळे निसर्गात ऋतूबदल दिसत आहेत. त्याचा प्रामुख्याने पावसावर मोठा परिणाम दिसूनयेत असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकºयांपुढे पाण्याचा प्रश्न आवासून उभा ठाकला आहे.तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी सपाट झालेल्या जंगल परिसरामध्ये नवीन झाडे लावून संवर्धन करण्याची गरज आहे. वर्षाला शतकोटी वृक्षलागवडीच्या नावाखाली लाखो रुपयांचा खर्च करून लावलेली हजारो रोपे उन्हाळ्यामध्ये तग धरून आहेत की नाहीत, त्यांचे योग्य प्रकारे संगोपन होत आहे का नाही याची वरिष्ठांनी प्रत्यक्ष भेट देऊन दखल घेण्याचीही तितकीच गरज आहे.त्याचबरोबर कायद्याचा बडगा दाखवून बेसुमार वृक्षतोडीवर तातडीने अंकुश ठेवून वनखात्याने वेळीच यश संपादन केले, तरच वन्यप्राण्यांचे अस्तित्व अबाधित राहू शकेल. अन्यथा वन्यप्राण्यांनी जिवाच्या आकांताने लोकवस्तीत शिरकाव केल्यावर भविष्यात कोणाला नवल वाटायला नको.